शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

नो एक्सचेंज कशासाठी ?

By admin | Updated: October 11, 2014 02:49 IST

एकदा वस्तू खरेदी केल्यावर ती परत घेतली जाणार नाही, असा फलक लावणे किंवा देयकावरही (बिल) तसे लिहिणे बेकायदेशीर आहे, ....

नागपूर : एकदा वस्तू खरेदी केल्यावर ती परत घेतली जाणार नाही, असा फलक लावणे किंवा देयकावरही (बिल) तसे लिहिणे बेकायदेशीर आहे, अशा शासनाच्या स्पष्ट सूचना असतानाही याचा प्रसार आणि प्रचार न झाल्याने ग्राहकांची लुबाडणूक सुरूच आहे. दिवाळी खरेदी हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही बाब जागरूक ग्राहकांनी निदर्शनास आणून दिली आहे.कुठलीही वस्तू किंवा तत्सम माल खरेदी करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना दुकानात ‘ एकदा खरेदी केलेला माल परत घेतला जाणार नाही’ असे लिहिलेले फलक टांगलेले दिसतात. अनेक मॉल्स, शोरूम्समध्येही ते आढळतात. व्यापारी त्यांच्या देयकावरही ही बाब प्रकर्षाने प्रसिद्ध करतात. यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याने १८ आॅगस्ट २००१ ला एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार ग्राहक संरक्षण कायदा १९८६ मधील तरतुदीनुसार दोषयुक्त वस्तू किंवा सेवेतील उणिवा, अधिक पैसे घेणे आदीसाठी ग्राहकाला व्यापाऱ्यांविरुद्ध दाद मागता येते. अशा वेळी ग्राहक मंच सदर वस्तू दुरुस्त किंवा बदल करून देण्यास संबंधितांना सांगू शकतो. विकसित देशात वस्तू खरेदी केल्यावर ग्राहक समाधानी नसेल तर ती बदलून देण्याची किंवा पैसे परत करण्याची हमी देण्यात येते. महाराष्ट्रात मात्र एकदा विकलेला माल परत घेणार नाही, अशी अट व्यापाऱ्यांकडून टाकली जाते. अशी अट टाकणे नियमानुसार बेकायदेशीर आणि ग्राहक हिताविरुद्ध आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी त्यांच्या देयकावर ‘विकलेला माल परत घेतला जाणार नाही’ अशी अट टाकू नये, असे शासनाच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)