शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी वाक्युद्ध

By admin | Updated: April 11, 2017 01:42 IST

महानगरपालिकेच्या शहरातील पाणीटंचाईची आढावा बैठक सोमवारी चांगलीच गाजली. या बैठकीत जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांची कोणतीच तयारी नसल्याचे दिसले.

विरोधकांनी फोडले माठ : सत्ताधाऱ्यांनी आपटले डोके पालकमंत्र्यांनी फोडला अधिकाऱ्यांना घामनागपूर : महानगरपालिकेच्या शहरातील पाणीटंचाईची आढावा बैठक सोमवारी चांगलीच गाजली. या बैठकीत जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांची कोणतीच तयारी नसल्याचे दिसले. तसेच ओसीडब्ल्यूबाबत समोर आलेल्या तक्रारी पाहता ओसीडब्ल्यूचे कामही समाधानकारक नसल्याचे आढळून आल्याने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदारांसह लोकप्रतिनिधींनी या बैठकीत अधिकऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. तसेच त्यांच्या एकूणच कारभाराबाबत नापसंती व्यक्त केली.एकूणच नागपुरात सत्ताधारी व विरोधी पक्षाचा पाणीटंचाईबाबत असंतोष दिसून आला. एकीकडे विरोधी पक्षातर्फे महापालिकेत मडके फोडण्यात आले तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाने आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीला महापौर नंदा जिचकार, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, नासुप्र सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्याच्या दृष्टीने जलप्रदाय विभागाकडे कोणतीच माहिती उपलब्ध नव्हती. कार्यकारी अभियंता गायकवाड समाधानकारक माहिती देऊ शकले नाही. पाणीटंचाईच्या उपाययोजना काय केल्या, हेही जलप्रदाय विभागाचे अधिकारी सांगू शकले नाही. परिणामी आ. सुधाकर देशमुख यांनी नाराजी व्यक्त करीत ही बैठक पुन्हा बोलावण्याची सूचना केली. या बैठकीत उपस्थित झोन सभापतींनीही पाणीटंचाईच्या तक्रारी केल्या. खुद्द जलप्रदाय समिती सभापतींच्या प्रभागातच दूषित पाणी असल्याचे पुरावे पालकमंत्र्यांकडे देण्यात आले.ओसीडब्ल्यू करारानुसार काम करीत नसल्याचे या बैठकीत पालकमंत्र्यांना आढळले. मनपा जलप्रदाय विभाग आणि ओसीडब्ल्यू दोघांचेही पाणीटंचाईच्या दृष्टीने कोणतेच नियोजन नसल्याचे दिसून येत होते. पाईपलाईनचे नेटवर्क आहे, तेथे पाणी पोहोचत नाही. ६५० एमएलडी पाणीपुरवठा शहराला होत असतानाही अनेक प्रभागात पाणीटंचाईच्या तक्रारींवर पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.(प्रतिनिधी)महापौरांनीही व्यक्त केली नाराजी महापौर नंदा जिचकार यांनीही मनपा जलप्रदाय विभागाच्या कामावर नापसंती व्यक्त केली. ओसीडब्ल्यूवर कारभार सोपवून कर्मचारी निश्चिंत असतात. आपली काही जबाबदारी नाही, या थाटात जलप्रदाय विभाग वागत असल्याची टीकाही त्यांनी केली. आ. डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे व नगरसेवक दीपक चौधरी प्रचंड संतप्त झाले होते. ओसीडब्ल्यूच्या कामाचे होणार अंकेक्षण ओसीडब्ल्यूच्या कामाचे त्रयस्थ संस्थेकडून अंकेक्षण करण्याचा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला. यापुढची पाणीटंचाईची बैठक २५ एप्रिलला आयोजित करण्याचे निर्देशही पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. लोकांच्या तक्रारी ऐका, अन्यथा कडक कारवाई लोकांना पाणी वितरणाचे कंत्राट ओसीडब्ल्यूकडे असले तरी ओसीडब्ल्यूवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जलप्रदाय विभागाच्या अभियंत्यांची आहे. कनिष्ठ व उपअभियंत्यांनी उद्यापासून वस्त्यावस्त्यांमध्ये जाऊन नागरिकांच्या पाण्यासंदर्भातील तक्रारी सोडवाव्यात. लोकांच्या तक्रारी सोडवल्या गेल्या नाहीत तर प्रत्येक अभियंत्यावर कडक कारवाईचा इशारा पालकमंत्र्यांनी याप्रसंगी दिला. तसेच आयुक्तांनी झोननिहाय पाणीटंचाईसाठी दौरा करावा व नगरसेवकांना सोबत घेऊन नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.काँग्रेसचा मनपावर हल्लाबोलनागपूर : ऐन उन्हाळ्यात शहराच्या अनेक भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी व निवेदने देऊ नही नागरिकांना पाणीपुरवठा होत नसल्याने सोमवारी काँग्रेसतर्फे महापालिका कार्यालयावर हल्लाबोल केला. आंदोलकांनी कार्यालयाच्या गेटवर व महापौरांच्या कक्षात माठ फोडून संताप व्यक्त केला. शहरातील सर्व भागातील नागरिकांना मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा. यासाठी आॅरेंज सिटी वॉटर वर्क्सला (ओसीडब्ल्यू) कंत्राट देण्यात आला. ओसीडब्ल्यूने शहराच्या विविध भागात पाण्याची लाईन टाकण्याचे काम केले. त्यानंतरही उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच शहराच्या अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाईची समस्या मार्गी लागावी, यासाठी शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर व अ‍ॅड. अभिजित वंजारी आदींच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. ओसीडब्ल्यू कंपनीने शहरात पाण्याची लाईन टाकून नवीन मीटर बसविले. परंतु त्यानंतरही काही भागात २० मिनिटेच पाणी मिळत आहे. दुसरीकडे कंपनीचे कर्मचारी वाढीव बिल पाठवून कमी करण्यासाठी पैशाची मागणी करीत आहे. वाढीव बिल न भरल्यास तीन दिवसात नळ जोडणी खंडित करण्याची नोटीस बजावली जात आहे. महापालिका व पदाधिकाऱ्यांचा शहरात २४ तास पाणीपुरवठा होत असल्याचा दावा फोल ठरत आहे. यामुळे ओसीडब्ल्यू कंपनीचा कंत्राट रद्द करण्यात यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. शहरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी विकास ठाक रे, संजय महाकाळकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महापौर नंदा जिचकार व आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनातून केली. पाणी टंचाईची समस्या सोडविण्याचे निर्देश ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना देण्यात येईल. तसेच झोननिहाय आढावा घेण्याचे आश्वासन नंदा जिचकार यांनी शिष्टमंडळाला दिले. आंदोलनात माजी उपमहापौर अण्णाची राऊत, नगरसेवक मनोज सांगोळे, परसराम मानवटकर, हर्षला साबळे, भावना लोणारे, नेहा निकोसे, स्नेहा निकोसे, रमेश पुणेकर, दर्शना धवड, दिनेश यादव, माजी नगरसेवक प्रशांत धवड, देवा उसरे, रमण पैगवार, किशोर गजभिये, वासुदेव ढोके, दिनेश तराळे, शीतल घरत, प्रवीण आगरे, अमान खान, इर्शाद शेख, पंजक निघोट, जॉन थॉमस, काँग्रेसचे नगरसेवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)