शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
4
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
5
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
6
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
7
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
8
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
10
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
11
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
12
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
13
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
14
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
15
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
16
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
17
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
18
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
19
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
20
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

सदस्यांच्या प्रश्नावरकधी होणार चर्चा ?

By admin | Updated: September 17, 2015 03:54 IST

नगरसेवकांना नागरिकांच्या समस्या सोडविता याव्यात यासाठी त्यांना महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार सभागृहात प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आहे.

नागपूर : नगरसेवकांना नागरिकांच्या समस्या सोडविता याव्यात यासाठी त्यांना महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार सभागृहात प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आहे. परंतु सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर चर्चा होईलच याची शाश्वती नाही. गेल्या अडीच -तीन महिन्यापासून ३४ प्रश्न प्रलंबित आहेत. यावर चर्चा कधी होणार, असा प्रश्न सदस्यांना पडला आहे. मनपा कायद्यानुसार सदस्यांनी प्रशासनाला विचारलेल्या प्रश्नावर सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा होणे अपेक्षित असते. परंतु अनेकदा प्रश्नोत्तराचा तास होत नाही. कधीकधी एखाद्या प्रश्नावरील चर्चा लांबते. त्यामुळे इतर प्रश्नांना न्याय मिळत नाही. तसेच सभागृह तहकूब झाले की, सदस्यांचे प्रश्न प्रलंबित राहतात. त्यामुळे उपस्थित केलेल्या प्रश्नांना न्याय मिळत नसल्याची व्यथा सदस्यांनी मांडली. २३ सप्टेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या कामकाजात २० जूनच्या सभेतील प्रलंबित ११ प्रश्न, २० जुलैच्या सभेतील १९ तसेच १७ आॅगस्टच्या सर्वसाधारण सभेतील प्रलंबित ४ प्रश्नाचा समावेश करण्यात आला आहे. नियमानुसार सभेच्या कामकाजात सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा समावेश केला जातो. परंतु त्यावर चर्चा होत नसल्याने अनेक सदस्य सभागृहात प्रश्न उपस्थित करीत नसल्याचे चित्र आहे. २० जूनच्या सभेत सदस्यांनी नोटीस न देता हटविण्यात आलेले सीताबर्डी भागातील व्यापाऱ्यांचे अतिक्रमण, २०१४-२०१५ या वर्षात मनपाने किती झाडे लावली, त्यातील किती जिवंत आहेत. काचीपुरा येथील कृषी विद्यापीठाच्या जागेवरील लॉन किंवा बांधकाम अधिकृत आहे का. मनपामध्ये किती शिक्षणाधिकारी आहेत. सार्वजनिक रस्त्यावरील मंदिर, मशीद, बौद्धविहार तोडण्यासंदर्भात कोणते आदेश आहेत, अशा महत्त्वाच्या प्रश्नावर अद्याप चर्चा झालेली नाही. महत्त्वाच्या २० जुलैच्या सभेत सदस्यांनी उपस्थित केलेले १९ प्रश्न प्रलंबित आहेत. (प्रतिनिधी)