शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

‘मॉरिस’च्या विद्यार्थिनींना दिलासा मिळणार?

By admin | Updated: July 23, 2016 03:17 IST

वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेत (जुने मॉरिस कॉलेज) संस्कृत विभागातील विद्यार्थिनींनी प्राध्यापकाविरोधातच केलेल्या पोलीस तक्रारीमुळे

नागपूर विद्यापीठ : ३ आॅगस्ट रोजी परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय नागपूर : वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेत (जुने मॉरिस कॉलेज) संस्कृत विभागातील विद्यार्थिनींनी प्राध्यापकाविरोधातच केलेल्या पोलीस तक्रारीमुळे विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासंबंधात विद्यापीठाने तसेच महाविद्यालयाने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. ३ आॅगस्ट रोजी परीक्षा मंडळाच्या बैठकीत यावर पुढील निर्णय होणार आहे. या प्रकरणात विद्यार्थिनींवर प्रथमदर्शनी अन्याय झाला असून त्यांना दिलासा देण्यात येऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तक्रारकर्त्या विद्यार्थिनी एम.ए.(संस्कृत) शेवटच्या वर्षात या संस्थेत शिक्षण घेत आहेत. संस्कृत विभागाचे विभागप्रमुख डॉ. ओमकुमार टोम्पे यांच्याकडून वर्षभर चुकीची वागणूक देण्यात आली, असा आरोप विद्यार्थिनींनी केला होता. आपणास मी परीक्षेत अनुत्तीर्ण करील, अशी सातत्याने धमकी टोम्पे यांच्याकडून देण्यात येत होती. मात्र शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या विद्यार्थिनी गप्प बसल्या. परंतु या विद्यार्थिंनींना महाविद्यालयाकडून घेण्यात आलेल्या इंटर्नल परीक्षेत अनुत्तीर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर विद्यार्थिनींनी संस्थेचे संचालक डॉ.भाऊ दायदार यांच्याकडे दाद मागितली. तेथूनही तत्काळ कारवाई न झाल्याने मागील महिन्यात विद्यार्थिनींनी पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर नागपूर विद्यापीठाने या प्रकरणाला गंभीरतेने घेतले असून यासंदर्भात चौकशी समिती नेमण्यात आली. यासंदर्भात संस्थेकडूनदेखील अंतर्गत चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. विद्यापीठाच्या चार सदस्यीय समितीचा अहवाल तयार झाला असून तो प्रशासनाला सोपविण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या समितीचा अहवालदेखील विद्यापीठाकडे पोहोचला आहे. यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांना विचारणा केली असता त्यांनी अहवाल सादर झाले असल्याचे स्पष्ट केले. परंतु अहवालात काय आहे यावर भाष्य करण्यास नकार दिला. ३ आॅगस्ट रोजी परीक्षा मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.(प्रतिनिधी) तक्रारकर्त्या विद्यार्थिनी एम.ए.(संस्कृत) शेवटच्या वर्षात या संस्थेत शिक्षण घेत आहेत. संस्कृत विभागाचे विभागप्रमुख डॉ. ओमकुमार टोम्पे यांच्याकडून वर्षभर चुकीची वागणूक देण्यात आली, असा आरोप विद्यार्थिनींनी केला होता. आपणास मी परीक्षेत अनुत्तीर्ण करील, अशी सातत्याने धमकी टोम्पे यांच्याकडून देण्यात येत होती. मात्र शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या विद्यार्थिनी गप्प बसल्या. परंतु या विद्यार्थिंनींना महाविद्यालयाकडून घेण्यात आलेल्या इंटर्नल परीक्षेत अनुत्तीर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर विद्यार्थिनींनी संस्थेचे संचालक डॉ.भाऊ दायदार यांच्याकडे दाद मागितली. तेथूनही तत्काळ कारवाई न झाल्याने मागील महिन्यात विद्यार्थिनींनी पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर नागपूर विद्यापीठाने या प्रकरणाला गंभीरतेने घेतले असून यासंदर्भात चौकशी समिती नेमण्यात आली. यासंदर्भात संस्थेकडूनदेखील अंतर्गत चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. विद्यापीठाच्या चार सदस्यीय समितीचा अहवाल तयार झाला असून तो प्रशासनाला सोपविण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या समितीचा अहवालदेखील विद्यापीठाकडे पोहोचला आहे. यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांना विचारणा केली असता त्यांनी अहवाल सादर झाले असल्याचे स्पष्ट केले. परंतु अहवालात काय आहे यावर भाष्य करण्यास नकार दिला. ३ आॅगस्ट रोजी परीक्षा मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.(प्रतिनिधी)