शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

केरळ, काश्मीरवर होणार संघमंथन?

By admin | Updated: March 14, 2017 22:15 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन १९ ते २१ मार्चदरम्यान तामिळनाडू येथील कोईम्बतूर येथे करण्यात आले

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 14 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन १९ ते २१ मार्चदरम्यान तामिळनाडू येथील कोईम्बतूर येथे करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणुकांत भाजपाला मिळालेल्या यशानंतर संघ परिवारात उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पुढील वर्षभरातील योजनांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रतिनिधी सभेला महत्त्व आले आहे. विजयादशमीच्या सोहळ्यात सरसंघचालकांनी ह्यसंपूर्ण काश्मीरह्णचा नारा दिला होता. तसेच केरळमधील राजकीय हिंसेविरोधात संघाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मुद्यांवर प्रतिनिधी सभेत मंथन होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.संघाची प्रतिनिधी सभा दरवर्षी होत असते. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या सभेत सहभागी होतात. शिवाय संघ परिवारातील विविध संघटनांचे प्रतिनिधीदेखील कार्यअहवाल मांडतात. यंदाची प्रतिनिधी सभा कोईम्बतूर येथे होत असून प्रथमच तामिळनाडूत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २१ या दरम्यान सभा होणार असली तरी अगोदर संघटनात्मक पातळीवर बैठका होणार आहेत. भारतीय किसान संघ, वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्ष यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी सभेला उपस्थित राहतील.समान नागरी कायद्याबाबत संघाचा आग्रह, सामाजिक समरसतेची मोहीम, केरळ-काश्मीरबाबतची संघाची दृष्टी, इत्यादी मुद्यांवर या सभेदरम्यान चर्चा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत समाविष्ट होणारे मुद्दे अंतिम झाले असून संघ परिवाराशी जुळलेल्या संस्थांमध्ये समन्वय वाढावा याकरिता मंथन होणार आहे. संघटनविषयक बाबींसह सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.या सभेत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे, तो संघाचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रांचा विकास करण्यासाठी उपाययोजनांसंदर्भात. अशा ठिकाणी केंदद्र शासनाने जास्तीत जास्त लक्ष द्यावे असा प्रतिनिधींचा सूर आहे.नव्या गणवेशातील पहिलीच सभा२०१६ रोजी नागौर येथे झालेल्या प्रतिनिधी सभेत संघाच्या गणवेशात बदल करण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. नव्या गणवेशातील कोईम्बतूर येथील ही पहिलीच सभा राहणार आहे. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, सरकार्यवाह भैयाजी जोशी यांच्यासह सर्वच मोठे पदाधिकारी सहभागी होतील. गोव्यातील बंडावर मंथन?या प्रतिनिधी सभेत नेमके कुठले प्रस्ताव मांडले जाणार हे संघाने अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र २०१६ मध्ये गोव्यातील तत्कालीन संघचालक सुभाष वेलिंगकर यांनी केलेल्या बंडामुळे संघाला मोठा धक्का बसला होता. वरिष्ठ पातळीवर याची चर्चादेखील झाली होती. संबंधित बंडावर या प्रतिनिधी सभेत चर्चा होणार का, यावर संघ पदाधिकाऱ्यांनी मौन साधले आहे.