शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

पर्यावरण उद्ध्वस्त करणारी अ‍ॅफकॉन कंपनी मोकाट का? संदीप खेडकर यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 00:55 IST

समृद्धी महामार्गासाठी बहुमूल्य पर्यावरण उद्ध्वस्त करणारी अ‍ॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी व या कंपनीने नेमलेले उपकंत्राटदार कुणाच्या आशीर्वादाने मोकाट आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई का केली जात नाही, असा दाहक सवाल कोटंबा (ता. सेलू, जि. वर्धा) येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते संदीप खेडकर यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देकडक कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समृद्धी महामार्गासाठी बहुमूल्य पर्यावरण उद्ध्वस्त करणारी अ‍ॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी व या कंपनीने नेमलेले उपकंत्राटदार कुणाच्या आशीर्वादाने मोकाट आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई का केली जात नाही, असा दाहक सवाल कोटंबा (ता. सेलू, जि. वर्धा) येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते संदीप खेडकर यांनी उपस्थित केला आहे. अ‍ॅफकॉन कंपनी व उपकंत्राटदारांवर सरकारने कडक कारवाई करावी याकरिता ते गेल्या अनेक महिन्यांपासून कणखर लढा देत आहेत. दरम्यान, त्यांना प्रलोभन दाखविण्याचे बरेच प्रयत्न झाले, पण ते मैदानात खंभीरपणे उभे राहिले.अ‍ॅफकॉन कंपनीला समृद्धी महामार्ग प्रकल्पातील खडकी आमगाव ते पिंपळगाव (जि. वर्धा) पर्यंतच्या रोडचे कंत्राट मिळाले आहे. या कंपनीने मुरूम भरून जमीन समांतर करण्याकरिता एम. पी. कन्स्ट्रक्शनला उपकंत्राट दिले आहे. या कंपन्यांनी समृद्धी महामार्ग व अन्य उद्देशाकरिता मौजा इटाळा, मौजा कोटंबा व मौजा महाबळा येथील तलाव व झुडपी जंगलांसह शेकडो एकर सरकारी, आदिवासी व खासगी जमिनीवर अवैध खोदकाम करून मुरुम, रेती व दगड बाहेर काढले. त्यांनी ही अवैध कृती करताना मोठ्या आकाराचे व पर्यावरणोपयोगी साग, कडुनिंब, बोर, सिरस, रामकाठी, प्रासोपिक इत्यादी हजारो जुनी झाडेही तोडली. तसेच, उंच टेकड्या सपाट केल्या. वन कायद्यातील तरतुदींना अक्षरश: केराची टोपली दाखवण्यात आली. असे असताना सरकारने अ‍ॅफकॉन कंपनी व उपकंत्राटदारांविरुद्ध कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही असा आरोप खेडकर यांनी केला आहे.तक्रारींची दखल नाहीयासंदर्भात राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, लोकायुक्त, वन विभाग, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आदींकडे तक्रारी केल्या, पण त्यावर कुणीच उत्तर दिले नाही. तसेच, कंपन्यांवर कारवाईदेखील केली नाही. त्यामुळे कंत्राटदारांच्या मुजोऱ्या वाढल्या असून त्यांनी तक्रारकर्त्यांना धमकावणे सुरू केले आहे. तक्रारी करण्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा शब्दांत शेतकऱ्यांना भीती दाखविली जात आहे. भविष्यात असेच चित्र कायम राहिल्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून न्याय मागू असे खेडकर यांनी सांगितले.५० हजारावर झाडे तोडलीअ‍ॅफकॉन कंपनीने मौजा इटाळा, मौजा कोटंबा व मौजा महाबळा येथील ५० हजारावर झाडे तोडली. सामाजिक वनीकरण परिक्षेत्र सेलूचे वनक्षेत्रपाल यांनी माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीनुसार, मौजा इटाळा येथील ३५ हजार तर, मौजा कोटंबा येथील १५ हजार २०० झाडे तोडण्यात आली आहेत. तसेच, मौजा महाबळा येथील २०० ते २५० फूट उंच टेकड्या झाडांसह भुईसपाट करण्यात आल्या आहेत. संबंधित ग्राम पंचायती व वर्धा खनिकर्म कार्यालयाने कंपनीला खोदकामाची परवानगी दिली नाही. ग्राम पंचायती व खनिकर्म कार्यालयाने लेखी पत्र देऊन ही बाब स्पष्ट केली. असे असताना कंपनीने सरकारी अधिकाºयांशी संगनमत करून मौजा इटाळा येथील खसरा क्र. ७ व २३०, मौजा कोटंबा येथील खसरा क्र. २०६ व २१० मध्ये आणि मौजा महाबळा येथे मनमर्जीपणे खोदकाम केले, अशी माहिती खेडकर यांनी दिली.पर्यावरणाचे अतोनात नुकसानअ‍ॅफकॉन कंपनीच्या अवैध खोदकाम व वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकार पर्यावरण रक्षणाकरिता झाडे लावण्याचा कार्यक्रम राबवत आहे. त्याअंतर्गत इटाळा, महाबळा व कोटंबा येथे हजारो झाडे लावण्यात आली होती. ती झाडे कंपनीने तोडून टाकली. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आल्याचे कंपनी सांगत आहे. परंतु, त्यात काहीच खरे नाही. त्यांना केवळ शेतकऱ्यांना कायदेशीर मोबदला देऊन जमीन खरेदी करण्यास सांगण्यात आले होते. परंतु, कंपनीने मनमानीपणे वागून पर्यावरण उद्ध्वस्त केले, असे खेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :environmentपर्यावरण