शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

परभणी-बीडवरून संताप, विरोधकांचा सभात्याग; सरपंच हत्येप्रकरणी उद्या स्वतंत्र चर्चा: अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 05:31 IST

माजी मंत्री काँग्रेसचे नितीन राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी परभणीतील घटनेनंतर दलित चळवळीतील कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी जनतेत उद्रेक आहे, याकडे लक्ष वेधले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : परभणी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना व बीड जिल्ह्यातील सरपंच हत्येप्रकरणी सरकार गंभीरपणे कारवाई करत नसल्याचा आरोप करत विरोधी पक्ष सदस्यांनी मंगळवारी विधानसभेत सभात्याग केला.

माजी मंत्री काँग्रेसचे नितीन राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी परभणीतील घटनेनंतर दलित चळवळीतील कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी जनतेत उद्रेक आहे, याकडे लक्ष वेधले. सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या लाठीमारात झाला. त्यांच्या अंत्ययात्रेत हृदयविकाराचा झटका येऊन दलित चळवळीचे खंदे नेते विजय वाकोडे यांचा मृत्यू झाला. याकडे राऊत यांनी लक्ष वेधले. 

सरकारला परभणीच्या घटनेचे गांभीर्य नाही, असा आरोप पटोले यांनी केला. सरकारने तत्काळ आजच चर्चा घेतली नाही तर या घटनेचे आणखी पडसाद उमटतील, असे राऊत म्हणाले. त्यावर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, परभणीच्या घटनेप्रकरणी बुधवारी चर्चा सभागृहात होईल, असे मी कालच सभागृहात हा विषय आला तेव्हा सांगितले होते. त्यानुसार ही चर्चा होणार आहे. सरकारला गांभीर्य नसते तर स्वतंत्र चर्चा घेतली नसती. सभागृहाचे कामकाज नियमानुसार चालवायचे की नाही या शब्दांत त्यांनी विरोधकांना समज दिली.

अटक का नाही? : क्षीरसागर

शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण उचलले. ते म्हणाले की, ही हत्या अत्यंत निघृणपणे दिवसाढवळ्या करण्यात आली. तीन आरोपींना पकडले आहे; पण चार जण फरार आहेत. या हत्याप्रकरणात वाल्मीक कराड ही व्यक्त्ती आहे, ती गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे; पण अजून मोकाट आहे. त्याला तत्काळ अटक करा. त्याचे आणि आरोपींचे गेल्या काही महिन्यांतील कॉल रेकॉर्ड तपासा, वाल्मीक कराडचा या हत्येतील सहभाग समोर येईल, असे क्षीरसागर म्हणाले. बीड जिल्ह्यात या हत्येप्रकरणी मोठा असंतोष आहे, मोठे आंदोलन उभे राहील, मोर्चे निघतील. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखा. मुख्यमंत्री महोदय आपण आव्हान म्हणून गडचिरोलीची जबाबदारी घेतली होती, तशीच आता बीडचे गुन्हेगारीकरण थांबविण्यासाठी जबाबदारी घ्या असे आवाहन क्षीरसागर यांनी केले. भाजपच्या नमिता मुंदडा यांनी सभागृहात संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

होय, वाल्मीक कराड माझे जवळचे : मुंडे

वाल्मीक कराड हे माझे निकटवर्तीय आहे, अशी कबुली मंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मात्र सरपंच संजय देशमुख यांच्या खून प्रकरणात माझा संबंध लावला जातोय, हे चुकीचे आहे. मुख्यमंत्री प्रकरणात सविस्तर निवेदन करणार आहे. देशमुख यांचा खून ही दुर्दैवी घटना आहे, या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी