शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा प्रकल्प गैरव्यवहारातील अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 11:02 IST

Nagpur : यवतमाळचा बेंबळा प्रकल्प; उच्च न्यायालयाची विचारणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बेंबळा यवतमाळ अमृत पाणी पुरवठा प्रकल्पातील गैरव्यवहारासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर अद्याप काहीच कारवाई का केली नाही, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली आहे. याबाबत नाराजी व्यक्त करतानाच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार की नाही, यावर तीन आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, बेंबळा यवतमाळ अमृत पाणी पुरवठा प्रकल्पाला पाइप पुरवठा करण्यासाठी त्रिपक्षीय करार करण्याचा आणि निकृष्ट दर्जाचे पाइप फुटून शेतपिकांचे नुकसान झाल्यामुळे पीडित शेतकऱ्यांना नगर परिषदेच्या निधीमधून भरपाई देण्याचे वादग्रस्त निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री व नगर विकास मंत्र्यांच्या मंजुरीनेच घेतले गेले होते, अशी माहिती राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला प्रतिज्ञापत्राद्वारे दिली. 

यवतमाळ शहरात प्रचंड पाणीटंचाई आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. ही बाब लक्षात घेता यवतमाळ पाणी पुरवठा प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची गरज होती. परिणामी, प्रकल्प अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे तत्कालीन सदस्य सचिव संतोषकुमार यांनी पाइप पुरवठ्चासाठी त्रिपक्षीय करार करण्याचा प्रस्ताव १६ डिसेंबर २०१७ रोजी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना सादर केला होता. त्यामुळे तत्कालीन सहसचिव पी. जे. जाधव यांनी नगर विकास विभागाच्या तत्कालीन प्रधान सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर यांच्यामार्फत तत्कालीन मुख्यमंत्री व नगर विकासमंत्र्यांना प्रशासकीय निर्देशाची मागणी केली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री व नगरविकास मंत्र्यांनी त्रिपक्षीय कराराचा प्रस्ताव मंजूर केला.

नगर विकास विभागाने ८ जानेवारी २०१८ रोजी पाइप पुरवठ्यासाठी त्रिपक्षीय करार करण्याचे आणि ३१ मार्च २०१८पूर्वी प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश प्राधिकरणला दिले. करिता, २ फेब्रुवारी २०१८ रोजी मे. जय बालाजी पाइप इंडस्ट्रीज, कंत्राटदार मे. पी. एल. आडके व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार झाला. याशिवाय, ५ जानेवारी २०१९ रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पीडित शेतकऱ्यांच्या भरपाईवर चर्चा झाली होती. त्यानुसार, यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी ३० मे २०१९ रोजी राज्य सरकारला पत्र पाठवून शेतकऱ्यांना ५९ लाख ६३ हजार ४८ रुपयांची भरपाई कुठून द्यायची, यावर मार्गदर्शन मागितले होते. त्यामुळे ही भरपाई नगर परिषदेच्या निधीवरील व्याजामधून देण्याचा प्रस्ताव पुढे आला होता.

तत्कालीन मुख्यमंत्री व नगर विकास मंत्र्यांनी तो प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर नगर विकास विभागाने १८ जून २०१९ रोजी यासंदर्भात आदेश जारी केला, असे सौनिक यांनी न्यायालयाला सांगितले.

जनहित याचिका प्रलंबितहा प्रकल्प नियमानुसार पूर्ण व्हावा, यासाठी यवतमाळ येथील रहिवासी दिगंबर पचगाडे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने सौनिक यांच्या प्रतिज्ञापत्रातील मुद्दे विचारात घेण्यासाठी प्रकरणावर तीन आठवड्यानंतर सुनावणी निश्चित केली. वरिष्ठ अॅड. फिरदौस मिर्झा यांनी न्यायालय मित्र म्हणून कामकाज पाहिले.

टॅग्स :bhandara-acभंडाराCorruptionभ्रष्टाचार