शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी वाक्युद्ध

By admin | Updated: April 11, 2017 01:42 IST

महानगरपालिकेच्या शहरातील पाणीटंचाईची आढावा बैठक सोमवारी चांगलीच गाजली. या बैठकीत जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांची कोणतीच तयारी नसल्याचे दिसले.

विरोधकांनी फोडले माठ : सत्ताधाऱ्यांनी आपटले डोके पालकमंत्र्यांनी फोडला अधिकाऱ्यांना घामनागपूर : महानगरपालिकेच्या शहरातील पाणीटंचाईची आढावा बैठक सोमवारी चांगलीच गाजली. या बैठकीत जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांची कोणतीच तयारी नसल्याचे दिसले. तसेच ओसीडब्ल्यूबाबत समोर आलेल्या तक्रारी पाहता ओसीडब्ल्यूचे कामही समाधानकारक नसल्याचे आढळून आल्याने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदारांसह लोकप्रतिनिधींनी या बैठकीत अधिकऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. तसेच त्यांच्या एकूणच कारभाराबाबत नापसंती व्यक्त केली.एकूणच नागपुरात सत्ताधारी व विरोधी पक्षाचा पाणीटंचाईबाबत असंतोष दिसून आला. एकीकडे विरोधी पक्षातर्फे महापालिकेत मडके फोडण्यात आले तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाने आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीला महापौर नंदा जिचकार, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, नासुप्र सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्याच्या दृष्टीने जलप्रदाय विभागाकडे कोणतीच माहिती उपलब्ध नव्हती. कार्यकारी अभियंता गायकवाड समाधानकारक माहिती देऊ शकले नाही. पाणीटंचाईच्या उपाययोजना काय केल्या, हेही जलप्रदाय विभागाचे अधिकारी सांगू शकले नाही. परिणामी आ. सुधाकर देशमुख यांनी नाराजी व्यक्त करीत ही बैठक पुन्हा बोलावण्याची सूचना केली. या बैठकीत उपस्थित झोन सभापतींनीही पाणीटंचाईच्या तक्रारी केल्या. खुद्द जलप्रदाय समिती सभापतींच्या प्रभागातच दूषित पाणी असल्याचे पुरावे पालकमंत्र्यांकडे देण्यात आले.ओसीडब्ल्यू करारानुसार काम करीत नसल्याचे या बैठकीत पालकमंत्र्यांना आढळले. मनपा जलप्रदाय विभाग आणि ओसीडब्ल्यू दोघांचेही पाणीटंचाईच्या दृष्टीने कोणतेच नियोजन नसल्याचे दिसून येत होते. पाईपलाईनचे नेटवर्क आहे, तेथे पाणी पोहोचत नाही. ६५० एमएलडी पाणीपुरवठा शहराला होत असतानाही अनेक प्रभागात पाणीटंचाईच्या तक्रारींवर पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.(प्रतिनिधी)महापौरांनीही व्यक्त केली नाराजी महापौर नंदा जिचकार यांनीही मनपा जलप्रदाय विभागाच्या कामावर नापसंती व्यक्त केली. ओसीडब्ल्यूवर कारभार सोपवून कर्मचारी निश्चिंत असतात. आपली काही जबाबदारी नाही, या थाटात जलप्रदाय विभाग वागत असल्याची टीकाही त्यांनी केली. आ. डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे व नगरसेवक दीपक चौधरी प्रचंड संतप्त झाले होते. ओसीडब्ल्यूच्या कामाचे होणार अंकेक्षण ओसीडब्ल्यूच्या कामाचे त्रयस्थ संस्थेकडून अंकेक्षण करण्याचा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला. यापुढची पाणीटंचाईची बैठक २५ एप्रिलला आयोजित करण्याचे निर्देशही पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. लोकांच्या तक्रारी ऐका, अन्यथा कडक कारवाई लोकांना पाणी वितरणाचे कंत्राट ओसीडब्ल्यूकडे असले तरी ओसीडब्ल्यूवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जलप्रदाय विभागाच्या अभियंत्यांची आहे. कनिष्ठ व उपअभियंत्यांनी उद्यापासून वस्त्यावस्त्यांमध्ये जाऊन नागरिकांच्या पाण्यासंदर्भातील तक्रारी सोडवाव्यात. लोकांच्या तक्रारी सोडवल्या गेल्या नाहीत तर प्रत्येक अभियंत्यावर कडक कारवाईचा इशारा पालकमंत्र्यांनी याप्रसंगी दिला. तसेच आयुक्तांनी झोननिहाय पाणीटंचाईसाठी दौरा करावा व नगरसेवकांना सोबत घेऊन नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.काँग्रेसचा मनपावर हल्लाबोलनागपूर : ऐन उन्हाळ्यात शहराच्या अनेक भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी व निवेदने देऊ नही नागरिकांना पाणीपुरवठा होत नसल्याने सोमवारी काँग्रेसतर्फे महापालिका कार्यालयावर हल्लाबोल केला. आंदोलकांनी कार्यालयाच्या गेटवर व महापौरांच्या कक्षात माठ फोडून संताप व्यक्त केला. शहरातील सर्व भागातील नागरिकांना मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा. यासाठी आॅरेंज सिटी वॉटर वर्क्सला (ओसीडब्ल्यू) कंत्राट देण्यात आला. ओसीडब्ल्यूने शहराच्या विविध भागात पाण्याची लाईन टाकण्याचे काम केले. त्यानंतरही उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच शहराच्या अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाईची समस्या मार्गी लागावी, यासाठी शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर व अ‍ॅड. अभिजित वंजारी आदींच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. ओसीडब्ल्यू कंपनीने शहरात पाण्याची लाईन टाकून नवीन मीटर बसविले. परंतु त्यानंतरही काही भागात २० मिनिटेच पाणी मिळत आहे. दुसरीकडे कंपनीचे कर्मचारी वाढीव बिल पाठवून कमी करण्यासाठी पैशाची मागणी करीत आहे. वाढीव बिल न भरल्यास तीन दिवसात नळ जोडणी खंडित करण्याची नोटीस बजावली जात आहे. महापालिका व पदाधिकाऱ्यांचा शहरात २४ तास पाणीपुरवठा होत असल्याचा दावा फोल ठरत आहे. यामुळे ओसीडब्ल्यू कंपनीचा कंत्राट रद्द करण्यात यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. शहरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी विकास ठाक रे, संजय महाकाळकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महापौर नंदा जिचकार व आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनातून केली. पाणी टंचाईची समस्या सोडविण्याचे निर्देश ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना देण्यात येईल. तसेच झोननिहाय आढावा घेण्याचे आश्वासन नंदा जिचकार यांनी शिष्टमंडळाला दिले. आंदोलनात माजी उपमहापौर अण्णाची राऊत, नगरसेवक मनोज सांगोळे, परसराम मानवटकर, हर्षला साबळे, भावना लोणारे, नेहा निकोसे, स्नेहा निकोसे, रमेश पुणेकर, दर्शना धवड, दिनेश यादव, माजी नगरसेवक प्रशांत धवड, देवा उसरे, रमण पैगवार, किशोर गजभिये, वासुदेव ढोके, दिनेश तराळे, शीतल घरत, प्रवीण आगरे, अमान खान, इर्शाद शेख, पंजक निघोट, जॉन थॉमस, काँग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)