शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

दीक्षाभूमीला ‘अ’श्रेणी का नाही ?

By admin | Updated: August 25, 2015 03:57 IST

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी ऐतिहासिक धम्मक्रांती केली ती दीक्षाभूमी आज भारतच नव्हे तर समस्त

आनंद डेकाटे ल्ल नागपूरमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी ऐतिहासिक धम्मक्रांती केली ती दीक्षाभूमी आज भारतच नव्हे तर समस्त जगाला मानवतेची शिकवण देणारी आधुनिक तक्षशीला बनली आहे. जगभरातील लोकांचा ओढा दीक्षाभूमीच्या दिशेने वाढत आहे. दीक्षाभूमी आज जगभराला ऊर्जा देणारी क्रांतिभूमी म्हणून ओळखली जाते. असे असतानाही जागतिक कीर्तीच्या दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यास शासनाने ‘कंजुषी’ का दाखविली? असा संतप्त सवाल आंबेडकरी जनतेने केला आहे.राज्य शासनातर्फे दीक्षाभूमीला ‘ब’ श्रेणी तीर्थक्षेत्र पर्यटनाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आंबेडकरी जनतेचा हा सवाल केवळ भावनिक नाही तर त्याला ठोस कारणसुद्धा आहे. यासंदर्भात राज्य शासनातर्फे ८ नोव्हेंबर १९९६ रोजी गृह विभागाने काढलेला शासन निर्णय हाती लागला आहे. या शासन निर्णयानुसार राज्यातील पर्यटन स्थळांचा विकास करण्याबाबत निवड करण्यात येणाऱ्या ठिकाणांची ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशा तीन श्रेणीमध्ये वर्गीकरण करून त्या तीन याद्या महाराष्ट्र विकास महामंडळाने तयार कराव्यात, असे स्पष्ट केले आहे. तसेच अ, ब व क श्रेणीमध्ये निवड करण्यासाठी नियमावलीसुद्धा दिली आहे. त्यानुसार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीची ठिकाणे, केंद्र शासन व परराष्ट्रांकडून मिळणाऱ्या अर्थसाहाय्याने विकसित करण्यात येणारी ठिकाणे यांचा समावेश ‘अ’ श्रेणीमध्ये करण्यात यावा, असे शासन निर्णयात म्हटले आहे. काय म्हणतो शासन निर्णय ४शासन निर्णयानुसार ‘अ, ‘ब’ व ‘क’ श्रेणीसाठी कोणत्या स्थळांची निवड करावी हे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार ‘अ’ श्रेणीमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीची ठिकाणे आणि परराष्ट्रांकडून मिळणाऱ्या अर्थसहाय्याने विकसित करण्यात येणारी ठिकाणे यांचा समावेश राहील. दीक्षाभूमी हे या दोन्ही पातळीवर तंतोतंत उतरणारे ठिकाण ठरते. दीक्षाभूमी हे एक बौद्ध तीर्थक्षेत्र म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. जगभरातील पर्यटक दीक्षाभूमीला भेटी देण्यासाठी येतात. बौद्ध, तीर्थक्षेत्र असल्याने बौद्ध राष्ट्रांकडून दीक्षाभूमीच्या विकासासाठी निश्चित मदत घेता येऊ शकते.