शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

सरकार देईल का ‘टू मिनीट’?

By admin | Updated: June 5, 2015 02:29 IST

‘बस टू मिनीट’ ही कॅचलाईन घेऊन घराघरात पोहचलेल्या मॅगीच्या दर्जावरून देशभरात रान उठविले जात आहे.

नागपूर : ‘बस टू मिनीट’ ही कॅचलाईन घेऊन घराघरात पोहचलेल्या मॅगीच्या दर्जावरून देशभरात रान उठविले जात आहे. मात्र, दररोज लाखो विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या दर्जाकडे मात्र सोईस्करपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मॅगी हे बहुतेक उच्च व मध्यमवर्गीयांचे खाद्य असल्यामुळे आज देशभरात त्याची चर्चा होत आहे. परंतु शालेय पोषण आहारांच्या निकृष्ट दर्जा बाबत मोठ्या प्रमाणात असणाऱ्या तक्रारीकडेही सरकार तेवढ्याच गांभीर्याने लक्ष देणार का, या आहाराच्या चौकशीसाठी सरकार ‘टू मिनीट’ देणार का,असा प्रश्न निर्माण झाला आहे. एक ते पाच वर्गाच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार व सहा ते आठ वर्गाच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात येते. एक ते पाचपर्यंत आहाराचे प्रमाण प्रति विद्यार्थी तांदळाचे वाटप १०० ग्रॅम, यात कॅलरी ४५० व प्रथिने १२ ग्रॅम असते. त्याचबरोबर आहार खर्च ३.५० रुपये मिळतो. माध्यमिकसाठी प्रति विद्यार्थी १५० ग्रॅम तांदूळ, कॅलरी ७००, प्रथिने २० ग्रॅम व आहार खर्च ५.२० पैसे मिळतो. शाळांमध्ये होणारा अन्नधान्य पुरवठा दि. महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. येथून होतो. एफसीआय गोदामातून तांदळाची उचल करून, पुरवठादारामार्फत शाळांना पुरवठा केला जातो. शाळांना अन्न शिजवून देणे, इंधन व भाजीपाला याकरिता स्वतंत्र अनुदान दिले जाते. शहरी भागातील शाळांना केवळ तांदळाचा पुरवठा होतो. अन्न शिजवून देणे, इंधन, भाजीपाला यासाठी अनुदान दिले जाते. ग्रामीण भागातील शाळांना पुरवठादाराकडून तांदुळ, तुरदाळ, चना, वाटाणा, सोयाबीन तेल, कांदा, लसूण, मसाला, हळद, मीठ, जीरे, मोहरी साहित्य पुरविले जातात. सरकार शालेय पोषण आहारावर कोट्यवधी खर्च केल्यावरही विद्यार्थ्यांना दर्जेदार आहार मिळत नाही. शाळांना होणाऱ्या तांदळाचा पुरवठा हा निकृष्ट दर्जाचा असतो. त्यात अळ्या, जाळे लागलेले असतात. चना, वाटाण्याला भिरड लागलेली असते, टोचलेले असतात. सोयाबीनचे तेल व इतरही साहित्य लोकल कंपनीचे असते. त्यामुळे त्याच्या पौष्टिकतेवर प्रश्नचिन्हच आहे. अन्नधान्याबरोबर शाळांमध्ये आहार निर्माण करण्याच्या प्रक्रियेचाही आहाराच्या पौष्टिकतेवर परिणाम होतो. प्रयोगशाळेत तपासणीचा दावा नागपूर जिल्ह्यात २८३३ शाळेतील ३,९४,५६३ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरविण्यात येतो. यासाठी पुरविण्यात येणारे अन्नधान्य फेडरेशनच्या लॅबमध्ये प्रमाणित करण्यात येते. न्यूट्रीशन एक्स्पर्टकडून अन्नाच्या कॅलरी ठरविल्या जातात. जे साहित्य शाळेत येते त्याची तपासणी करण्यात येते. गेल्या वर्षभरात तरी, अशा कुठल्याही तक्रारी आल्या नाही. कुठल्याही विद्यार्थ्याला अन्नातून विषबाधा झाली नाही, असा दावा शालेय पोषण आहारचे अधीक्षक निलेश वाघमारे यांनी केला आहे.