शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

साध्या जिल्हाध्यक्ष निवडीचा निर्णयही दिल्लीत का व्हावा? - शशी थरूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2022 12:38 IST

निर्णयातही विकेंद्रीकरणाची गरज

नागपूर : पक्षाचा जिल्हाध्यक्ष निवडण्याचा निर्णय दिल्लीत का व्हावा? साध्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीत थेट राष्ट्रीय अध्यक्षांना हस्तक्षेप करावा लागत असेल तर ते योग्य नाही. अलीकडे पक्षातील कोणताही विषय असाे त्याचा निर्णय हायकमांड घेईल, अशी एक नोट जारी केली जाते. ही प्रथा बंद व्हावी, निर्णय प्रक्रियेचेही विकेंद्रीकरण व्हावे, अशी अपेक्षा कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी रविवारी येथे व्यक्त केली.

या बदलासाठीच आपली उमेदवारी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शशी थरूर हे अ. भा. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. याअंतर्गत त्यांनी रविवारी प्रेस क्लब येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्यांशी संवाद साधला. शशी थरूर म्हणाले, एकेकाळी प्रत्येक राज्यात मजबूत नेते होते. त्यांच्यामुळेच पक्षही मजबूत होत गेला. राज्यात अध्यक्ष आहेत. पण त्यांच्यावर जनरल सेक्रेटरी बसले आहेत. कोणताही निर्णय हायकमांड घेईल असे सांगितले जाते. हे बरोबर नाही. स्थानिक स्तरावरील नेत्यांना निवडीचे अधिकार असावे, ते योग्य निवड करतील, असा विश्वास त्यांच्यावर असावा. मन की बात खूप झाली, आता जन की बात ऐकली जात आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा यासाठीच आहे. यासोबतच सामान्य कार्यकर्त्यांचा आवाज ऐकण्याचीही गरज आहे. त्यासाठीच माजी उमेदवारी आहे.

आपला देश युवकांचा आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षही युवकांचा व्हावा. युवकांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी माजी आमदार आशिष देशमुख, गिरीष गांधी, ज्येष्ठ संपादक एस. एन. विनोद, कृष्णकुमार पांडे, दिनकर राऊत, सुमित भालेकर, किशोर जिचकार, सरफराज खान, शादाब शेख आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणShashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेस