शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

नागपुरातील ‘स्मृती’ चित्रपटगृह होणार बंद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 22:00 IST

शहराच्या सिने-सांस्कृतिक क्षेत्रातील वैभव ठरलेल्या आणि गेल्या ३३ वर्षांपासून सिनेप्रेमींसाठी नवनव्या सिनेमांची पर्वणी घेऊन येणाऱ्या स्मृती सिनेमागृहाची दारे आता प्रेक्षकांसाठी बंद होणार आहेत. नवा सिनेमा लागला की गर्दी करताना, तिकिटांसाठी झुंबड उडताना आणि प्रसंगी ब्लॅकने तिकीट खरेदी करताना मिळालेल्या आठवणी आता स्मृतिशेष राहणार. २५ वर्षांच्या ‘लीज’वर बांधण्यात आलेल्या या चित्रपटगृहाची लीज संपली असून, त्याच्या नूतनीकरणासाठी चाललेल्या वाटाघाटी सुटत नसल्याने हे सिनेमागृह बंद होण्याचे संकेत मिळत आहेत.

ठळक मुद्देसिनेप्रेमींच्या वैभवाची ‘लीज’ दुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराच्या सिने-सांस्कृतिक क्षेत्रातील वैभव ठरलेल्या आणि गेल्या ३३ वर्षांपासून सिनेप्रेमींसाठी नवनव्या सिनेमांची पर्वणी घेऊन येणाऱ्या स्मृती सिनेमागृहाची दारे आता प्रेक्षकांसाठी बंद होणार आहेत. नवा सिनेमा लागला की गर्दी करताना, तिकिटांसाठी झुंबड उडताना आणि प्रसंगी ब्लॅकने तिकीट खरेदी करताना मिळालेल्या आठवणी आता स्मृतिशेष राहणार. २५ वर्षांच्या ‘लीज’वर बांधण्यात आलेल्या या चित्रपटगृहाची लीज संपली असून, त्याच्या नूतनीकरणासाठी चाललेल्या वाटाघाटी सुटत नसल्याने हे सिनेमागृह बंद होण्याचे संकेत मिळत आहेत.शंकरलाल राठी यांच्या आठवणीत १९८५ साली हे चित्रपटगृह बांधण्यात आले होते. त्यावेळी विक्रम बुटी यांच्या जागेवर काही वर्षांच्या लीजवर हे थिएटर बांधण्यात आले होते. जागेच्या लीजची मुदत आता ३० आॅगस्टला संपणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून लीजच्या नूतनीकरणासाठी चर्चा आणि वाटाघाटी सुरू होत्या. मात्र या चर्चा फिस्कटल्यामुळे हे प्रकरण न्यायालयात दाखल झाले. मात्र न्यायालयातही सकारात्मक निर्णय लागताना दिसत नसल्याने, हे चित्रपटगृह बंद होण्याची बातमी बाहेर आली. त्यामुळे ३० आॅगस्ट रोजी सिनेमागृहाचे दरवाजे बंद होणार, असे संकेत दिसून येत आहेत.दरम्यान, जागेचे मालक विक्रम बुटी आणि चित्रपटगृहाचे संचालक अक्षय राठी यांच्याकडून सिनेमागृह बंद होण्याच्या प्रश्नाला स्पष्ट उत्तर मिळाले नाही. चर्चा सुरू आहेत आणि प्रकरण न्यायालयात असून याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे काय निर्णय होतो आणि टॉकीज बंद होणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यादरम्यान हे सिनेमागृह पाडून त्यावर मल्टिप्लेक्स बांधण्यात येणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे सिनेमागृह पाडून मल्टिप्लेक्स थिएटर होणार काय? सिनेमागृह राहिले तर ते चालविणार कोण? वाटाघाटींचा सकारात्मक निर्णय लागून टॉकीज किंवा मल्टिप्लेक्स दोन्ही पक्षांकडून समन्वयाने चालणार काय, असे अनेक प्रश्न येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. हे सिनेमागृह बंद होण्याचा कुठलाही निर्णय अद्याप झाला नाही. लीजचे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित असून, अंतिम निर्णय लागेपर्यंत या विषयावर काही सांगता येणार नाही. विक्रम बुटी, जागेचे मालकसिनेमागृह आमचे असले तरी जागा दुसऱ्यांची असून, ती लीज आता संपत आली आहे. प्रेक्षकांच्या भावना आम्ही समजू शकतो व ते निराश होणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. सिनेमागृह राहणार की मल्टिप्लेक्स होणार, हा निर्णय दोन्ही पक्षांच्या समन्वयातून होईल, मात्र याबाबत आता काही सांगता येणार नाही. सध्या सकारात्मक निर्णयासाठी आमच्या वाटाघाटी सुरू असून, येत्या ८ ते १० दिवसात स्थिती स्पष्ट होईल.अक्षय राठी, संचालक, स्मृती सिनेमागृहअनेक आठवणी जुळल्या आहेतसिनेमागृहाचे व्यवस्थापक संतोष मिश्रा यांनी टॉकीजशी अनेक आठवणी जुळल्या असल्याचे सांगितले. १९८५ साली अमिताभ बच्चन यांचा ‘मर्द’ हा पहिला चित्रपट टॉकीजमध्ये लागला होता. तेव्हापासूनचा प्रवास थक्क करणारा आहे. सोयीसुविधांमुळे अल्पावधीत हे टॉकीज शहरातील सिनेमा प्रेक्षकांची पहिली पसंती ठरली होती. अनेक हिट, सुपरहिट चित्रपटांची गर्दी या सिनेमागृहाने अनुभवली आहे. जुन्या काळातील नूतन यांच्यापासून ऐश्वर्या रॉय, संजय दत्त, अभिषेक बच्चन, सोनाली बेंद्रे, सोनाली कुळकर्णी, बोमन इराणी, राजकुमार हिराणी, सुभाष घई अशा चित्रपट क्षेत्राशी जुळलेल्या नामवंत कलावंतांसह क्रिकेट जगतातील सुनील गावस्कर, अझहरुद्दीन तसेच भारतीय व श्रीलंका क्रि केट संघ आणि नुकतेच अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघानेही चित्रपटगृहात सिनेमाचा आस्वाद घेतला आहे. मोबाईल, संगणक अशा आधुनिक साधनांमुळे प्रेक्षकांच्या संख्येत घट झाली असली तरी, मल्टिप्लेक्समुळे सिनेमागृहाला कुठलाही फरक पडलेला नाही. कुटुंबासह सिनेमा बघण्यासाठी आजही या थिएटरला पसंती दिली जाते. थिएटर बंद होण्याची बातमी सोशल मीडियावर पसरल्याने अनेकांनी फोन करून निराशा व्यक्त केली आहे. मात्र सकारात्मक निर्णय येईल, अशी अपेक्षा मिश्रा यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Theatreनाटकnagpurनागपूर