शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

अडकून पडलेले मजूर, पर्यटक, विद्यार्थी यांचे ‘ऑनलाईन’ अर्ज स्वीकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 21:37 IST

लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या राज्यात अथवा परराज्यातील मजूर, पर्यटक, विद्यार्थी आदींना त्यांच्या जिल्ह्यात, गावी परत जाण्यासाठी काही अटीवर मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यासाठी ‘ऑनलाईन’ अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.

ठळक मुद्देशेल्टर होममधील मजुरांना अर्जाची गरज नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या राज्यात अथवा परराज्यातील मजूर, पर्यटक, विद्यार्थी आदींना त्यांच्या जिल्ह्यात, गावी परत जाण्यासाठी काही अटीवर मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यासाठी ‘ऑनलाईन’ अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे. प्रशासनाच्या शेल्टर होममध्ये असलेल्यांना मात्र अर्ज करण्याची गरज नाही, त्यांची संपूर्ण माहिती प्रशासनाकडे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.लॉकडाऊनमुळे राज्यात आणि परराज्यात अडकून पडलेले असल्यामुळे त्यांना त्यांच्या मूळ निवासाच्या ठिकाणी जाण्यासाठी शासनाने काही अटीवर परवानगी दिली आहे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या nagpur.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज विहीत नमुन्यात सादर करणे आवश्यक आहे, अर्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी याचे नावे सादर करणे आवश्यक आहे. अर्ज करताना स्वत:चे वाहन अथवा शासकीय सुविधा, संपूर्ण पत्ता, आधार क्रमांक, दूरध्वनी, कुठे जायचे आहे, किती व्यक्ती सोबत आहे, त्याचा तपशील सादर करणे आवश्यक आहे.नागपूर जिल्ह्यातील व्यक्तींना राज्यातील इतर जिल्ह्यात किंवा इतर राज्यातील जिल्ह्यामध्ये जावयाचे असल्या सुविधा उपलब्ध आहे, त्यासाठी इतर जिल्ह्यात किंवा परराज्यात कोरोनामुळे वाहतूक प्रतिबंधात्मक कार्यवाहीमुळे अडकून पडलेल्या जिल्ह्यातील राहिवाशांनी त्याचे निवासस्थानी परत येण्यासाठी ऑनलाईन विहीत नमुन्यातील अर्ज करणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस