शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी विधिमंडळ अधिवेशन : दोन दिवसात २ तास २७ मिनिटे चालले सभागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 21:12 IST

सोमवारपासून सुरू झालेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन केवळ सहा दिवसात संपणार आहे. परंतु गेल्या दोन दिवसात केवळ २ तास २७ मिनिटेच सभागृहात कामकाज होऊ शकले.

ठळक मुद्देयातही ५० मिनिटे वाया गेले कामकाजराज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चाही होऊ शकली नाहीप्रश्नोत्तरे नाहीच, पण लक्षवेधी सूचनाही पुढे ढकलाव्या लागल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारपासून सुरू झालेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन केवळ सहा दिवसात संपणार आहे. परंतु गेल्या दोन दिवसात केवळ २ तास २७ मिनिटेच सभागृहात कामकाज होऊ शकले. यातही ५० मिनिटांचे कामकाज गोंधळामुळे स्थगित करावे लागले. इतकेच नव्हे तर राज्यपालांच्या अभिभाषणावर आतापर्यंत चर्चाही सुरू होऊ शकली नाही.सोमवारी हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होताच भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेवरून गोंधळ घातला. १ तास २१ मिनिटांचे कामकाज झाल्यानंतर सभागृह दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. यादरम्यानही १० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. मंगळवारी सभागृहात बॅनर फडकवणे व ते हिसकावण्याच्या मुद्यावर जोरदार गोंधळ झाला. सदस्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. गोंधळामुळे केवळ १ तास ६ मिनिटांचेच कामकाज होऊ शकले. यादरम्यान ४० मिनिटांचे कामकाज स्थगित करावे लागले. ठरलेल्या कार्यक्रमानुसार राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू होणार होती. अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहातील गोंधळ लक्षात घेता ही चर्चा बुधवारी सुरू करण्याची घोषणा केली. याचपकारे तीन लक्षवेधी सूचनाही सादर होणार होत्या. गोंधळामुळे या सूचनाही पुढे ढकलाव्या लागल्या.यंदा प्रश्नोत्तरेही ठेवण्यात आलेली नाही. अशावेळी आमदारांकडे स्थानिक समस्या मांडण्यासाठी केवळ लक्षवेधी सूचना हे मोठे माध्यम आहे. परंतु गोंधळामुळे ते सुद्धा होऊ शकले नाही. विदर्भातील समस्यांबाबत सत्तापक्षाद्वारे सादर प्रस्तावावरसुद्धा चर्चा सुरू होऊ शकली नाही. या प्रस्तावात मिहान, बेरोजगारी, सिंचन प्रकल्प, पर्यटन विकासासारखे मुद्दे उपस्थित केले होते, हे विशेष.गोंधळातच चार विधेयके मंजूरदरम्यान या गोंधळातच सत्तापक्षाने पहिल्या दिवशी पूरक मागण्या सादर केल्या. यासोबतच सोमवारी सादर करण्यात आलेले चार विधेयके चर्चा न होताच मंजूर करण्यात आल्या. आता हे विधेयक विधान परिषदेत सादर केले जातील. या विधेयकांमध्ये नगर पंचायतीमधील सदस्यास पक्षांतर करण्यास बंदी, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका टाळणे व महसूल कर्मचाऱ्यांना अवैध उत्खननाचे साहित्य व उपकरण जप्त करण्याचा अधिकाराचा समावेश आहे.सभागृहात जे झाले ते अशोभनीय - नाना पटोलेमंगळवारी विधानसभेत सदस्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी चिंता व्यक्त केली. ही घटना महाराष्ट्राच्या विधिमंडळला अशोभनीय घटना असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांसमोर बॅनर फडकवणे चुकीचे आहे. ही निंदनीय घटना आहे. कुणालाही कुणाकडे धावून जाण्याची परवानगी नाही. सभागृहातील सर्व आपत्तीजनक गोष्टी नोट केल्या जात आहेत. भविष्यात असे होऊ नये. सत्तापक्ष व विरोधी पक्षातील सर्व सदस्यांनी याची खबरदारी घ्यावी, असेही ते म्हणाले.घोषणांच्या प्रॅक्टीससाठी भरपूर वेळ देणार - जयंत पाटीलदरम्यान वित्तमंत्री जयंत पाटील म्हणाले, विरोधी पक्ष नारेबाजी व घोषणा देण्याचे विसरले आहेत. त्यांना कशा घोषणा द्यायच्या याची प्रॅक्टीस करावी लागले, यासाठी त्यांना भरपूर वेळ आम्ही देऊ. भाजपाला शेतकऱ्यांची चिंता करण्याची गरज नाही. त्यांना शेतकऱ्यांचा किती पुळका आला आहे, हे शेतकऱ्यांनाही माहीत आहे. त्यामुळेच ते आज विरोधी पक्षात आहेत.

 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर