शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

बेलोरा विमानतळाचा विकास का रखडला? उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2022 11:14 IST

चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश

नागपूर : अमरावती जिल्ह्यातील बेलोरा विमानतळाचा विकास का रखडला, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी केली, तसेच राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य सचिव, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे महाव्यवस्थापक व भारतीय विमानतळ प्राधिकरणचे प्रादेशिक कार्यकारी संचालक यांना नोटीस बजावून यावर चार आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले.

यासंदर्भात माजी आमदार सुनील देशमुख यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व गोविंद सानप यांच्यासमक्ष सुनावणी झाली. बेलोरा विमानतळाचा बीओटी तत्त्वावर विस्तार व विकास करण्यासाठी २६ फेब्रुवारी २००९ रोजी शासन निर्णय जारी झाला होता. त्यानंतर १३ वर्षांचा कालावधी लोटूनही या विमानतळाने ‘टेक-ऑफ’ घेतला नाही.

हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पाकरिता नवीन २८७ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. परंतु, आतापर्यंत कोणतीच ठोस कामे करण्यात आली नाही. अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक मोठमोठे उद्योग आहेत. त्यामुळे विमान प्रवाशांची संख्या भरपूर आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असे याचिकाकर्ते देशमुख यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयAirportविमानतळAmravatiअमरावती