शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शाळा-महाविद्यालयांना लागणार का ‘ब्रेक’ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘कोरोना’ नियंत्रणात आल्याने शासनाने शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, आता विदर्भात व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘कोरोना’ नियंत्रणात आल्याने शासनाने शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, आता विदर्भात व विशेषत: नागपुरात परत ‘पॉझिटिव्ह’ची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शाळा-महाविद्यालयांत नावापुरतेच ‘सोशल डिस्टन्सिंग’ व इतर निर्देशांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘कोरोना’चा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी ‘ब्रेक’ मिळणार का, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

शासन निर्णयानुसार अगोदर शाळा सुरू करण्यात आल्या. आता तर पाचवीपासूनच्या शाळादेखील सुरू झाल्या असून, वर्गदेखील नियमित होत आहेत. नागपूर जिल्ह्यातील दोन हजार ७८० शाळांमध्ये पाचवी ते दहावीच्या साडेसहा लाख विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. त्यातील अडीच लाखांहून अधिक विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात उपस्थिती लावत आहेत. मात्र, अनेक शाळांत विद्यार्थी ‘मास्क’ लावत नसल्याचे दिसून आले आहे.

दुसरीकडे नागपूर जिल्ह्यात विद्यापीठाशी संलग्नित सुमारे तीनशे महाविद्यालये असून, तेथे लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पहिले दोन दिवस विद्यार्थ्यांची वर्गखोल्यांतील उपस्थिती संमिश्र राहिली. अनेक महाविद्यालयांत विद्यार्थी आले, मात्र ते वर्गखोलीत न जाता परिसरातच घुटमळत असल्याचे निदर्शनास आले. त्यातही ‘सोशल डिस्टन्सिंग’ वगैरे बाबी जास्त गंभीरतेने पाळल्या जात नसल्याने धोका संभवण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यात परत ‘कोरोना’चे आकडे वाढत असताना आता तातडीने उपाययोजना करून शाळा-महाविद्यालयांना ‘ब्रेक’ लावण्यात यावा, अशी मागणी काही पालकांकडून करण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात जिल्हा प्रशासन किंवा विद्यापीठाने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. , जिल्हा प्रशासन पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे, सध्या तरी शाळा बंद करण्याचा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले.

विद्यापीठाची भूमिका, जिल्हा प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करणार

शासनाच्या निर्देशांनुसार आम्ही महाविद्यालयांत प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली. जिल्हा प्रशासनाकडून आम्हाला अद्याप तात्पुरता ‘ब्रेक’ घेण्याचे कुठलेही निर्देश आलेले नाही. स्थानिक प्रशासनाच्या निर्देशांचेच विद्यापीठ पालन करेल, असे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी स्पष्ट केले.