शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

परदेशातून आलेले बामन आम्हाला अक्कल शिकवणार का ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 14:36 IST

जे स्वत: परदेशातून आले ते बामन आम्हाला अक्कल शिकविणार काय ? असे विधान पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपुरातील सभेत केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देनितीन राऊत यांच्या वक्तव्यामुळे खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकत्व संशोधन कायदा करून आम्हाला नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे मागितल्या जात आहेत. जे स्वत: परदेशातून आले ते बामन आम्हाला अक्कल शिकविणार काय ? असे विधान पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपुरातील सभेत केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्चला फुले, शाहु, आंबेडकर विचारसंवर्धन समितीच्या वतीने इंदोरा येथील मैदानात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना नितीन राऊत म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मुस्लिमांनी नेता मानले असते आणि बाबासाहेबांच्या विचारांनी वाटचाल करुन हिंदुस्थान म्हणणे सोडले असते, तर मुस्लिमांना हातबोट लावण्याची कुणाची हिंमत झाली नसती. मुस्लिमांना भारत म्हणायला लाज वाटते का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, मी कॉंग्रेसचा नेता असल्यामुळे दिल्लीत अनेक लोक भेटायला येत असतात. त्यांना वाटते मी आंबेडकरी चळवळीचा माणूस आहे, जो आजही आंबेडकर जिवंत ठेवून उभा आहे. डॉ. राऊत यांच्या ब्राह्मणविरोधी वक्तव्यामुळे संविधानातील शपथेच्या प्रथेला गालबोट लागल्याची भावना व्यक्त होत आहे. कॉंग्रेसने देशात सीएए, एनआरसी आणि एनपीआरचा विरोध केला आहे. कॉंग्रेसने २०१० साली जो एनपीआर आणला होता. त्या अटी जशाच्या तशा ठेवल्या तरच लागू होईल, असे कॉंग्रेसचे धोरण आहे. परंतु तसे न झाल्यामुळे कॉंंग्रेसचा याला विरोध असल्याचे राऊत म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ राज्यात व्हायरल होत असून अनेक संघटनांनी त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रीपदाची शपथ घेताना सर्वांना समान वागणूक देईल, कुणाचाही द्वेष करणार नाही, अशी शपथ सर्व मंत्र्यांना घ्यावी लागते. नितीन राऊत यांनी असे वक्तव्य केल्यामुळे परशुराम सेवा संघ महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली आहे.............

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊत