शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

साध्या जिल्हाध्यक्ष निवडीचा निर्णयही दिल्लीत का व्हावा? - शशी थरूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2022 12:38 IST

निर्णयातही विकेंद्रीकरणाची गरज

नागपूर : पक्षाचा जिल्हाध्यक्ष निवडण्याचा निर्णय दिल्लीत का व्हावा? साध्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीत थेट राष्ट्रीय अध्यक्षांना हस्तक्षेप करावा लागत असेल तर ते योग्य नाही. अलीकडे पक्षातील कोणताही विषय असाे त्याचा निर्णय हायकमांड घेईल, अशी एक नोट जारी केली जाते. ही प्रथा बंद व्हावी, निर्णय प्रक्रियेचेही विकेंद्रीकरण व्हावे, अशी अपेक्षा कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी रविवारी येथे व्यक्त केली.

या बदलासाठीच आपली उमेदवारी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शशी थरूर हे अ. भा. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. याअंतर्गत त्यांनी रविवारी प्रेस क्लब येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्यांशी संवाद साधला. शशी थरूर म्हणाले, एकेकाळी प्रत्येक राज्यात मजबूत नेते होते. त्यांच्यामुळेच पक्षही मजबूत होत गेला. राज्यात अध्यक्ष आहेत. पण त्यांच्यावर जनरल सेक्रेटरी बसले आहेत. कोणताही निर्णय हायकमांड घेईल असे सांगितले जाते. हे बरोबर नाही. स्थानिक स्तरावरील नेत्यांना निवडीचे अधिकार असावे, ते योग्य निवड करतील, असा विश्वास त्यांच्यावर असावा. मन की बात खूप झाली, आता जन की बात ऐकली जात आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा यासाठीच आहे. यासोबतच सामान्य कार्यकर्त्यांचा आवाज ऐकण्याचीही गरज आहे. त्यासाठीच माजी उमेदवारी आहे.

आपला देश युवकांचा आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षही युवकांचा व्हावा. युवकांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी माजी आमदार आशिष देशमुख, गिरीष गांधी, ज्येष्ठ संपादक एस. एन. विनोद, कृष्णकुमार पांडे, दिनकर राऊत, सुमित भालेकर, किशोर जिचकार, सरफराज खान, शादाब शेख आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणShashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेस