शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

पटोले राजकीय संन्यास घेणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 01:29 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचा आपण नक्कीच पाच लाख मतांनी पराभव करू, असा दावा करीत गडकरींकडून आपला पराभव झाला तर आपण राजकीय संन्यास घेऊ, असे आव्हान काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी दिले होते. आता गडकरी यांच्या एकतर्फी विजयामुळे पटोले हे राजकीय संन्यास घेतील का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देपटोले यांनी गिरीश महाजनांना दिले होते आव्हान : राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचा आपण नक्कीच पाच लाख मतांनी पराभव करू, असा दावा करीत गडकरींकडून आपला पराभव झाला तर आपण राजकीय संन्यास घेऊ, असे आव्हान काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी दिले होते. आता गडकरी यांच्या एकतर्फी विजयामुळे पटोले हे राजकीय संन्यास घेतील का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.निकालाच्या दोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत काँग्रेसचे नाना पटोले व भाजपाचे नेते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमोरासमोर होते. या चर्चेत पटोले यांनी आपण गडकरी यांना पाच लाख मतांनी पराभूत करू, असा छातीठोक दावा केला. यावर महाजन यांनी तुम्ही फक्त एका मतांनी गडकरींना हरवून दाखवा, मी राजकीय संन्यास घेईल, असे जाहीर केले. पण गडकरी जिंकले तर तुम्हालाही राजकीय संन्यास घ्यावा लागेल, असे प्रतिआव्हान त्यांनी पटोले यांना दिले. पटोले यांनीही जोशात आपणच जिंकू, असा दुबार दावा करीत महाजन यांचे आव्हान स्वीकारले. यावर महाजन यांनी पटोले यांना पुन्हा शब्दावर कायम राहण्याची आठवण करून देत निकालानंतर राजकीय जीवनात दिसू नका, असे स्पष्ट केले. यावर पटोले यांनी शब्दावर कायम राहून राजकीय संन्यास घेऊ, असे जाहीर केले होते.पहिल्याच फेरीत गडकरी यांनी आघाडी घेताच मतमोजणी केंद्रावर पटोले-महाजन यांच्यातील आव्हानाची चर्चा रंगली. पटोले आता राजकीय संन्यास घेतील का, असा चिमटा भाजपा कार्यकर्ते काँग्रेस कार्यकर्त्यांना घेऊ लागले. नागपूरसह राज्याच्या राजकीय वर्तुळातही याचीच चर्चा रंगली होती. आपण शब्दावर कायम राहणारे नेते आहेत. बोलतो तसेच करून दाखवतो. वैयक्तिक नफा-नुकसानीचा विचार करीत नाही, असे पटोले नेहमी सांगतात. आता पटोले त्यांनीच जाहीरपणे दिलेल्या शब्दावर कायम राहून राजकीय संन्यास घेतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.पटोलेंनी राजकीय संन्यास घेऊ नये- गडकरींची संयमी भूमिकालोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पटोले यांनी नितीन गडकरी यांच्यावर बरीच आगपाखड केली. वेळोवेळी त्यांना लक्ष्य केले. शेवटी गडकरींचा एकतर्फी विजय झाला. गिरीश महाजनांचे आव्हान स्वीकारून पटोले फसले. मात्र, त्यानंतरही गडकरी यांनी संयमी भूमिका घेतली. प्रसारमाध्यमांशी बोलताना गडकरी म्हणाले, निवडणूक प्रचारादरम्यान अभिनिवेशात अशाप्रकारे अनेक गोष्टी बोलल्या जातात आणि त्याला काही महत्त्व नाही.नाना पटोले यांनी राजकीय संन्यास घेऊ नये. निवडणुकीत जय-पराजय होतच असतो. त्यामुळे पटोले यांनी तसा विचार करू नये. भारताची लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि जनतेचा कौल स्वीकारणे हेच लोकशाहीसाठी चांगले आहे. गडकरी यांनी अशी सामंजस्याची भूमिका घेत राजकारणात व्यक्तिद्वेष नसावा, असा संदेश दिला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNana Patoleनाना पटोले