शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

का दुर्मिळ होत आहे गावरान आंबा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 20:27 IST

उन्हाळा आला की बहुतेकांना आतुरता असते ती आंब्याची. हिरव्या, पिवळ्या आणि काहीशा गुलाबी रंगातील या फळांच्या राजाने रस्ते आणि बाजारही सजले आहेत. यातही अनेकांच्या मनाला भावतो तो खास वैदर्भीय गावरान आंबा. मात्र या गावरान आंब्याची प्रतीक्षा करणाऱ्या लोकांची यावर्षी मात्र निराशा होत आहे. कारण गावरान आंबा यावेळी दिसेनासा झाला आहे. मे महिना उलटूनही या आंब्याची चव लोकांना मिळाली नाही. त्यामुळे गावरान आंबा दुर्मिळ होत आहे की काय, अशी चुकचुक आंबा प्रेमींना होत आहे.

ठळक मुद्देमे उलटूनही शहरात आवक नाही : वातावरण बदलाचा बसला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळा आला की बहुतेकांना आतुरता असते ती आंब्याची. हिरव्या, पिवळ्या आणि काहीशा गुलाबी रंगातील या फळांच्या राजाने रस्ते आणि बाजारही सजले आहेत. यातही अनेकांच्या मनाला भावतो तो खास वैदर्भीय गावरान आंबा. मात्र या गावरान आंब्याची प्रतीक्षा करणाऱ्या लोकांची यावर्षी मात्र निराशा होत आहे. कारण गावरान आंबा यावेळी दिसेनासा झाला आहे. मे महिना उलटूनही या आंब्याची चव लोकांना मिळाली नाही. त्यामुळे गावरान आंबा दुर्मिळ होत आहे की काय, अशी चुकचुक आंबा प्रेमींना होत आहे.लॉकडाऊनच्या काळातही वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याची मोठी आवक शहरात झाली आहे. बैगनफली, केशर, हापूस, लंगडा, दशेहरी अशा प्रजातींच्या आंब्यांनी रस्ते आणि बाजार सजले आहेत. मात्र यात गावरान आंबा कुठेही नाही. जाणकारांच्या मते, यावर्षी वैदर्भीय गावरान आंब्याचे उत्पादन न होण्याची अनेक कारणे आहेत. हवामानातील बदल त्यासाठी कारणीभूत आहे. वृक्ष व पक्षी अभ्यासक नितीन मराठे यांनी सांगितले, यावर्षी भर उन्हाळ्यातही पावसाने नियमित हजेरी लावली आहे. आंब्याला ऐन मोहर आलेला असताना पावसाळी वादळवाºयाने हा मोहर झडला शिवाय लहान कैºयाही झडून पडल्या. त्यामुळे आंब्याचे उत्पादन हवे तसे झाले नाही. शहरातच नाही तर गावातही लोकांना हवा तसा आंब्याचा आस्वाद घेता आला नाही. हे यावर्षी आंबा कमी होण्याचे नैमित्तिक कारण आहे. मात्र गावरान आंब्याबाबत निर्माण झालेली उदासीनता हे दूरवर परिणाम करणारे कारण दुर्लक्षित करता येणार नाही, असे मत मराठे यांनी व्यक्त केले.

आमराईच उरली नाहीनितीन मराठे यांनी गेल्या काही वर्षांतील अभ्यासाअंती नोंदविलेले निरीक्षण चिंता करण्यासारखे आहे. पूर्वी बैलजोडीच्या मदतीने शेतीची कामे व्हायची. नांगरणी, वखरणी उन्हाळ्यात व्हायची. काम करून थकल्यानंतर सावलीत जेवण करता यावे, आराम करता यावा म्हणून एक तरी आंब्याचे झाड शेतात असायचे. पण ट्रॅक्टरने शेतीची कामे सुरू झाल्यानंतर हीच विशाल झाडे अडचणींची झाली. झाडाच्या सावलीत पिके येत नाहीत म्हणून या झाडांची कटाई झाली. गावोगावी आमराईत शेकडो झाडे असायची. मात्र कृषिमालासाठी पेट्या बनवायला आंब्याच्या लाकडाचा उपयोग केला जातो. त्यामुळे मोठी वृक्षतोड करून ती विकण्यात आली. त्यामुळे आमराई शिल्लक राहिली नाही. म्हणूनच येत्या काळात गावरान आंबे दुर्मिळ होतील, अशी भीती मराठे यांनी व्यक्त केली.

आंबा लागवडीला प्रोत्साहन मिळावेशासनाने शेतावर आंब्याचे झाड असलेल्या शेतकऱ्यांना पाच वर्षातून एकदा सबसिडी द्यावी, जेणेकरून शेतकरी आंब्याचे जतन करतील. गावरान आंब्याला फळे यायला बरीच वर्षे लागतात. त्यामुळे लवकर फळे देणाऱ्या हायब्रीड प्रजातीला प्राधान्य दिले जाते. वृक्षारोपण कार्यक्रमात कॅशिया, गुलमोहर, सप्तपर्णी अशा निरुपयोगी विदेशी वृक्षांची लागवड करण्यापेक्षा आंब्याची लागवड करावी, अशी गरज मराठे यांनी व्यक्त केली.