शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गोड बोलण्याची औपचारिकता कशाला? तसे वागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 10:35 IST

मकरसंक्रांतीच्या शुभपर्वावर, त्याची दररोजच्या जीवनातील महती विशद करणारे हे नवे सदर. यात जीवनातील गोडवा हा कशात दडला आहे, याचा उलगडा करत आहेत, चंद्रशेखर बावनकुळे, उर्जा व उत्पादनशुल्क मंत्री, महाराष्ट्र राज्य.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:गोड बोलण्याची औपचारिकता मला आवडत नाही. हा माझ्या स्वभावातील दोष आहे. पण काम घेऊन आलेल्या निराश माणसाला मदत करून, त्याच्या संकटात धावून मी त्याला आनंदी करतो. ती उणीव मी अशी भरून काढतो. कुणी चुकून दुखावले तर त्याची लगेच जाणीव होते. मग मी त्याला बोलावूनही घेतो. माझ्या मनावरील दडपण असे दूर होते.राडी मंदिराच्या परिसरात माझे बालपण गेले. तिथे मामाचे किराण्याचे दुकान होते. दुकानात मी काम करायचो. आजीला दूध विकायलाही मदत करीत असे. संध्याकाळ झाल्यानंतर मंदिरातील दिव्याखाली बसून रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत राहायचो. मजुरी आणि शिक्षण हाच माझा त्यावेळचा दिनक्रम. इतरांसारखे बालपण मी अनुभवलेच नाही. कधी खेळलो नाही. इच्छा असूनही परिस्थितीमुळे दंगामस्ती करू शकलो नाही.गरिबीने लहानपणीच मला शहाणे केले. मामाच्या दुकानात गिºहाईक यायचे. त्यांच्याशी गोड बोलत असल्याने सर्वांचा मी आवडता होतो. लोकांशी आपण चांगले वागलो की लोकही आपल्यावर प्रेम करतात ही शिकवण मला किराणा दुकानात आणि लोकांच्या घरी दूध वाटताना मिळाली.पुढे अपघाताने राजकारणात आलो. कुटुंबात अशी कुठलीही पार्श्वभूमी नव्हती. पण पुढे यश मिळत गेले. त्याचे संपूर्ण श्रेय या लोकसंग्रहालाच आहे. ताणतणावाचे प्रसंग तसे जन्म झाल्यापासूनच. पण परिस्थितीमुळे येणारे ताणतणाव माणसाला खचवत नाहीत, उलट मजबूतच करतात. मीदेखील अशाच अनेक घटनांमधून शिकत गेलो. आॅटो चालवायचो, पुढे लग्न केले. दोन-तीन दिवस त्या आॅटोत संसारदेखील केला. लोक थट्टा करायचे, हिणवायचे. पण एक गोष्ट ठावूक होती की, यातून आपले सुखाचे दिवस येील. आमदारकी, पुढे मंत्रिपद हे राजकारणातील यश मिळाल्यानंतरही मला जुन्या दिवसांचा विसर पडू नये हीच गोष्ट मी परमेश्वराला एकच गोष्ट मागत असतो. लोक मला भेटलेले आवडतात. त्यांची कामे करताना समाधान मिळते. शक्यतोवर कुणाला नाराज करून पाठवत नाही. त्याचे काम होईपर्यंत मी अस्वस्थ असतो. त्याचे काम झाले की आनंद येतो. माझ्या मनावरील ताणतणावाचे मी असे नियोजन केले आहे. उद्याची चिंता मला खरंच भेडसावत नाही. कारण आपल्या बालपणाचा संघर्ष मी सतत आठवत असतो. हेवा, मत्सर, गटबाजी यासाठी वेळ मिळत नाही. कारण सतत कामात असतो. 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे