शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

का दुर्मिळ होत आहे गावरान आंबा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 20:27 IST

उन्हाळा आला की बहुतेकांना आतुरता असते ती आंब्याची. हिरव्या, पिवळ्या आणि काहीशा गुलाबी रंगातील या फळांच्या राजाने रस्ते आणि बाजारही सजले आहेत. यातही अनेकांच्या मनाला भावतो तो खास वैदर्भीय गावरान आंबा. मात्र या गावरान आंब्याची प्रतीक्षा करणाऱ्या लोकांची यावर्षी मात्र निराशा होत आहे. कारण गावरान आंबा यावेळी दिसेनासा झाला आहे. मे महिना उलटूनही या आंब्याची चव लोकांना मिळाली नाही. त्यामुळे गावरान आंबा दुर्मिळ होत आहे की काय, अशी चुकचुक आंबा प्रेमींना होत आहे.

ठळक मुद्देमे उलटूनही शहरात आवक नाही : वातावरण बदलाचा बसला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळा आला की बहुतेकांना आतुरता असते ती आंब्याची. हिरव्या, पिवळ्या आणि काहीशा गुलाबी रंगातील या फळांच्या राजाने रस्ते आणि बाजारही सजले आहेत. यातही अनेकांच्या मनाला भावतो तो खास वैदर्भीय गावरान आंबा. मात्र या गावरान आंब्याची प्रतीक्षा करणाऱ्या लोकांची यावर्षी मात्र निराशा होत आहे. कारण गावरान आंबा यावेळी दिसेनासा झाला आहे. मे महिना उलटूनही या आंब्याची चव लोकांना मिळाली नाही. त्यामुळे गावरान आंबा दुर्मिळ होत आहे की काय, अशी चुकचुक आंबा प्रेमींना होत आहे.लॉकडाऊनच्या काळातही वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याची मोठी आवक शहरात झाली आहे. बैगनफली, केशर, हापूस, लंगडा, दशेहरी अशा प्रजातींच्या आंब्यांनी रस्ते आणि बाजार सजले आहेत. मात्र यात गावरान आंबा कुठेही नाही. जाणकारांच्या मते, यावर्षी वैदर्भीय गावरान आंब्याचे उत्पादन न होण्याची अनेक कारणे आहेत. हवामानातील बदल त्यासाठी कारणीभूत आहे. वृक्ष व पक्षी अभ्यासक नितीन मराठे यांनी सांगितले, यावर्षी भर उन्हाळ्यातही पावसाने नियमित हजेरी लावली आहे. आंब्याला ऐन मोहर आलेला असताना पावसाळी वादळवाºयाने हा मोहर झडला शिवाय लहान कैºयाही झडून पडल्या. त्यामुळे आंब्याचे उत्पादन हवे तसे झाले नाही. शहरातच नाही तर गावातही लोकांना हवा तसा आंब्याचा आस्वाद घेता आला नाही. हे यावर्षी आंबा कमी होण्याचे नैमित्तिक कारण आहे. मात्र गावरान आंब्याबाबत निर्माण झालेली उदासीनता हे दूरवर परिणाम करणारे कारण दुर्लक्षित करता येणार नाही, असे मत मराठे यांनी व्यक्त केले.

आमराईच उरली नाहीनितीन मराठे यांनी गेल्या काही वर्षांतील अभ्यासाअंती नोंदविलेले निरीक्षण चिंता करण्यासारखे आहे. पूर्वी बैलजोडीच्या मदतीने शेतीची कामे व्हायची. नांगरणी, वखरणी उन्हाळ्यात व्हायची. काम करून थकल्यानंतर सावलीत जेवण करता यावे, आराम करता यावा म्हणून एक तरी आंब्याचे झाड शेतात असायचे. पण ट्रॅक्टरने शेतीची कामे सुरू झाल्यानंतर हीच विशाल झाडे अडचणींची झाली. झाडाच्या सावलीत पिके येत नाहीत म्हणून या झाडांची कटाई झाली. गावोगावी आमराईत शेकडो झाडे असायची. मात्र कृषिमालासाठी पेट्या बनवायला आंब्याच्या लाकडाचा उपयोग केला जातो. त्यामुळे मोठी वृक्षतोड करून ती विकण्यात आली. त्यामुळे आमराई शिल्लक राहिली नाही. म्हणूनच येत्या काळात गावरान आंबे दुर्मिळ होतील, अशी भीती मराठे यांनी व्यक्त केली.

आंबा लागवडीला प्रोत्साहन मिळावेशासनाने शेतावर आंब्याचे झाड असलेल्या शेतकऱ्यांना पाच वर्षातून एकदा सबसिडी द्यावी, जेणेकरून शेतकरी आंब्याचे जतन करतील. गावरान आंब्याला फळे यायला बरीच वर्षे लागतात. त्यामुळे लवकर फळे देणाऱ्या हायब्रीड प्रजातीला प्राधान्य दिले जाते. वृक्षारोपण कार्यक्रमात कॅशिया, गुलमोहर, सप्तपर्णी अशा निरुपयोगी विदेशी वृक्षांची लागवड करण्यापेक्षा आंब्याची लागवड करावी, अशी गरज मराठे यांनी व्यक्त केली.