शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पटोले राजकीय संन्यास घेणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 01:29 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचा आपण नक्कीच पाच लाख मतांनी पराभव करू, असा दावा करीत गडकरींकडून आपला पराभव झाला तर आपण राजकीय संन्यास घेऊ, असे आव्हान काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी दिले होते. आता गडकरी यांच्या एकतर्फी विजयामुळे पटोले हे राजकीय संन्यास घेतील का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देपटोले यांनी गिरीश महाजनांना दिले होते आव्हान : राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांचा आपण नक्कीच पाच लाख मतांनी पराभव करू, असा दावा करीत गडकरींकडून आपला पराभव झाला तर आपण राजकीय संन्यास घेऊ, असे आव्हान काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी दिले होते. आता गडकरी यांच्या एकतर्फी विजयामुळे पटोले हे राजकीय संन्यास घेतील का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.निकालाच्या दोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत काँग्रेसचे नाना पटोले व भाजपाचे नेते जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमोरासमोर होते. या चर्चेत पटोले यांनी आपण गडकरी यांना पाच लाख मतांनी पराभूत करू, असा छातीठोक दावा केला. यावर महाजन यांनी तुम्ही फक्त एका मतांनी गडकरींना हरवून दाखवा, मी राजकीय संन्यास घेईल, असे जाहीर केले. पण गडकरी जिंकले तर तुम्हालाही राजकीय संन्यास घ्यावा लागेल, असे प्रतिआव्हान त्यांनी पटोले यांना दिले. पटोले यांनीही जोशात आपणच जिंकू, असा दुबार दावा करीत महाजन यांचे आव्हान स्वीकारले. यावर महाजन यांनी पटोले यांना पुन्हा शब्दावर कायम राहण्याची आठवण करून देत निकालानंतर राजकीय जीवनात दिसू नका, असे स्पष्ट केले. यावर पटोले यांनी शब्दावर कायम राहून राजकीय संन्यास घेऊ, असे जाहीर केले होते.पहिल्याच फेरीत गडकरी यांनी आघाडी घेताच मतमोजणी केंद्रावर पटोले-महाजन यांच्यातील आव्हानाची चर्चा रंगली. पटोले आता राजकीय संन्यास घेतील का, असा चिमटा भाजपा कार्यकर्ते काँग्रेस कार्यकर्त्यांना घेऊ लागले. नागपूरसह राज्याच्या राजकीय वर्तुळातही याचीच चर्चा रंगली होती. आपण शब्दावर कायम राहणारे नेते आहेत. बोलतो तसेच करून दाखवतो. वैयक्तिक नफा-नुकसानीचा विचार करीत नाही, असे पटोले नेहमी सांगतात. आता पटोले त्यांनीच जाहीरपणे दिलेल्या शब्दावर कायम राहून राजकीय संन्यास घेतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.पटोलेंनी राजकीय संन्यास घेऊ नये- गडकरींची संयमी भूमिकालोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पटोले यांनी नितीन गडकरी यांच्यावर बरीच आगपाखड केली. वेळोवेळी त्यांना लक्ष्य केले. शेवटी गडकरींचा एकतर्फी विजय झाला. गिरीश महाजनांचे आव्हान स्वीकारून पटोले फसले. मात्र, त्यानंतरही गडकरी यांनी संयमी भूमिका घेतली. प्रसारमाध्यमांशी बोलताना गडकरी म्हणाले, निवडणूक प्रचारादरम्यान अभिनिवेशात अशाप्रकारे अनेक गोष्टी बोलल्या जातात आणि त्याला काही महत्त्व नाही.नाना पटोले यांनी राजकीय संन्यास घेऊ नये. निवडणुकीत जय-पराजय होतच असतो. त्यामुळे पटोले यांनी तसा विचार करू नये. भारताची लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि जनतेचा कौल स्वीकारणे हेच लोकशाहीसाठी चांगले आहे. गडकरी यांनी अशी सामंजस्याची भूमिका घेत राजकारणात व्यक्तिद्वेष नसावा, असा संदेश दिला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNana Patoleनाना पटोले