शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पर्यावरण उद्ध्वस्त करणारी अ‍ॅफकॉन कंपनी मोकाट का? संदीप खेडकर यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 00:55 IST

समृद्धी महामार्गासाठी बहुमूल्य पर्यावरण उद्ध्वस्त करणारी अ‍ॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी व या कंपनीने नेमलेले उपकंत्राटदार कुणाच्या आशीर्वादाने मोकाट आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई का केली जात नाही, असा दाहक सवाल कोटंबा (ता. सेलू, जि. वर्धा) येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते संदीप खेडकर यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देकडक कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समृद्धी महामार्गासाठी बहुमूल्य पर्यावरण उद्ध्वस्त करणारी अ‍ॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी व या कंपनीने नेमलेले उपकंत्राटदार कुणाच्या आशीर्वादाने मोकाट आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई का केली जात नाही, असा दाहक सवाल कोटंबा (ता. सेलू, जि. वर्धा) येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते संदीप खेडकर यांनी उपस्थित केला आहे. अ‍ॅफकॉन कंपनी व उपकंत्राटदारांवर सरकारने कडक कारवाई करावी याकरिता ते गेल्या अनेक महिन्यांपासून कणखर लढा देत आहेत. दरम्यान, त्यांना प्रलोभन दाखविण्याचे बरेच प्रयत्न झाले, पण ते मैदानात खंभीरपणे उभे राहिले.अ‍ॅफकॉन कंपनीला समृद्धी महामार्ग प्रकल्पातील खडकी आमगाव ते पिंपळगाव (जि. वर्धा) पर्यंतच्या रोडचे कंत्राट मिळाले आहे. या कंपनीने मुरूम भरून जमीन समांतर करण्याकरिता एम. पी. कन्स्ट्रक्शनला उपकंत्राट दिले आहे. या कंपन्यांनी समृद्धी महामार्ग व अन्य उद्देशाकरिता मौजा इटाळा, मौजा कोटंबा व मौजा महाबळा येथील तलाव व झुडपी जंगलांसह शेकडो एकर सरकारी, आदिवासी व खासगी जमिनीवर अवैध खोदकाम करून मुरुम, रेती व दगड बाहेर काढले. त्यांनी ही अवैध कृती करताना मोठ्या आकाराचे व पर्यावरणोपयोगी साग, कडुनिंब, बोर, सिरस, रामकाठी, प्रासोपिक इत्यादी हजारो जुनी झाडेही तोडली. तसेच, उंच टेकड्या सपाट केल्या. वन कायद्यातील तरतुदींना अक्षरश: केराची टोपली दाखवण्यात आली. असे असताना सरकारने अ‍ॅफकॉन कंपनी व उपकंत्राटदारांविरुद्ध कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही असा आरोप खेडकर यांनी केला आहे.तक्रारींची दखल नाहीयासंदर्भात राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, लोकायुक्त, वन विभाग, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आदींकडे तक्रारी केल्या, पण त्यावर कुणीच उत्तर दिले नाही. तसेच, कंपन्यांवर कारवाईदेखील केली नाही. त्यामुळे कंत्राटदारांच्या मुजोऱ्या वाढल्या असून त्यांनी तक्रारकर्त्यांना धमकावणे सुरू केले आहे. तक्रारी करण्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा शब्दांत शेतकऱ्यांना भीती दाखविली जात आहे. भविष्यात असेच चित्र कायम राहिल्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून न्याय मागू असे खेडकर यांनी सांगितले.५० हजारावर झाडे तोडलीअ‍ॅफकॉन कंपनीने मौजा इटाळा, मौजा कोटंबा व मौजा महाबळा येथील ५० हजारावर झाडे तोडली. सामाजिक वनीकरण परिक्षेत्र सेलूचे वनक्षेत्रपाल यांनी माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीनुसार, मौजा इटाळा येथील ३५ हजार तर, मौजा कोटंबा येथील १५ हजार २०० झाडे तोडण्यात आली आहेत. तसेच, मौजा महाबळा येथील २०० ते २५० फूट उंच टेकड्या झाडांसह भुईसपाट करण्यात आल्या आहेत. संबंधित ग्राम पंचायती व वर्धा खनिकर्म कार्यालयाने कंपनीला खोदकामाची परवानगी दिली नाही. ग्राम पंचायती व खनिकर्म कार्यालयाने लेखी पत्र देऊन ही बाब स्पष्ट केली. असे असताना कंपनीने सरकारी अधिकाºयांशी संगनमत करून मौजा इटाळा येथील खसरा क्र. ७ व २३०, मौजा कोटंबा येथील खसरा क्र. २०६ व २१० मध्ये आणि मौजा महाबळा येथे मनमर्जीपणे खोदकाम केले, अशी माहिती खेडकर यांनी दिली.पर्यावरणाचे अतोनात नुकसानअ‍ॅफकॉन कंपनीच्या अवैध खोदकाम व वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकार पर्यावरण रक्षणाकरिता झाडे लावण्याचा कार्यक्रम राबवत आहे. त्याअंतर्गत इटाळा, महाबळा व कोटंबा येथे हजारो झाडे लावण्यात आली होती. ती झाडे कंपनीने तोडून टाकली. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आल्याचे कंपनी सांगत आहे. परंतु, त्यात काहीच खरे नाही. त्यांना केवळ शेतकऱ्यांना कायदेशीर मोबदला देऊन जमीन खरेदी करण्यास सांगण्यात आले होते. परंतु, कंपनीने मनमानीपणे वागून पर्यावरण उद्ध्वस्त केले, असे खेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :environmentपर्यावरण