शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

समृद्धी महामार्गाचे काम अपूर्णच, तरीदेखील सरकारकडून होऊ शकते उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 07:00 IST

Nagpur News महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मोठमोठे दावे केले असले तरी प्रत्यक्षात समृद्धी द्रुतगती महामार्गाचा नागपूर-शिर्डी हा पहिला टप्पा फेब्रुवारीअखेर पूर्ण होणे कठीण आहे.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्याचे काम महिनाअखेरीस होणे अशक्य मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्ग सुरू करण्याचा दबाव

आशिष रॉय

नागपूर : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मोठमोठे दावे केले असले तरी प्रत्यक्षात समृद्धी द्रुतगती महामार्गाचा नागपूर-शिर्डी हा पहिला टप्पा फेब्रुवारीअखेर पूर्ण होणे कठीण आहे. आता मे महिना ही नवीन ‘डेडलाईन’ ठरविण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील चौदा शहरांमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून या महिन्यातच अपूर्ण मार्गाचे उद्घाटन होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या ५२० किलोमीटरच्या पट्ट्यापैकी २२ कि.मी. मार्गाचे काँक्रिटीकरण शिल्लक आहे. जर फेब्रुवारीअखेरीस हा मार्ग वाहतुकीस खुला झाल्यास प्रवाशांना लांब वळसा घालून जावे लागेल, अशी माहिती महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक (अभियांत्रिकी) अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

प्रवासी नागपूर ते कारंजा लाड (२१० किमी) प्रवास करू शकतात. परंतु, त्यांना कारंजा लाड ते देऊळगाव राजा (३४१ किमी) हा प्रवास राष्ट्रीय महामार्गाने करावा लागेल. देऊळगाव राजा ते वैजापूर दरम्यानचा (४८८ किमी) मार्ग तयार आहे, पण पुन्हा वैजापूर ते शिर्डी हा प्रवास राष्ट्रीय महामार्गाने करावा लागेल. समृद्धी महामार्गाचे पहिला टप्पा मे महिन्याअखेरीसपर्यंत तयार होईल, असे गायकवाड यांनी सांगितले.

कारंजा लाड आणि देऊळगाव राजा दरम्यानच्या १५ कि.मी.च्या पट्ट्यातील काही पुलांचे बांधकाम अद्यापही सुरू आहे. वैजापूर आणि शिर्डी दरम्यान रेल्वे ओव्हरब्रिज आणि गोदावरी नदीवरील पूल मे अखेरपर्यंत पूर्ण होईल.

एमएसआरडीसीने डिसेंबर २०२१ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर ही मुदत फेब्रुवारी २०२२ व मे २०२२ अशी वाढविण्यात आली. मुंबईपर्यंतचा संपूर्ण महामार्ग डिसेंबर २०२२ च्या अगोदर पूर्ण होणार नाही. सततच्या विलंबामुळे येथील लोक प्रचंड अस्वस्थ झाले आहेत.

कोविडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने आम्ही वेल्डिंग करू शकलो नाही. त्यामुळे कारंजा लाड ते देऊळगाव राजा दरम्यानच्या पुलाला विलंब झाला. गेल्या वर्षी मान्सून परतण्यास उशीर झाला आणि परिणामी वैजापूर ते शिर्डी दरम्यानच्या गोदावरी नदीतील पाण्याची पातळी सुरक्षित पातळीपर्यंत कमी होण्यास वेळ लागला. त्यामुळे पुलाच्या कामाला विलंब झाला. तसेच आरओबीसाठी भारतीय रेल्वेकडून अनेक परवानग्या मिळविण्यासाठी बराच विलंब लागला, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

मार्चपासून असा राहणार मार्ग

कारंजा लाड (२१० किमी) - समृद्धी द्रुतगती महामार्ग

कारंजा लाड - देऊळगाव राजा (१३१ किमी) - राष्ट्रीय महामार्ग

देऊळगाव राजा - वैजापूर (१४७ किमी) - समृद्धी द्रुतगती महामार्ग

वैजापूर - शिर्डी (३२ किमी) - राष्ट्रीय महामार्ग

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग