शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सजग असलेले प्रशासन ढिम्म का? भारतनगर २४ तासानंतर झाले ‘कन्टेन्मेंट झोन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 20:03 IST

नव्याची नवलाई अन् जुन्याची भीती नाही... अशी स्थिती आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पहिल्या टप्प्यात अतिशय सजग असलेले प्रशासन आता मात्र अत्यंत ढिम्म पडल्याचे दिसून येत आहे. ज्या वस्तीत संक्रमित रुग्ण आढळत आहेत, ती वस्ती म्हणा वा तेवढा परिसर जामबंद करण्यास प्रचंड ढिलाई होत आहे.

ठळक मुद्देएक मृत्यू अन् एक पॉझिटिव्हनंतरही थंड भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नव्याची नवलाई अन् जुन्याची भीती नाही... अशी स्थिती आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पहिल्या टप्प्यात अतिशय सजग असलेले प्रशासन आता मात्र अत्यंत ढिम्म पडल्याचे दिसून येत आहे. ज्या वस्तीत संक्रमित रुग्ण आढळत आहेत, ती वस्ती म्हणा वा तेवढा परिसर जामबंद करण्यास प्रचंड ढिलाई होत आहे. भारतनगरात कोविडमुळे एकाचा मृत्यू व एक संक्रमित आढळला असतानाही ती वस्ती सील करण्यासाठी तब्बल २४ तासापेक्षा उशीर झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे प्रशासन आता संक्रमणाच्या बाबतीत बेपर्वा असल्याचे स्पष्ट होत आहे, असा सूर नागरिक व्यक्त करत आहेत.

कोरोना प्रादुर्भावाच्या बातम्या झळकत असताना नागपुरात सापडलेल्या पहिल्या काही रुग्णांच्या वेळी प्रशासनाने प्रचंड तत्परता दाखवत तात्काळ जामबंदी केली होती. संक्रमणाचा वेग मुंबई, पुणे, दिल्लीच्या तुलनेत नागपूरमध्ये अतिशय मंद असतानाही ही तत्परता वाखाणण्याजोगी होती. मात्र, आता दर दिवसाला कोरोना स्फोट होऊ लागला असताना प्रशासकीय यंत्रणेत निर्माण झालेली ढिलाई कम्युनिटी स्प्रेडिंगला आमंत्रण देत असल्याचे दिसते. कळमना भागातील अतिशय दाट लोकवस्ती असलेल्या भारतनगरात रविवारी कोविड पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे हा रुग्ण बऱ्याच दिवसांपासून आजारी होता. रविवारीच मृत्यू झालेल्या रुग्णाच्या दुसºया गल्लीतील वृद्धाही संक्रमित आढळून आली. या दोन्ही घटना दुपारी १२ वाजताच्या सुमारासच्या आहेत. असे असतानाही ना मृत्यू झालेल्या रुग्णाची गल्ली ना संक्रमित वृद्धा असलेली गल्ली सील करण्यात आली. येथे प्रचंड वर्दळ होती, दूध डेअरी, भाजीविक्रेते, मुलांचा घोळका, नागरिक एकमेकांत सर्रास मिसळत असल्याचे दिसून येत होते. सोमवारी दुपारी १२ वाजता या परिसराचे निरीक्षण केले असता तेव्हाही बॅरिकेड्स, टिनाचे पत्रे वगैरे लावण्यात आले नव्हते. दुपारी २ वाजताच्या सुमारास मात्र सुरक्षा यंत्रणा, वस्ती सील करण्यासाठीचे साहित्य आणले गेले. वस्तीतून नऊ लोकांना क्वारंटाईन सेंटरमध्ये नेण्यात आले. तोवर हे सगळे संशयित एकमेकांशी मिसळल्याचे बोलले जाते. त्यामुळे कोण कोरोनाचा वाहक आहे आणि विषाणू कुठे कुठे स्प्रेड केला गेला, यामुळे या भागात प्रचंड दहशत आहे. या दोन्ही कोरोना रुग्णाच्या पाचव्या गल्लीपासून अतिशय दाट लोकवस्तीचे नेताजीनगर लागते. यावरून परिसरातील नागरिकांची स्थिती काय असेल, याचा अंदाज बांधता येतो.मिरची बाजार बेपर्वाकळमना बाजारातील मिरची मार्केटमध्येही एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला आहे. या रुग्णाला उपचारासाठी नेले असताना त्याच्या घरातला व्यक्ती अजूनही त्याच बाजारात कार्यरत असल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांसोबतच प्रशासनामध्येही संसर्ग रोखण्याबाबत ढिलाई आल्याचे दिसून येते.कम्युनिटी स्प्रेडिंगविषयी संभ्रम का?कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसेल असा आता एकही परिसर राहिलेला नाही. त्यातच आता दररोज शेकडोंच्या संख्येने संक्रमित आढळत आहेत. प्रशासनाकडून कम्युनिटी स्प्रेडिंगबाबत अद्यापही स्पष्टीकरण दिले जात नसले तरी दररोज वाढत असलेला रुग्णांचा आकडा संशयाला वाचा फोडतो आहे. अशा वेळी कम्युनिटी स्प्रेडिंगबाबत संभ्रम निर्माण केले जाऊन, प्रशासनाकडूनच प्रचंड दिरंगाई केली जात असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर