शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

कनक रिसोर्सेस कंपनीवर कृपादृष्टी कशासाठी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 21:39 IST

भाजपाच्या सत्ता काळात शहर कचरामुक्त करण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. २००८ मध्ये याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. घरोघरी जाऊन कचरा संकलित करून भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमध्ये वाहून नेण्याचा कंत्राट कनक रिसोर्सेस कंपनीला देण्यात आला. परंतु सत्ताधाऱ्यांच्या कृपादृष्टीमुळे सुरुवातीच्या काही वर्षात कनक व्यवस्थापनाची मनमानी सुरू होती. नंतर नगरसेवकांचा विरोध वाढल्याने व प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने कनक रिसोर्सेसच्या कामात काही प्रमाणात सुधारणा झाली. परंतु त्यानंतरही अपेक्षित सुधारणा झालेली नव्हती.

ठळक मुद्देवारंवार तक्रारी असूनही कारवाई नाही : सभागृहात ठोस निर्णय घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाच्या सत्ता काळात शहर कचरामुक्त करण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. २००८ मध्ये याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. घरोघरी जाऊन कचरा संकलित करून भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमध्ये वाहून नेण्याचा कंत्राट कनक रिसोर्सेस कंपनीला देण्यात आला. परंतु सत्ताधाऱ्यांच्या कृपादृष्टीमुळे सुरुवातीच्या काही वर्षात कनक व्यवस्थापनाची मनमानी सुरू होती. नंतर नगरसेवकांचा विरोध वाढल्याने व प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने कनक रिसोर्सेसच्या कामात काही प्रमाणात सुधारणा झाली. परंतु त्यानंतरही अपेक्षित सुधारणा झालेली नव्हती.शहराच्या मध्यवर्ती भागासोबतच शहरालगतच्या भागातील वस्त्यांत घरोघरी जाऊन कचरा संकलनाची जबाबदारी कनक रिसोर्सेसची आहे. तर रस्ते, सार्वजनिक ठिकाणे व बाजार भागातील स्वच्छतेची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची आहे. शहरातील कचरा गोळा करून ठरलेल्या ठिकाणी संकलित करावयाचा आहे. तसेच घराघरातून जमा केलेला कचरा भांडेवाडी येथे पोहचवण्याची जबाबदारी कनकच्या कचरागाड्यांची आहे. कनककडे कचरा संकलन करणारी २०० वाहने आहेत. परंतु कचरागाड्यांवरील कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे. गाडीवरील कर्मचारी आपल्या हाताने कचरा गाडीत टाकत नाही. घरात डस्टबीनमध्ये संकलित केलेला कचरा महिलांनाच आपल्या हाताने कचरा गाडीत टाकावा लागतो. ओला आणि कोरडा कचरा वगेवेगळा संकलित करावयाचा आहे. परंतु या सूचनांचे पालन केले जात नाही. यामुळे प्रक्रिया व्यवस्थित होत नाही.कचरा नियमित उचलला जात नाहीशहराच्या पूर्व, उत्तर व दक्षिण भागात तसेच शहरालगतच्या वस्त्यातून दररोज कचरा संकलित केला जात नाही. त्यामुळे नागरिकांना उघड्यावर कचरा टाकावा लागतो. काही वस्त्यात दिवसाआड, काही ठिकाणी आठवड्यातून दोनदा तर काही भागात आठवड्यातून एकदाच कचरा उचलला जातो. त्यामुळे शहराच्या काही भागात कचरा तसाच पडून असतो. परिणामी लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.खासगी मलबा उचलण्याची सूचनाअनेकदा कनक रिसोर्सेसच्या कर्मचाऱ्यांना खासगी बांधकामाचा मलबा उचलण्याच्या सूचना नगरसेवक करतात. यात माती व दगडांचा समावेश असल्याने या कचऱ्यावर प्रक्रिया करता येत नाही. तसेच वजनामुळे कनकच्या बिलात मोठ्या प्रमाणात वाढ होते. महापालिकेवर आर्थिक बोजा पडतो. सभागृहात नगरसेवकांनी अनेकदा हा मुद्दा उपस्थित केला. परंतु पदाधिकारी व प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न