शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सदस्यांच्या प्रश्नावरकधी होणार चर्चा ?

By admin | Updated: September 17, 2015 03:54 IST

नगरसेवकांना नागरिकांच्या समस्या सोडविता याव्यात यासाठी त्यांना महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार सभागृहात प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आहे.

नागपूर : नगरसेवकांना नागरिकांच्या समस्या सोडविता याव्यात यासाठी त्यांना महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार सभागृहात प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आहे. परंतु सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर चर्चा होईलच याची शाश्वती नाही. गेल्या अडीच -तीन महिन्यापासून ३४ प्रश्न प्रलंबित आहेत. यावर चर्चा कधी होणार, असा प्रश्न सदस्यांना पडला आहे. मनपा कायद्यानुसार सदस्यांनी प्रशासनाला विचारलेल्या प्रश्नावर सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा होणे अपेक्षित असते. परंतु अनेकदा प्रश्नोत्तराचा तास होत नाही. कधीकधी एखाद्या प्रश्नावरील चर्चा लांबते. त्यामुळे इतर प्रश्नांना न्याय मिळत नाही. तसेच सभागृह तहकूब झाले की, सदस्यांचे प्रश्न प्रलंबित राहतात. त्यामुळे उपस्थित केलेल्या प्रश्नांना न्याय मिळत नसल्याची व्यथा सदस्यांनी मांडली. २३ सप्टेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या कामकाजात २० जूनच्या सभेतील प्रलंबित ११ प्रश्न, २० जुलैच्या सभेतील १९ तसेच १७ आॅगस्टच्या सर्वसाधारण सभेतील प्रलंबित ४ प्रश्नाचा समावेश करण्यात आला आहे. नियमानुसार सभेच्या कामकाजात सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा समावेश केला जातो. परंतु त्यावर चर्चा होत नसल्याने अनेक सदस्य सभागृहात प्रश्न उपस्थित करीत नसल्याचे चित्र आहे. २० जूनच्या सभेत सदस्यांनी नोटीस न देता हटविण्यात आलेले सीताबर्डी भागातील व्यापाऱ्यांचे अतिक्रमण, २०१४-२०१५ या वर्षात मनपाने किती झाडे लावली, त्यातील किती जिवंत आहेत. काचीपुरा येथील कृषी विद्यापीठाच्या जागेवरील लॉन किंवा बांधकाम अधिकृत आहे का. मनपामध्ये किती शिक्षणाधिकारी आहेत. सार्वजनिक रस्त्यावरील मंदिर, मशीद, बौद्धविहार तोडण्यासंदर्भात कोणते आदेश आहेत, अशा महत्त्वाच्या प्रश्नावर अद्याप चर्चा झालेली नाही. महत्त्वाच्या २० जुलैच्या सभेत सदस्यांनी उपस्थित केलेले १९ प्रश्न प्रलंबित आहेत. (प्रतिनिधी)