शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दारूच्या भट्टीवर महिलांचा हल्लाबोल : तोडफोड करून लावली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:39 IST

असामाजिक तत्त्वांच्या हैदोसामुळे त्रस्त महिलांनी दारूच्या दुकानात तोडफोड करून आग लावली. ही घटना मंगळवारी रात्री कळमन्यातील चिखली वस्तीत घडली. महिलांनी दारूचे दुकान बंद करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकळमन्यातील घटना, आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : असामाजिक तत्त्वांच्या हैदोसामुळे त्रस्त महिलांनी दारूच्या दुकानात तोडफोड करून आग लावली. ही घटना मंगळवारी रात्री कळमन्यातील चिखली वस्तीत घडली. महिलांनी दारूचे दुकान बंद करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे.चिखली वस्तीमध्ये अनेक दिवसांपासून दारूचे दुकान आहे. परिसरातील महिला सुरुवातीपासूनच येथे दारूचे दुकान उघडण्यास विरोध करीत आहेत. त्यांनी या दुकानाविरुद्ध अनेकदा आंदोलनेही केली. मंगळवारी रात्री ८.३० वाजता चिखली वस्तीत राहणाऱ्या अलका मेश्राम या २० ते २५ महिलांसह दारूच्या दुकानावर पोहोचल्या. त्यांनी दुकान बंद करण्याची मागणी करीत तोडफोड सुरू केली. यानंतर दुकानाला आग लावण्याचा प्रयत्नही केला. घटनेच्यावेळी दुकानातील कर्मचारी प्रकाश तायवडे आपल्या इतर सह कर्मचाºयासह उपस्थित होते. दुकानात अनेक ग्राहक होते. अचानक तोडफोड होत असल्याने ते पळून गेले. तोडफोड केल्यावर महिला परत गेल्या. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे. महिलांनी दारूचे दुकान बंद न केल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही दिला आहे.दारूच्या दुकानाजवळच झोपडपट्टी आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर मजूर राहतात. सकाळपासूनच दुकानात ग्राहकांची गर्दी होते. पुरुष आपल्या कमाईचा बहुतांश भाग दारूवरच उडवतात. दुकानाजवळ नेहमीच असामाजिक तत्त्वांची मंडळी फिरत असतात. त्यामुळे महिलांना तेथून ये-जा करणे कठीण झाले आहे. महिलांची दिवसाढवळ्या छेडखानी केली जाते. दारूच्या दुकानात येणारे गुंड प्रवृत्तीचे लोक दिवसभर वस्तीत फिरत असतात. त्यामुळे नेहमीच एखादा अनर्थ होण्याचा धोका असतो.महिलांचे म्हणणे आहे की, त्या या दुकानाचा सुरुवातीपासूनच विरोध करीत आहेत. त्यांना हे दुकान इतर ठिकाणी ‘शिफ्ट’ करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु नंतर या दिशेने कुठलेही पऊल उचलण्यात आले नाही. मागील काही दिवसांपासून महिलांना येथे जगणे कठीण झाले आहे.महिला स्वत:ला असुरक्षित समजू लागल्या आहेत. लहान मुलांनाही दारू विकली जात आहे. दारुडे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक वस्तीमध्ये गोंधळ घालत आहे. दारूसाठी लहान मुलेही आता गुन्हेगारी कृत्य करू लागले आहेत. कळमना पोलिसांना याची माहिती आहे. ते दुकान अधिकृत असल्याचे सांगून कारवाई करीत नाही. त्यामुळे त्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबिला. महिलांनी दारूचे दुकान तत्काळ न हटविल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली आहे. सध्या कळमना पोलिसांनी अलका मेश्राम आणि इतर महिलांविरुद्ध दंगा व तोडफोड केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :Womenमहिलाliquor banदारूबंदी