शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या निधीच्या वितरणातदेखील विदर्भावर अन्याय का? लोकप्रतिनिधींनी मौन सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 07:00 IST

Nagpur News विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या वाटेला अवघा १८ टक्के निधीच आला. तर दुसरीकडे औरंगाबाद विभागात तुलनेने कमी रुग्णसंख्या असूनदेखील नागपूर विभागाच्या तुलनेत ७५ टक्के अधिक निधी वितरित करण्यात आला.

ठळक मुद्देरुग्णसंख्या जास्त मात्र राज्य शासनाचा कमी निधी

नागपूर : राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून (एसडीआरएफ) राज्य शासनाने कोरोनाच्या विविध उपाययोजनांसाठी सर्व जिल्ह्यांना निधीचे वितरण केले. दोन्ही लाटांमध्ये महाराष्ट्र पोळून निघाला असताना मार्च २०२० ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत शासनाने निधी वितरणातदेखील अन्याय केला. विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या वाटेला अवघा १८ टक्के निधीच आला. तर दुसरीकडे औरंगाबाद विभागात तुलनेने कमी रुग्णसंख्या असूनदेखील नागपूर विभागाच्या तुलनेत ७५ टक्के अधिक निधी वितरित करण्यात आला.

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची एकूण रक्कम ३४३६ कोटी ८० लाख इतकी असून, यात केंद्राचा हिस्सा ७५ टक्के इतका आहे. कोरोनाच्या विविध उपाययोजनांसाठी शासनाने मार्च २०२० मध्ये ३५ टक्के व सप्टेंबर २०२० मध्ये ५० टक्के खर्चाची मर्यादा निश्चित केली. सप्टेंबरनंतर ५० टक्के निधीचे वितरण व्हायला हवे होते. ऑगस्ट २०२१ पर्यंत प्रत्यक्षात १ हजार ३६६ कोटी ६८ लाख ४३ हजार इतक्याच निधीचे वितरण करण्यात आले. ही टक्केवारी ३९ टक्के इतकीच होती.

२०२१ साली सप्टेंबर महिन्यापासून ‘कोरोना’बाधितांची संख्या कमी व्हायला लागली. नागपूर व अमरावती विभाग मिळून ऑगस्ट महिन्यापर्यंत ११ लाखांहून अधिक रुग्ण सापडले व २० हजारांहून अधिक मृत्यू झाले; परंतु प्रत्यक्षात २५१ कोटी १९ लाख ४४ हजारांचीच रक्कम वितरित करण्यात आली. दुसरीकडे या कालावधीपर्यंत औरंगाबाद विभागात ६ लाख ३५ हजार ८४६ रुग्ण आढळले व १६ हजार ९०६ रुग्णांचा मृत्यू झाला; परंतु तरीदेखील विभागाला विदर्भाहून जास्त अनुदान मिळाले. औरंगाबादला मिळालेल्या निधीचा आकडा ३१२ कोटी ८८ लाख ९८ हजार इतका होता. नाशिकमध्येदेखील साडेनऊ लाखांहून अधिक रुग्ण असताना १५५ कोटींचीच रक्कम मिळाली. कोरोनाची सर्वात जास्त दाहकता पुणे विभागात होती. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर मध्यापर्यंत तेथे जवळपास २० लाख रुग्ण आढळले व ४२ हजारांहून अधिक मृत्यू झाले. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत विभागाला ३४८ कोटी ६४ लाख रुपये प्राप्त झाले. तर कोकण विभागाला ३२४ कोटी ६१ लाख प्राप्त झाले.

मंत्र्यांचे मौन का ?

नागपूर व अमरावती विभागातील मोठे नेते महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात आहेत. असे असतानादेखील विदर्भाच्या वाट्याला कमी निधी आला व त्यावर शासनाला जाब विचारण्याची तसदी नेत्यांनी घेतली नाही. दुसऱ्या लाटेनंतरचा हाहाकार सर्वांंनीच अनुभवला. कमीत कमी संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तरी आवश्यक निधी खेचून आणावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

विभाग - एसडीआरएफ अंतर्गत मिळालेला निधी (ऑगस्ट २०२१ पर्यंत)

नागपूर - १७६ कोटी ९९ लाख २८ हजार

अमरावती - ७४ कोटी २० लाख १६ हजार

औरंगाबाद - ३१२ कोटी ८८ लाख ९८ हजार

नाशिक - १३१ कोटी ५१ लाख ८४ हजार

पुणे - ३४६ कोटी ४६ लाख ३६ हजार

कोकण - ३२४ कोटी ६१ लाख ८१ हजार

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस