शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

तेलंगणाप्रमाणे तीन वर्षात कामे करणार का?

By admin | Updated: August 25, 2016 02:33 IST

तेलंगणा आणि महाराष्ट्र यांच्यात नुकताच पाणी वाटप करार झाला. हा करार तेलंगणासाठी फायद्याचा आहेच.

पाणी वाटप करार : मधुकर किंमतकर यांचा राज्य सरकारला सवाल नागपूर : तेलंगणा आणि महाराष्ट्र यांच्यात नुकताच पाणी वाटप करार झाला. हा करार तेलंगणासाठी फायद्याचा आहेच. परंतु महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या नक्षलग्रस्त भागासाठी सुद्धा फायदेशीर ठरणार आहे. या तिन्ही जिल्ह्यातील एकूण ७५ हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तेलंगणाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून ते तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण करणार आहेत. परंतु महाराष्ट्रातील राज्य शासनाचा सिंचनाबाबतच्या कामाचा अनुभव पाहता, आपल्याकडील होणारे काम पूर्ण करण्यास आणखी २५ वर्षे लागू शकतात. तेव्हा महाराष्ट्र शासन तेलंगणाप्रमाणे तीन वर्षात या प्रकल्पाचे काम पूर्ण करणार का? असा प्रश्न विदर्भ विकास महामंडळाचे तज्ज्ञ सदस्य अ‍ॅड. मधुकर ऊर्फ मामा किंमतकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकारला केला आहे. अ‍ॅड. किंमतकर यांनी सांगितले की, महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी पाणी वाटप करार केला. या कराराप्रमाणे नदीवरील पाणी धरण बांधून अडवणे व सिंचनासाठी त्याचा वापर करण्यात येईल. यासाठी प्राणहिता, गोदावरी आणि पैनगंगा नदीवर एकेक बॅरेज बांधण्यात येईल. या बॅरेजमुळे चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ या जिल्ह्यातील २६४ हेक्टर जमीन बुडीत क्षेत्रात जाणार आहे. एकूण ३० हजार हेक्टर (७५ हजार एकर) जमीन सिंचनाखाली येईल. धरणाची उंची कमी केल्याने गावाला धोका नाही. यावर एकूण सात हजार कोटीचा खर्च येणार आहे. तेलंगणा बॅरेज बांधून देणार आहे. महाराष्ट्राला केवळ शेतापर्यंत पाणी नेण्यासाठी कालवे आणि पाटचऱ्या करावयाच्या आहेत. यावर महाराष्ट्राला केवळ ११०० ते १२०० कोटीचा खर्च करावा लागणार आहे. या प्रकल्पामुळे तेलंगणा येथील १६ लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे तेलंगणा सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. त्यांचा संपूर्ण राज्याचा अर्थसंकल्प हा ५० हजार कोटीचा आहे. त्यापैकी ५० टक्केवर म्हणजे २७ हजार कोटी रुपयांची त्यांनी सिंचनासाठी तरतूद केली आहे. येत्या तीन वर्षात ते हा प्रकल्प पूर्ण करणार आहे. निधीची तरतूद पाहता ते तीन वर्षात काम पूर्ण करू शकतील, परंतु आपल्या सरकारची तशी नियत आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.(प्रतिनिधी)पाच वर्षांत तीन प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द विदर्भातील देवलामारी उपसा सिंचन (सिंचन क्षमता ३२५५ हेक्टर), महागाव गर्रा उपसा सिंचन योजना ३४५० हेक्टर क्षमता) आणि वेणा पूरकर कालवा १०४१ हेक्टर सिंचन क्षमता पुनर्निर्माण करण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. पाच वर्षांत काहीतरी टोकन निधीची तरतूद करणे आवश्यक असते. परंतु मागील ५ वर्षात १० रुपयेसुद्धा टोकन निधीची तरतूद न केल्याने या तिन्ही प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द झाली आहे. विदर्भातील सिंचन प्रकल्पाबाबत महाराष्ट्रातील राज्य सरकारचे असे धोरण आहे, तेव्हा तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्र शासन तीन वर्षांत खरच काम करणार का? असा प्रश्नही अ‍ॅड. मधुकर किंमतकर यांनी उपस्थित केला.