शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
3
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
4
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
5
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
6
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
7
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
8
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
9
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
10
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
14
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
15
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
16
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
17
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
18
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
19
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
20
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम

कनक रिसोर्सेस कंपनीवर कृपादृष्टी कशासाठी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 21:39 IST

भाजपाच्या सत्ता काळात शहर कचरामुक्त करण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. २००८ मध्ये याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. घरोघरी जाऊन कचरा संकलित करून भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमध्ये वाहून नेण्याचा कंत्राट कनक रिसोर्सेस कंपनीला देण्यात आला. परंतु सत्ताधाऱ्यांच्या कृपादृष्टीमुळे सुरुवातीच्या काही वर्षात कनक व्यवस्थापनाची मनमानी सुरू होती. नंतर नगरसेवकांचा विरोध वाढल्याने व प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने कनक रिसोर्सेसच्या कामात काही प्रमाणात सुधारणा झाली. परंतु त्यानंतरही अपेक्षित सुधारणा झालेली नव्हती.

ठळक मुद्देवारंवार तक्रारी असूनही कारवाई नाही : सभागृहात ठोस निर्णय घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाच्या सत्ता काळात शहर कचरामुक्त करण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. २००८ मध्ये याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. घरोघरी जाऊन कचरा संकलित करून भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमध्ये वाहून नेण्याचा कंत्राट कनक रिसोर्सेस कंपनीला देण्यात आला. परंतु सत्ताधाऱ्यांच्या कृपादृष्टीमुळे सुरुवातीच्या काही वर्षात कनक व्यवस्थापनाची मनमानी सुरू होती. नंतर नगरसेवकांचा विरोध वाढल्याने व प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने कनक रिसोर्सेसच्या कामात काही प्रमाणात सुधारणा झाली. परंतु त्यानंतरही अपेक्षित सुधारणा झालेली नव्हती.शहराच्या मध्यवर्ती भागासोबतच शहरालगतच्या भागातील वस्त्यांत घरोघरी जाऊन कचरा संकलनाची जबाबदारी कनक रिसोर्सेसची आहे. तर रस्ते, सार्वजनिक ठिकाणे व बाजार भागातील स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची आहे. शहरातील कचरा गोळा करून ठरलेल्या ठिकाणी संकलित करावयाचा आहे. तसेच घराघरातून जमा केलेला कचरा भांडेवाडी येथे पोहचवण्याची जबाबदारी कनकच्या कचरागाड्यांची आहे. कनककडे कचरा संकलन करणारी २०० वाहने आहेत. परंतु कचरागाड्यांवरील कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे. गाडीवरील कर्मचारी आपल्या हाताने कचरा गाडीत टाकत नाही. घरात डस्टबीनमध्ये संकलित केलेला कचरा महिलांनाच आपल्या हाताने कचरा गाडीत टाकावा लागतो. ओला आणि कोरडा कचरा वगेवेगळा संकलित करावयाचा आहे. परंतु या सूचनांचे पालन केले जात नाही. यामुळे प्रक्रिया व्यवस्थित होत नाही.कचरा नियमित उचलला जात नाहीशहराच्या पूर्व, उत्तर व दक्षिण भागात तसेच शहरालगतच्या वस्त्यातून दररोज कचरा संकलित केला जात नाही. त्यामुळे नागरिकांना उघड्यावर कचरा टाकावा लागतो. काही वस्त्यात दिवसाआड, काही ठिकाणी आठवड्यातून दोनदा तर काही भागात आठवड्यातून एकदाच कचरा उचलला जातो. त्यामुळे शहराच्या काही भागात कचरा तसाच पडून असतो. परिणामी लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.खासगी मलबा उचलण्याची सूचनाअनेकदा कनक रिसोर्सेसच्या कर्मचाऱ्यांना खासगी बांधकामाचा मलबा उचलण्याच्या सूचना नगरसेवक करतात. यात माती व दगडांचा समावेश असल्याने या कचऱ्यावर प्रक्रिया करता येत नाही. तसेच वजनामुळे कनकच्या बिलात मोठ्या प्रमाणात वाढ होते. महापालिकेवर आर्थिक बोजा पडतो. सभागृहात नगरसेवकांनी अनेकदा हा मुद्दा उपस्थित केला. परंतु पदाधिकारी व प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न