शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
3
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
4
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
7
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
8
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
9
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
10
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
11
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
12
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
13
'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
14
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
15
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
16
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
17
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
18
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
19
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
20
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार

नागपूर विद्यापीठाच्या विभागांत प्रवेशबंदी का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 23:25 IST

बारावीच्या निकालानंतर प्रवेशाची लगीनघाई सुरू झाली असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २५३ महाविद्यालयात संपूर्ण किंवा अभ्यासक्रमनिहाय प्रवेशबंदी लागू केली आहे. या निर्णयामुळे विद्यापीठ वर्तुळात संतापाचे वातावरण आहे. नागपूर विद्यापीठाच्या अनेक विभागांचा कारभार बहुतांशपणे कंत्राटी शिक्षकांवर सुरू आहे. एकीकडे विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रवेशबंदी लावणाऱ्या विद्यापीठाने विद्यापीठाच्या विभागांमध्ये हे पाऊल का उचलले नाही, असा प्रश्न प्राचार्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठाच्या विभागांत प्रवेशबंदी का नाही?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बारावीच्या निकालानंतर प्रवेशाची लगीनघाई सुरू झाली असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २५३ महाविद्यालयात संपूर्ण किंवा अभ्यासक्रमनिहाय प्रवेशबंदी लागू केली आहे. या निर्णयामुळे विद्यापीठ वर्तुळात संतापाचे वातावरण आहे. नागपूर विद्यापीठाच्या अनेक विभागांचा कारभार बहुतांशपणे कंत्राटी शिक्षकांवर सुरू आहे. एकीकडे विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रवेशबंदी लावणाऱ्या विद्यापीठाने विद्यापीठाच्या विभागांमध्ये हे पाऊल का उचलले नाही, असा प्रश्न प्राचार्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.नागपूर विद्यापीठात ६०१ संलग्नित महाविद्यालये आहेत. यातील १२६ महाविद्यालयांमध्ये आवश्यक नियमित शिक्षक, कर्मचारी व सोयीसुविधा नसल्यामुळे त्यांचे प्रथम वर्षाचे प्रवेश गोठविण्यात आले. याशिवाय अगोदर विद्यापीठाने निरंतर संलग्नीकरणासाठी अर्ज न करणाऱ्या ९८ तर ‘एलईसी’ची प्रक्रिया न पाळणाऱ्या २९ महाविद्यालयांमधील प्रवेश गोठविले होते. आता एकूण २५३ महाविद्यालयांमध्ये प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, या निर्णयाला महाविद्यालयांमधून विरोध सुरू झाला आहे. नागपूर विद्यापीठात आजच्या स्थितीत ३५२ पैकी १५६ प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. अशास्थितीत अनेक विभागांत तर नियमित शिक्षकांचीदेखील वानवा आहे. महाविद्यालयांना लावलेल्या नियमांनुसार त्या विभागांमध्येदेखील विद्यापीठाने प्रवेशबंदी लागू करायला हवी, असा सूर प्राचार्यांमध्ये आहे. जर विद्यापीठाने विभागांमध्ये कंत्राटी शिक्षकांची भरती करण्याची अधिसूचना काढली आहे, तर मग महाविद्यालयांनादेखील ही परवानगी द्यायला हवी, अशी मागणीदेखील समोर येत आहे.विद्यापीठाच्या पोटात का दुखते?प्राचार्य फोरमचे अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे यांनी विद्यापीठाचे हे पाऊल विद्यार्थीहिताचे नसल्याची टीका केली आहे. मुळात स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रम आणि नियमित शिक्षक यांची सांगड घालणे अतिशय कठीण बाब आहे. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून अनेक नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम नागपुरात आले आहेत. या अभ्यासक्रमांना अनुदानित तुकड्यांमधील पात्र शिक्षक शिकवत आहेत. असे असताना विद्यापीठाच्या पोटात दुखण्याचे कारण काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केवळ एका व्यक्तीसोबत असलेल्या वैमनस्यामुळे शेकडो महाविद्यालये व हजारो विद्यार्थ्यांसोबत विद्यापीठ प्रशासन खेळखंडोबा करत असल्याचा त्यांनी आरोप लावला.विद्यापीठाच्या विभागांत प्रवेशबंदी का नाहीमहाविद्यालये गप्प का?यासंदर्भात कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना विचारणा केली असता, नियमांनुसारच महाविद्यालयांवर कारवाई करण्यात आली आहे. अनुदानित महाविद्यालयांवर ही कारवाई झालेली नाही. विनाअनुदानित महाविद्यालये व स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांवर नियमांनुसारच कारवाई झाली आहे. जर त्यांनी शिक्षकांची भरती केली तर त्यांच्यावरील बंदी उठविण्याला आमची काहीच हरकत नसेल. जर विद्यापीठाने चुकीचे पाऊल उचलले आहे, तर मग एकाही महाविद्यालयाकडून आक्षेपाचे पत्रदेखील का आले नाही, असा प्रश्न डॉ. काणे यांनी उपस्थित केला.विद्यापीठाच्या विभागांमधील रिक्त पदांची स्थितीसंवर्ग                      मंजूर पदे      भरलेली         पदे रिक्त पदेप्राध्यापक                ५३                २५                 २८सहयोगी प्राध्यापक  ८९                 ४७                ४२सहायक प्राध्यापक १९२               ११९                ७३शिक्षक समकक्ष        १८               १०                  ०८एकूण                      ३५२             १९६               १५६

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर