शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

विदेशासारखा दंड केला, तरच आम्ही सुधारणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 12:30 IST

दंड आणि शिक्षेचे कलम वाढविल्यावरच आम्ही सुधारणार आहोत का, असा प्रश्न विचारण्याची पाळी आता आली आहे.

ठळक मुद्देजनता कर्फ्यू सुटताच फटाके फुटले बिनधास्त फिरले नागपूरकर, अनेकांना नव्हती १४४ कलमाची तमा!

गोपालकृष्ण मांडवकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि ही साखळी तोडण्यासाठी पंतप्रधानांनी २२ मार्चला जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. लोकांनी तो पाळलेही. पण दिवसभर कमावले, अन् संध्याकाळी गमावले, अशी स्थिती शहरातील काही भागात दिसली. लोकांनी फटाके फोडले, कुणी थेट रस्त्यावर येऊन नृत्य केले तर कुणी नेतागिरी करण्याची संधी साधत रॅलीही काढण्याचा प्रयत्न केला. हे सर्व पाहू जाता, विदेशासारखा दंड आणि शिक्षा केली तरच आम्ही सुधारणार का, असा प्रश्न विचारण्याची पाळी आली आहे.कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केले आहे. आॅटो, शहर बस सेवा, रेल्वे सेवाही ठप्प केली आहे. हे आदेश आता ३१ मार्चपर्यंत राहणार आहेत. या काळात जनता एकमेकांच्या संपर्कात कमी यावी, त्यातून कोरोनाचा प्रसार टळावा, कोरोनाचे जंतू संपर्कात न आल्याने नैसर्गिकरीत्या नष्ट व्हावेत, हा त्यामागील हेतू आहे. या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी जमावबंदीचे १४४ कलमही लावले आहेत. तरीही अनेक अतिउत्साही लोकांनी कर्फ्यू कसा आहे, या उत्सुकतेपोटी शहरात मित्रांसह फेरफटका मारण्याचा प्रयत्न केला. कुणी निर्मनुष्य रस्त्यावर सेल्फी काढून सोशल मीडियावरून आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शनही केले. फटाक्यांमुळे प्रदूषण होते हे माहीत असतानाही सायंकाळी फटाके फोडून आपल्या मूर्खपणाचे दर्शन घडविले. त्यामुळे आम्ही एवढे बेफिकीर कसे, असा प्रश्न आता अनेकांच्या मनात निर्माण होत आहे.संपूर्ण जग कोरोनासाठी कडक उपाययोजना करीत आहे. भारतामध्येही कायद्याचा वापर यासाठी केला जात आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतामधील दंडाची आणि शिक्षेची रक्कम कमी आहे. युरोपियन राष्ट्रानी कोरोनाच्या काळात कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. जर्मनी, इटली, स्पेन, पोलंड, स्वित्झर्लंड, फ्रान्स, नेदरलँड, आॅस्ट्रिया यासारख्या राष्ट्रानी नागरिकांवर कडक निर्बंध लादले आहेत. कुणी घराबाहेर निघाला किंवा रस्त्यावर आला तर त्याला पोलीस थेट उचलून नेतात. कुठे नेतात, त्याचे काय करतात, याचा थांगपत्ताही लागत नाही, असे अनुभव तिथे राहणाऱ्या भारतीयांनी सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. युरोपमध्ये तर फिरताना आढळल्यास २४ हजार ते ४० हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारणे सुरू केले आहे. जर्मनीमध्ये १२ वर्षांची कैद सुनावली जात आहे. चीनमध्येही अशीच स्थिती आहे. भारतामध्येही अशाचप्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी १४४ कलम लावले आहे, मात्र नागरिक बेफिकिर आहेत. चौकातील पोलीस फार तर चार दंडुके मारतील आणि समज देऊन सोडून देतील, असा सर्वांचा समज असेल तर, कदाचित कायद्यालाही कडक व्हावे लागेल. म्हणूनच दंड आणि शिक्षेचे कलम वाढविल्यावरच आम्ही सुधारणार आहोत का, असा प्रश्न विचारण्याची पाळी आता आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस