शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

दीक्षाभूमीला ‘अ’श्रेणी का नाही ?

By admin | Updated: August 25, 2015 03:57 IST

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी ऐतिहासिक धम्मक्रांती केली ती दीक्षाभूमी आज भारतच नव्हे तर समस्त

आनंद डेकाटे ल्ल नागपूरमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी ऐतिहासिक धम्मक्रांती केली ती दीक्षाभूमी आज भारतच नव्हे तर समस्त जगाला मानवतेची शिकवण देणारी आधुनिक तक्षशीला बनली आहे. जगभरातील लोकांचा ओढा दीक्षाभूमीच्या दिशेने वाढत आहे. दीक्षाभूमी आज जगभराला ऊर्जा देणारी क्रांतिभूमी म्हणून ओळखली जाते. असे असतानाही जागतिक कीर्तीच्या दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यास शासनाने ‘कंजुषी’ का दाखविली? असा संतप्त सवाल आंबेडकरी जनतेने केला आहे.राज्य शासनातर्फे दीक्षाभूमीला ‘ब’ श्रेणी तीर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आंबेडकरी जनतेचा हा सवाल केवळ भावनिक नाही तर त्याला ठोस कारणसुद्धा आहे. यासंदर्भात राज्य शासनातर्फे ८ नोव्हेंबर १९९६ रोजी गृह विभागाने काढलेला शासन निर्णय हाती लागला आहे. या शासन निर्णयानुसार राज्यातील पर्यटन स्थळांचा विकास करण्याबाबत निवड करण्यात येणाऱ्या ठिकाणांची ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशा तीन श्रेणीमध्ये वर्गीकरण करून त्या तीन याद्या महाराष्ट्र विकास महामंडळाने तयार कराव्यात, असे स्पष्ट केले आहे. तसेच अ, ब व क श्रेणीमध्ये निवड करण्यासाठी नियमावलीसुद्धा दिली आहे. त्यानुसार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीची ठिकाणे, केंद्र शासन व परराष्ट्रांकडून मिळणाऱ्या अर्थसाहाय्याने विकसित करण्यात येणारी ठिकाणे यांचा समावेश ‘अ’ श्रेणीमध्ये करण्यात यावा, असे शासन निर्णयात म्हटले आहे. काय म्हणतो शासन निर्णय ४शासन निर्णयानुसार ‘अ, ‘ब’ व ‘क’ श्रेणीसाठी कोणत्या स्थळांची निवड करावी हे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार ‘अ’ श्रेणीमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीची ठिकाणे आणि परराष्ट्रांकडून मिळणाऱ्या अर्थसहाय्याने विकसित करण्यात येणारी ठिकाणे यांचा समावेश राहील. दीक्षाभूमी हे या दोन्ही पातळीवर तंतोतंत उतरणारे ठिकाण ठरते. दीक्षाभूमी हे एक बौद्ध तीर्थक्षेत्र म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. जगभरातील पर्यटक दीक्षाभूमीला भेटी देण्यासाठी येतात. बौद्ध, तीर्थक्षेत्र असल्याने बौद्ध राष्ट्रांकडून दीक्षाभूमीच्या विकासासाठी निश्चित मदत घेता येऊ शकते.