शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नागपूर विद्यापीठाच्या विभागांत प्रवेशबंदी का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 23:25 IST

बारावीच्या निकालानंतर प्रवेशाची लगीनघाई सुरू झाली असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २५३ महाविद्यालयात संपूर्ण किंवा अभ्यासक्रमनिहाय प्रवेशबंदी लागू केली आहे. या निर्णयामुळे विद्यापीठ वर्तुळात संतापाचे वातावरण आहे. नागपूर विद्यापीठाच्या अनेक विभागांचा कारभार बहुतांशपणे कंत्राटी शिक्षकांवर सुरू आहे. एकीकडे विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रवेशबंदी लावणाऱ्या विद्यापीठाने विद्यापीठाच्या विभागांमध्ये हे पाऊल का उचलले नाही, असा प्रश्न प्राचार्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठाच्या विभागांत प्रवेशबंदी का नाही?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बारावीच्या निकालानंतर प्रवेशाची लगीनघाई सुरू झाली असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २५३ महाविद्यालयात संपूर्ण किंवा अभ्यासक्रमनिहाय प्रवेशबंदी लागू केली आहे. या निर्णयामुळे विद्यापीठ वर्तुळात संतापाचे वातावरण आहे. नागपूर विद्यापीठाच्या अनेक विभागांचा कारभार बहुतांशपणे कंत्राटी शिक्षकांवर सुरू आहे. एकीकडे विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रवेशबंदी लावणाऱ्या विद्यापीठाने विद्यापीठाच्या विभागांमध्ये हे पाऊल का उचलले नाही, असा प्रश्न प्राचार्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.नागपूर विद्यापीठात ६०१ संलग्नित महाविद्यालये आहेत. यातील १२६ महाविद्यालयांमध्ये आवश्यक नियमित शिक्षक, कर्मचारी व सोयीसुविधा नसल्यामुळे त्यांचे प्रथम वर्षाचे प्रवेश गोठविण्यात आले. याशिवाय अगोदर विद्यापीठाने निरंतर संलग्नीकरणासाठी अर्ज न करणाऱ्या ९८ तर ‘एलईसी’ची प्रक्रिया न पाळणाऱ्या २९ महाविद्यालयांमधील प्रवेश गोठविले होते. आता एकूण २५३ महाविद्यालयांमध्ये प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, या निर्णयाला महाविद्यालयांमधून विरोध सुरू झाला आहे. नागपूर विद्यापीठात आजच्या स्थितीत ३५२ पैकी १५६ प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. अशास्थितीत अनेक विभागांत तर नियमित शिक्षकांचीदेखील वानवा आहे. महाविद्यालयांना लावलेल्या नियमांनुसार त्या विभागांमध्येदेखील विद्यापीठाने प्रवेशबंदी लागू करायला हवी, असा सूर प्राचार्यांमध्ये आहे. जर विद्यापीठाने विभागांमध्ये कंत्राटी शिक्षकांची भरती करण्याची अधिसूचना काढली आहे, तर मग महाविद्यालयांनादेखील ही परवानगी द्यायला हवी, अशी मागणीदेखील समोर येत आहे.विद्यापीठाच्या पोटात का दुखते?प्राचार्य फोरमचे अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे यांनी विद्यापीठाचे हे पाऊल विद्यार्थीहिताचे नसल्याची टीका केली आहे. मुळात स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रम आणि नियमित शिक्षक यांची सांगड घालणे अतिशय कठीण बाब आहे. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून अनेक नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम नागपुरात आले आहेत. या अभ्यासक्रमांना अनुदानित तुकड्यांमधील पात्र शिक्षक शिकवत आहेत. असे असताना विद्यापीठाच्या पोटात दुखण्याचे कारण काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केवळ एका व्यक्तीसोबत असलेल्या वैमनस्यामुळे शेकडो महाविद्यालये व हजारो विद्यार्थ्यांसोबत विद्यापीठ प्रशासन खेळखंडोबा करत असल्याचा त्यांनी आरोप लावला.विद्यापीठाच्या विभागांत प्रवेशबंदी का नाहीमहाविद्यालये गप्प का?यासंदर्भात कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना विचारणा केली असता, नियमांनुसारच महाविद्यालयांवर कारवाई करण्यात आली आहे. अनुदानित महाविद्यालयांवर ही कारवाई झालेली नाही. विनाअनुदानित महाविद्यालये व स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांवर नियमांनुसारच कारवाई झाली आहे. जर त्यांनी शिक्षकांची भरती केली तर त्यांच्यावरील बंदी उठविण्याला आमची काहीच हरकत नसेल. जर विद्यापीठाने चुकीचे पाऊल उचलले आहे, तर मग एकाही महाविद्यालयाकडून आक्षेपाचे पत्रदेखील का आले नाही, असा प्रश्न डॉ. काणे यांनी उपस्थित केला.विद्यापीठाच्या विभागांमधील रिक्त पदांची स्थितीसंवर्ग                      मंजूर पदे      भरलेली         पदे रिक्त पदेप्राध्यापक                ५३                २५                 २८सहयोगी प्राध्यापक  ८९                 ४७                ४२सहायक प्राध्यापक १९२               ११९                ७३शिक्षक समकक्ष        १८               १०                  ०८एकूण                      ३५२             १९६               १५६

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर