शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

अल्पवयीन गुन्हेगारांना शाही मेजवानी कशासाठी? बाल न्याय अधिनियम-२०१५ मध्ये बदल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 16:02 IST

अल्पवयीन गुन्हेगारांना शाही मेजवानी का? असा सवाल बेटियां शक्ती फाऊंडेशनतर्फे करण्यात येत आहे.

ठळक मुद्देबलात्काराच्या घटनेत अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या वाढतेय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अल्पवयीन गुन्हेगारांना बाल न्याय अधिनियमानुसार बालकांच्या शासकीय निरीक्षण गृहात ठेवण्यात येते. अधिनियमातील तरतुदीनुसार या बाल गुन्हेगारांना निरीक्षण गृहात लजीज पदार्थांची मेजवानी मिळते. शिवाय त्यांच्या निवासाची व्यवस्थाही अतिशय दर्जेदार असते. या सर्व सोयीसुविधा ते फक्त बाल गुन्हेगार आहेत म्हणून व त्यांच्यात सुधारणा व्हावी म्हणूनच असतात. पण त्यांचा सुधारण्याचा दर शून्य टक्के आहे. त्यामुळे अशा अल्पवयीन गुन्हेगारांना शाही मेजवानी का? असा सवाल बेटियां शक्ती फाऊंडेशनतर्फे करण्यात येत आहे. बाल गुन्हेगारांच्या बाबतीत विशेषत: बलात्काराच्या घटनेत सहभागी असलेल्या बाल गुन्हेगारांच्या बाबतीत बाल न्याय अधिनियमात सुधारणा करण्याची मागणी फाऊंडेशनने राष्ट्रपती, पंतप्रधानांकडे केली आहे.बलात्कार व सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अल्पवयीन बालकांची संख्या वाढत आहे. दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणात मुख्य आरोपी हा बाल गुन्हेगारच होता. संघटनेने महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तर प्रदेशातील बाल गुन्हेगारांना देण्यात येणाऱ्या सुविधा व निरीक्षण गृहांची संख्या याची माहिती माहितीच्या अधिकारात मागविली. काही निरीक्षण गृहातून मिळालेल्या माहितीनुसार बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये बालकांचा समावेश मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. मध्य प्रदेशातील बैतूल निरीक्षण गृहात ११ महिन्यात बलात्काराचे २० अल्पवयीन गुन्हेगार आहेत. झाबुआ निरीक्षण गृहात ११ महिन्यात ११९ बाल गुन्हेगार आहेत. महाराष्ट्रातील यवतमाळ निरीक्षण गृहात ११ महिन्यात ६ गुन्हेगार आहेत. महाराष्ट्रात १४, उत्तर प्रदेशात २६ तर मध्य प्रदेशात १८ बाल निरीक्षण गृह आहेत. उत्तर प्रदेशात दररोज सरासरी १० बाल गुन्हेगारांची नोंद होत असल्याची माहिती फाऊंडेशनला मिळाली आहे.

बाल गुन्हेगारांवर गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्यांना निरीक्षण गृहात ठेवण्यात येते. निरीक्षण गृहात त्यांना काय सुविधा पुरविली जाते, याची माहिती तीनही राज्यांतून फाऊंडेशनने मिळविली. यात निवासासाठी स्वतंत्र बेड, मच्छरदानी, टेलिव्हिजन, कुलर, इनडोअर गेम्स आदी सुविधा त्यांना मिळतात. जेवण आणि नाश्त्यामध्ये त्यांना दूध, फळ, अंडी, मटण, पालक पनीर, शाही पनीर आदी दिले जाते. या सर्व सुविधा पुरविण्यात येत असतानाही बाल गुन्हेगारांमध्ये सकारात्मक बदल घडत नसल्याचे संस्थेच्या सर्वेक्षणात आले आहे.- काही गुन्ह्यांबाबतीत कारवाई कठोर असावीएकीकडे देशात लाखो विद्यार्थ्यांना पडक्या इमारतींमध्ये जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागते. माध्यान्ह भोजनात त्यांना पिवळा भात देण्यात येतो. दुसरीकडे अल्पवयीन बाल गुन्हेगारांना शाही मेजवानी दिली जाते. उलट बाल गुन्हेगाराच्या कृत्यास बळी पडलेल्या पीडितेला न्याय मिळेलच असे काही नाही. त्यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात बाल गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणून घोषित करावे, त्यात शिक्षेची तरतूदही कठोर असावी.- श्रीधर आडे, अध्यक्ष, बेटियां शक्ती फाऊंडेशन

 

 

 

टॅग्स :Courtन्यायालय