शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

ईस्त्रायलमधील महिलांच्या देशभक्तीपासून नारीशक्तीने प्रेरणा घ्यावी: शांताक्का

By योगेश पांडे | Updated: October 20, 2023 20:25 IST

राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी उत्सव साजरा

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: संपूर्ण जगात युद्धाची स्थिती आहे. ईस्त्रायलवर हल्ला करणाऱ्या हमाससारख्या राक्षसी वृत्तीचा सर्वनाश झाला पाहिजेच. लहान देश असला तरी तेथील लोक देशासाठी लढण्यासाठी तयार असतात. इस्त्राईलच्या प्रत्येक नागरिकाला सैन्य प्रशिक्षण मिळते. तेथील महिलांमध्ये देशाबाबत ज्या पद्धतीचे देशप्रेम व देशभर्ती आहे, त्यापासून नारीशक्तीने प्रेरणा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी केले. राष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे शुक्रवारी रेशीमबाग येथील मैदानावर आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी बडोदा येथील श्री स्वामीनारायण देव महिला मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ.उर्वशी मिश्रा, कार्यवाहिका करुणा साठे प्रामुख्याने उपस्थित होत्या. लोकांमध्ये भारतात महिलांबाबत अध्यात्मिक एकता आहे. प्राचीन काळापासून महिला सर्वच क्षेत्रात समोर होत्या. मात्र परकीय आक्रमणांमुळे समाजात विकृती निर्माण झाल्या. त्या विकृती ठीक करणे हे आपले कर्तव्य आहे. भारतात महिलांचे शोषण होत आहे, त्यांना सन्मान मिळत नाही असा अपप्रचार होतो. ‘नॅरेटिव्ह’च्या माध्यमातून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. हा अपप्रचार मोडून काढण्यासाठी देशातील महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे शांताक्का म्हणाल्या. आपल्या देशातील महिलांमध्ये प्रचंड कर्तृत्व आहे. महिलांना संधी मिळाली तर त्या देशाला प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकतात व ते वारंवार दिसून आले आहे, असे प्रतिपादन डॉ.मिश्रा यांनी केले. या कार्यक्रमाला नागपूरातील निरनिराळ््या शाखांमधील सेविकांची उपस्थिती होती. शाळकरी मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यतचा समावेश असलेल्या सेविकांच्या पथकाने योगासने, घोष, लेझिम यांची निरनिराळी प्रात्यक्षिके सादर केली.

आत्मकेंद्रित होणारी कुटुंबे ही धोक्याची घंटा

भारतातील कुटुंब आत्मकेंद्रित होत आहेत व सुखाची कल्पना वेगळी होत आहे. मुळ सुखाच्या कल्पनेपासून लोक दूर जात आहे. यामुळे कुटुंबात भावना संकुचित होत आहेत. यातून बाहेर येत वसुधैव कुटुंबकम यासारखे श्रेष्ठ विचार समाजात पोहोचविले पाहिजे. कुटुंब भावनात्मक दृष्टीने सशक्त असायला हवे व संस्कृतीच्या मुळांशी जुळलेले पाहिजे, असे शांताक्का म्हणाल्या.

समलैंगिक विवाहांची याचिका विदेशी विचारांच्या प्रभावातूनच

समलैंगिक विवाहांच्या याचिकेबाबत कोट्यवधी लोकांच्या भावना व हजारो वर्षांच्या संस्कृतीचा सर्वोच्च न्यायालयाने सन्मान राखला. या याचिकेचा आम्ही विरोध केला होता. दोन न्यायाधिशांनी या याचिकेच्या मुद्द्यांना संमती दिली आहे. आज अनेक जण विदेशातील प्रभावाखाली असून तशाच गोष्टी भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यापासून सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, असे मत शांताक्का यांनी व्यक्त केले.

महिलांनी ‘कॅरिअर विथ कल्चर’ला महत्त्व द्यावे

तंत्रज्ञान, गणित, विज्ञानमध्ये मुलांपेक्षा भारतीय मुली समोर आहेत. करिअरला महिलांनी महत्त्व दिलेच पाहिजे. मात्र संस्कृतीशीदेखील जुळून रहायला हवे. कोणत्याही क्षेत्रात रहा, मात्र कर्तव्य व काम भारतीय जीवनमूल्य व संस्कृतीनुसार हवे. महिलांनी ‘कॅरिअर विथ कल्चर’ला महत्त्व दिले पाहिजे, असे आवाहन शांताक्का यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूर