शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
4
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
5
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
6
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
7
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
8
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
9
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
10
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
11
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
12
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
13
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
14
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
15
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
16
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
17
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
18
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
19
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
20
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."

‘सर्जा-राजा’शिवाय शेतीत जिवंतपणा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2016 03:06 IST

शेतात राबताना शेतकऱ्याला सदैव त्याच्या सर्जा-राजाची सोबत होती. नांगरणी, वखरणी करताना त्याला रागावणे.

निशांत वानखेडे नागपूरशेतात राबताना शेतकऱ्याला सदैव त्याच्या सर्जा-राजाची सोबत होती. नांगरणी, वखरणी करताना त्याला रागावणे. उसंत मिळाली की त्याला चारा घालून नंतरच स्वत:च्या पोटात भाकरी घालताना त्याचे प्रेम दिसायचे. दिवसभर शेतात काम करताना या नि:शब्द सोबत्यासोबत त्याच्या सुखदु:खाच्या गोष्टी चालयच्या. राग, लोभ सार काही त्याला सांगणे असायचे. काळ बदलला. लोखंडी यंत्रानी शेतीत शिरकाव केला आणि या मित्राची सोबत कमी झाली. मात्र या जिवलग मित्राशिवाय शेतकऱ्याच्या जगण्यात राम नाही. सर्जा-राजाशिवाय शेतीत जिवंतपणा नाही. पोळ्याच्या खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावना गहन अर्थ सांगणाऱ्या आहेत. पोळा सणात बैल हा केंद्रबिंदू असला, तरी त्याचा आशय व्यापक अर्थाने पशुधनाबाबत आहे. वर्षभर आपल्या कारभाऱ्याच्या बरोबरीने मेहनत करणारा, त्याच्या सुख-दु:खाचा साथीदार असलेला बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र. या मित्राने आपल्या कुटुंबासाठी केलेल्या ऋणातून उतराई होण्यासाठी पोळ्याचे महत्त्व. एक मित्र म्हणून पशुप्रेमाचे हे अनोखे उदाहरण जगात न सापडणारे आहे. काळ बदलला. यांत्रिकीकरणाचं युग अवतरलं. बैलाच्या जागी ट्रॅक्टर आला. दिवसागणिक ट्रॅक्टरांची संख्या वाढू लागली. कधीकाळी जनावरांनी समृद्ध असलेल्या दावणी, गोठे ओस पडू लागले. ट्रॅक्टरने मेहनत सोपी केली. पण अनेक शेतीमित्रांना शेतीतून हद्दपार केले. शेतात राबणारे बैल, दुभत्या गाई, म्हशी ही खरी दौलत होती. शेतीची शान होती. सर्जा-राजाह्णची जोडी आणि गाई, म्हशी, शेळ्या असे पशुधन होते, तोवर शेतीमध्ये एक वेगळा जिवंतपणा होता. ही मुकी जनावरे शेतकरी कुटुंबाचे अविभाज्य घटक असायचे. आज हे नि:शब्द नातलग शेतकरी कुटुंबापासून जणू विभक्त झाले आहेत. त्यांची जागा ट्रॅक्टर, हार्वेस्टर, उपनेर अशा यंत्रांनी घेतली. मात्र पूर्वीसारखी भावनिकता येणे शक्य नाही. परंतु आता घड्याळाचे काटे उलटे फिरवता येणार नाहीत. आजचे प्रश्न वेगळे आहेत, आजचा काळ वेगळा आहे आणि परिस्थितीही. त्याला सामोरे जाण्यासाठी कल्पक मार्ग शोधले पाहिजेत, यात दुमत नाही. परंपरेचे धागे विरू न देता ते आव्हान कसे पेलायचे हाच खरा पेच आहे. महाग तरी घेतला सोबत्याचा साजसर्वत्र वाढलेल्या महागाईचे सावट बैलांच्या साजसामानावरही दिसून येत आहे. मात्र कितीही महाग झाले तरी सर्जा-राजाचा साज खरेदी करण्यात शेतकरी मागे नाहीत. कॉटन मार्केट चौक परिसरात असलेल्या पोळ्याच्या खरेदीसाठी शहराच्या आसपास राहणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. येथील एक दुकानदाराने सांगितले की, साजसामानाच्या किमती दरवर्षी १५ ते २० टक्क्यांनी वाढतात. यावर्षीही सामानाच्या किमती वाढल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या उत्साहात कमतरता नसल्याचे त्यांनी सांगितले. बाजारात बैलांच्या चौरंग-मटाटे, कासरा, येसन, घुंगराचा पट्टा, झुली, गेरू, रंगाचे शिक्के, गोंडे, मोत्यांच्या, रंगीत दोरखंड, मोराचे पंख, बाशिंग, कवडयांच्या माळा मोठ्या प्रमाणात विक्रीला आल्या आहेत. बैल सजावटीच साहित्य यावेळी चांगलेच महागले आहे. ३०-४० रुपयांपासून ९००-१००० रुपयापर्यंतची साहित्य आहेत. तरीही खरेदीदारांची कमी नाही. शेतकरी हौसेने लाडक्या बैलांसाठी या वस्तूंची खरेदी करीत आहेत. यातील काही शेतकऱ्यांशी लोकमत प्रतिनिधीने संवाद साधला. बैलाचे महत्त्व कमी नाहीआज शेतीची ७५ टक्के कामे ट्रॅक्टर किंवा इतर यंत्रांनी होत असली तरी बैलांची जागा हे यंत्र घेऊ शकत नाही. लहान शेतकऱ्यांना या यंत्राचे भाडे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे बैलांची मदत घ्यावीच लागते. मोठ्या शेतकऱ्यांची कामेही बैलाशिवाय शक्य नाही. त्यामुळे बैलाची एकतरी जोडी अंगणात असली तरच आनंदी वाटते. तो आमचा खरा मित्र आहे. त्यामुळे पोळ्याचा साज कीतीही महागला तरी या उत्सवात कमतरता होणार नाही.- तिलक कन्हेरे, कवडसातो आहे म्हणून आम्ही आहोतबैलजोडी आणि पशुधनाची संख्या कमी झाली म्हणून शेतकऱ्यांच्या जीवनाला अवकळा आली आहे. जीवनभर सोबत राबणाऱ्या या मित्राला म्हातारपणी कसायाला विकण्याचा विचार केला जातो. धन्याने हे पाप करू नये. लोखंडी यंत्र आले तरी बैलाशिवाय काम निघत नाही. तो आहे म्हणून आम्ही आहोत.- मोतीराम पाटील, माहूरझरीमहाग झाला तरी साज आवश्यककोणतेही सण-उत्सव आमच्यासाठी मोठे नाही. मात्र हा सण आमच्या लाडक्या बैलाचा आहे. माझ्याकडे चार एकर शेती आहे व एक बैलाची जोडी आहे. शेतीतील सर्व काम यांच्या मदतीने करतो. बैलजोडी म्हणजे आमचे दैवत आहे. पोळ्याचा साज दरवर्षी महागतो. मात्र हा साज घेतल्याने आणि बैलांना सजविण्यात वेगळा आनंद मिळतो. - गुलाबराव रंदई, हिंगणा