शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

परभणी-बीडवरून संताप, विरोधकांचा सभात्याग; सरपंच हत्येप्रकरणी उद्या स्वतंत्र चर्चा: अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 05:31 IST

माजी मंत्री काँग्रेसचे नितीन राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी परभणीतील घटनेनंतर दलित चळवळीतील कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी जनतेत उद्रेक आहे, याकडे लक्ष वेधले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : परभणी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना व बीड जिल्ह्यातील सरपंच हत्येप्रकरणी सरकार गंभीरपणे कारवाई करत नसल्याचा आरोप करत विरोधी पक्ष सदस्यांनी मंगळवारी विधानसभेत सभात्याग केला.

माजी मंत्री काँग्रेसचे नितीन राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी परभणीतील घटनेनंतर दलित चळवळीतील कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी जनतेत उद्रेक आहे, याकडे लक्ष वेधले. सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या लाठीमारात झाला. त्यांच्या अंत्ययात्रेत हृदयविकाराचा झटका येऊन दलित चळवळीचे खंदे नेते विजय वाकोडे यांचा मृत्यू झाला. याकडे राऊत यांनी लक्ष वेधले. 

सरकारला परभणीच्या घटनेचे गांभीर्य नाही, असा आरोप पटोले यांनी केला. सरकारने तत्काळ आजच चर्चा घेतली नाही तर या घटनेचे आणखी पडसाद उमटतील, असे राऊत म्हणाले. त्यावर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, परभणीच्या घटनेप्रकरणी बुधवारी चर्चा सभागृहात होईल, असे मी कालच सभागृहात हा विषय आला तेव्हा सांगितले होते. त्यानुसार ही चर्चा होणार आहे. सरकारला गांभीर्य नसते तर स्वतंत्र चर्चा घेतली नसती. सभागृहाचे कामकाज नियमानुसार चालवायचे की नाही या शब्दांत त्यांनी विरोधकांना समज दिली.

अटक का नाही? : क्षीरसागर

शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण उचलले. ते म्हणाले की, ही हत्या अत्यंत निघृणपणे दिवसाढवळ्या करण्यात आली. तीन आरोपींना पकडले आहे; पण चार जण फरार आहेत. या हत्याप्रकरणात वाल्मीक कराड ही व्यक्त्ती आहे, ती गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे; पण अजून मोकाट आहे. त्याला तत्काळ अटक करा. त्याचे आणि आरोपींचे गेल्या काही महिन्यांतील कॉल रेकॉर्ड तपासा, वाल्मीक कराडचा या हत्येतील सहभाग समोर येईल, असे क्षीरसागर म्हणाले. बीड जिल्ह्यात या हत्येप्रकरणी मोठा असंतोष आहे, मोठे आंदोलन उभे राहील, मोर्चे निघतील. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखा. मुख्यमंत्री महोदय आपण आव्हान म्हणून गडचिरोलीची जबाबदारी घेतली होती, तशीच आता बीडचे गुन्हेगारीकरण थांबविण्यासाठी जबाबदारी घ्या असे आवाहन क्षीरसागर यांनी केले. भाजपच्या नमिता मुंदडा यांनी सभागृहात संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

होय, वाल्मीक कराड माझे जवळचे : मुंडे

वाल्मीक कराड हे माझे निकटवर्तीय आहे, अशी कबुली मंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मात्र सरपंच संजय देशमुख यांच्या खून प्रकरणात माझा संबंध लावला जातोय, हे चुकीचे आहे. मुख्यमंत्री प्रकरणात सविस्तर निवेदन करणार आहे. देशमुख यांचा खून ही दुर्दैवी घटना आहे, या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी