शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

खावटी कर्ज वाटप उन्हाळ्यात करणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:19 IST

राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : पावसाळ्यात दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना सततच्या पावसामुळे काम मिळत नाही. त्यामुळे ...

राहुल पेटकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : पावसाळ्यात दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना सततच्या पावसामुळे काम मिळत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामाेरे जावे लागते. पैशाअभावी त्यांना जीवनावश्यक गरजा पूर्ण करणे शक्य हाेत नसल्याने, प्रसंगी त्यांच्यावर उपासमारीची आणि त्यांच्या मुलांवर कुपाेषणाची वेळ ओढवते. या दुष्टचक्रातून त्यांची साेडवणूक करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने त्यांना खावटी कर्ज दिले जाते. पावसाळा संपून दाेन महिने झाले असले तरी, त्यांना अद्यापही खावटी कर्जाचे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे हे कर्ज वाटप उन्हाळ्यात केले जाणार काय, असा प्रश्न आदिवासी बांधवांनी उपस्थित केला असून, त्यांनी नवीन कर्जासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करायला सुरुवात केली आहे.

काम नसलेल्या काळात आदिवाासी बांधवांची उपासमार हाेऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या वतीने सन १९७८ पासून आदिवासी विकास महामंडळामार्फत खावटी कर्ज वाटप याेजना सुरू करण्यात आली. खावटी कर्ज वाटप केल्यानंतर पुढे ते माफ केले जाते. विशेष म्हणजे, पावसाळ्यात करावयाचे असते. यावर्षी खावटी कर्जाचे वाटप अद्यापही करण्यात आले नाही. शासनाची ही कल्याणकारी याेजना १९७८ पासून २०१३ पर्यंत सुरू हाेती.

या काळात आदिवासी बांधवांना पावसाळ्यामध्ये प्रत्येकी दाेन ते चार हजार रुपयापर्यंत खावटी कर्ज वाटप केले जायचे. यात शासनाकडून ३० टक्के अनुदान मिळायचे. हे कर्ज ५० टक्के वस्तू स्वरूपात तर ५० टक्के राेख स्वरूपात दिले जायचे. सन २०१३ पासून या याेजनेत बदल करून संपूर्ण कर्ज राेख स्वरूपात द्यायला सुरुवात झाली. त्यानंतर २०१४ पासून ही याेजना बंद करण्यात आली. त्यानंतर हीच याेजना यावर्षीपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यात आदिवासी बांधवांना ५० टक्के कर्ज राेखीने व ५० टक्के जीवनावश्यक वस्तू स्वरूपात देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या याेजनेचे सर्व कामकाज गावपातळीवर हाेणार असल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे.

...

आवश्यक कागदपत्रे

या याेजनेचा लाभ घेण्यासाठी आदिवासी बांधवांना त्यांचे आधार कार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक, बँक पासबुकची झेराॅक्स प्रत व इतर कागदपत्र अनिवार्य केली आहेत. लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे कामही प्रशासनाने सुरू केले आहे. त्यासाठी गावपातळीवर समिती तयार करण्यात आली. लाभार्थीने मनरेगाचे काम केले असावे, ही अट यात नव्याने समाविष्ट केली आहे. शासनाने यापूर्वी कागदपत्र मागविली हाेती. आता पुन्हा तीच कागदपत्रे मागितली जात आहे. त्यामुळे एकच काम पुन्हा पुन्हा करायचे काय, असा प्रश्नही माजी सरपंच बलदेव कुमरे यांनी उपस्थित केला आहे.

...

पेंच लाभक्षेत्र वगळले

रामटेक तालुक्यातील काही आदिवासीबहुल भाग पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात समाविष्ट केला आहे. या लाभक्षेत्रातील आदिवासी बांधवांची गावेे या याेजनेतून वगळण्यात आली आहेत. यात शिवनी, सालईमेटा, हसापूर, घाेटी यासह अन्य गावांचा समावेश आहे. ती गावे का वगळण्यात आली, याचे कारण अद्यापही स्पष्ट करण्यात आले नाही. दुसरीकडे, शासनाने खावटी कर्जांना तातडीने मंजुरी देऊन त्यांचे वाटप सुरू करावे, अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे.