शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पटोले राजकीय संन्यास घेणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 01:29 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचा आपण नक्कीच पाच लाख मतांनी पराभव करू, असा दावा करीत गडकरींकडून आपला पराभव झाला तर आपण राजकीय संन्यास घेऊ, असे आव्हान काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी दिले होते. आता गडकरी यांच्या एकतर्फी विजयामुळे पटोले हे राजकीय संन्यास घेतील का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देपटोले यांनी गिरीश महाजनांना दिले होते आव्हान : राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचा आपण नक्कीच पाच लाख मतांनी पराभव करू, असा दावा करीत गडकरींकडून आपला पराभव झाला तर आपण राजकीय संन्यास घेऊ, असे आव्हान काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी दिले होते. आता गडकरी यांच्या एकतर्फी विजयामुळे पटोले हे राजकीय संन्यास घेतील का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.निकालाच्या दोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत काँग्रेसचे नाना पटोले व भाजपाचे नेते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमोरासमोर होते. या चर्चेत पटोले यांनी आपण गडकरी यांना पाच लाख मतांनी पराभूत करू, असा छातीठोक दावा केला. यावर महाजन यांनी तुम्ही फक्त एका मतांनी गडकरींना हरवून दाखवा, मी राजकीय संन्यास घेईल, असे जाहीर केले. पण गडकरी जिंकले तर तुम्हालाही राजकीय संन्यास घ्यावा लागेल, असे प्रतिआव्हान त्यांनी पटोले यांना दिले. पटोले यांनीही जोशात आपणच जिंकू, असा दुबार दावा करीत महाजन यांचे आव्हान स्वीकारले. यावर महाजन यांनी पटोले यांना पुन्हा शब्दावर कायम राहण्याची आठवण करून देत निकालानंतर राजकीय जीवनात दिसू नका, असे स्पष्ट केले. यावर पटोले यांनी शब्दावर कायम राहून राजकीय संन्यास घेऊ, असे जाहीर केले होते.पहिल्याच फेरीत गडकरी यांनी आघाडी घेताच मतमोजणी केंद्रावर पटोले-महाजन यांच्यातील आव्हानाची चर्चा रंगली. पटोले आता राजकीय संन्यास घेतील का, असा चिमटा भाजपा कार्यकर्ते काँग्रेस कार्यकर्त्यांना घेऊ लागले. नागपूरसह राज्याच्या राजकीय वर्तुळातही याचीच चर्चा रंगली होती. आपण शब्दावर कायम राहणारे नेते आहेत. बोलतो तसेच करून दाखवतो. वैयक्तिक नफा-नुकसानीचा विचार करीत नाही, असे पटोले नेहमी सांगतात. आता पटोले त्यांनीच जाहीरपणे दिलेल्या शब्दावर कायम राहून राजकीय संन्यास घेतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.पटोलेंनी राजकीय संन्यास घेऊ नये- गडकरींची संयमी भूमिकालोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पटोले यांनी नितीन गडकरी यांच्यावर बरीच आगपाखड केली. वेळोवेळी त्यांना लक्ष्य केले. शेवटी गडकरींचा एकतर्फी विजय झाला. गिरीश महाजनांचे आव्हान स्वीकारून पटोले फसले. मात्र, त्यानंतरही गडकरी यांनी संयमी भूमिका घेतली. प्रसारमाध्यमांशी बोलताना गडकरी म्हणाले, निवडणूक प्रचारादरम्यान अभिनिवेशात अशाप्रकारे अनेक गोष्टी बोलल्या जातात आणि त्याला काही महत्त्व नाही.नाना पटोले यांनी राजकीय संन्यास घेऊ नये. निवडणुकीत जय-पराजय होतच असतो. त्यामुळे पटोले यांनी तसा विचार करू नये. भारताची लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि जनतेचा कौल स्वीकारणे हेच लोकशाहीसाठी चांगले आहे. गडकरी यांनी अशी सामंजस्याची भूमिका घेत राजकारणात व्यक्तिद्वेष नसावा, असा संदेश दिला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNana Patoleनाना पटोले