शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

हे तर ईव्हीएम सरकार, जनतेसाठी लढतील सर्व विरोधी पक्ष; विरोधकांनी सरकारला घेरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 05:53 IST

विरोधी पक्षाने घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करीत संख्याबळ कमी असतानाही विरोधी पक्ष सरकारला दिशा देणारे ठरेल असा दावा केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : संख्याबळ कमी असतानाही हिवाळी अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्याचा दावा करत विरोधी पक्षाने रविवारी नवे महायुती सरकार ईव्हीएम सरकार असल्याचे जाहीर केले. रविवारी विरोधी पक्षाने घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करीत विरोधी पक्ष सरकारला दिशा देणारे ठरेल असा दावा केला आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, राज्यातील जनतेमध्ये ईव्हीएम विरोधात रोष आहे. मारकडवाडीत सरकारने बॅलेट पेपरवर मॉक व्होटिंग करू दिले नाही. सोयाबीन, कापसाला भाव मिळत नाही. दुधाचे दर सरकारनेच कमी केले. अशा स्थितीत हे सरकार शेतकरीविरोधी असल्याचे स्पष्ट होत आहे. हे खुनी सरकार आहे. राज्यातील उद्योगधंदे गुजरातमध्ये स्थलांतरित होत आहेत. राज्य कर्जाच्या जाळ्यात अडकले. डिसेंबरमध्ये घ्यायचे कर्ज आधीच घेतले आहे, असा आरोप करीत विरोधी पक्ष राज्यातील जनतेसाठी लढतील, असा दावाही करण्यात आला.

विधीमंडळाचे कामकाज नियम व परंपरांच्या आधारे चालते. अशा स्थितीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते निवडण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. विरोधक सभापतींचा आदर करतात. ते याबाबत योग्य तो निर्णय घेतील, अशी अपेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केली. यावेळी विरोधी पक्षनेतेपदावरून कुठलेही मतभेद नसल्याचा दावाही विरोधी पक्षनेत्यांनी केला. सर्वजण एकत्रच असल्याचे स्पष्ट केले.

बीडमधील ‘डॉन ऑफ इटली’

बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीकी कराड याचे वर्तन हे 'गॉडफादर' चित्रपटातील 'डॉन ऑफ इटली'सारखे असल्याचे त्यांनी सांगितले. ही घटना राज्याने आता कोणती वाटचाल केली आहे, याचे द्योतक आहे. 

अधिवेशनाचा कालावधी वाढवावा

विजय वडेट्टीवार यांनी हिवाळी अधिवेशनाचा कालावधी केवळ पाच ते सहा दिवस ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. नागपूर करारासह अन्य करारांचे हे उघड उल्लंघन आहे, असे ते म्हणाले. विदर्भातील व्यक्ती मुख्यमंत्री असतानाही अधिवेशनाचा कालावधी कमी करणे हा विदर्भावर अन्याय आहे. याबाबत शासनाकडून उत्तर मागविण्यात येणार असून मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

काँग्रेसच्या गटनेत्याची निवड मंगळवारी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत काँग्रेस आमदार गटाच्या नेत्याची निवड केली जाईल, असे सांगितले. बनावट औषधे, कायदा आणि सुव्यवस्था, प्रिय भगिनींना तपासाशिवाय २१०० रुपये देणे, पेपर फुटणे, दोन लाख लोकांची भरती आदी प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. याशिवाय बीड प्रकरणाची सीबीआय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी