शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

साध्या जिल्हाध्यक्ष निवडीचा निर्णयही दिल्लीत का व्हावा? - शशी थरूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2022 12:38 IST

निर्णयातही विकेंद्रीकरणाची गरज

नागपूर : पक्षाचा जिल्हाध्यक्ष निवडण्याचा निर्णय दिल्लीत का व्हावा? साध्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीत थेट राष्ट्रीय अध्यक्षांना हस्तक्षेप करावा लागत असेल तर ते योग्य नाही. अलीकडे पक्षातील कोणताही विषय असाे त्याचा निर्णय हायकमांड घेईल, अशी एक नोट जारी केली जाते. ही प्रथा बंद व्हावी, निर्णय प्रक्रियेचेही विकेंद्रीकरण व्हावे, अशी अपेक्षा कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी रविवारी येथे व्यक्त केली.

या बदलासाठीच आपली उमेदवारी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शशी थरूर हे अ. भा. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. याअंतर्गत त्यांनी रविवारी प्रेस क्लब येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्यांशी संवाद साधला. शशी थरूर म्हणाले, एकेकाळी प्रत्येक राज्यात मजबूत नेते होते. त्यांच्यामुळेच पक्षही मजबूत होत गेला. राज्यात अध्यक्ष आहेत. पण त्यांच्यावर जनरल सेक्रेटरी बसले आहेत. कोणताही निर्णय हायकमांड घेईल असे सांगितले जाते. हे बरोबर नाही. स्थानिक स्तरावरील नेत्यांना निवडीचे अधिकार असावे, ते योग्य निवड करतील, असा विश्वास त्यांच्यावर असावा. मन की बात खूप झाली, आता जन की बात ऐकली जात आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा यासाठीच आहे. यासोबतच सामान्य कार्यकर्त्यांचा आवाज ऐकण्याचीही गरज आहे. त्यासाठीच माजी उमेदवारी आहे.

आपला देश युवकांचा आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षही युवकांचा व्हावा. युवकांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी माजी आमदार आशिष देशमुख, गिरीष गांधी, ज्येष्ठ संपादक एस. एन. विनोद, कृष्णकुमार पांडे, दिनकर राऊत, सुमित भालेकर, किशोर जिचकार, सरफराज खान, शादाब शेख आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणShashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेस