शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे का वाढत आहेत... आत्मपरीक्षण करा.. गृहमंत्री वळसे पाटलांचा पोलीस अधिकाऱ्यांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 07:20 IST

Nagpur News यापुढे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे प्रमाण हे गुन्हा सिद्धतेवरून ठरेल. त्यामुळे दोषसिध्दीचे प्रमाण वाढवण्यावर भर द्या, असे निर्देश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी येथे दिले.

ठळक मुद्देपोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे प्रमाण गुन्हा सिद्धतेवरून ठरणार

नागपूर - यापुढे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे प्रमाण हे गुन्हा सिद्धतेवरून ठरेल. त्यामुळे दोषसिध्दीचे प्रमाण वाढवण्यावर भर द्या, असे निर्देश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी येथे दिले. त्यांनी आज नागपुरात अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नागपूर आणि गडचिरोली परिक्षेत्रातील पोलीस दलाच्या कामकाजाचा आढावा घेतला. बैठकीला विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, दोन्ही परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक तसेच उपअधीक्षक उपस्थित होते. (Home Minister Walse Patil's advice to police officers)

पुढच्या दोन महिन्यांत तुमच्या विभागातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासंदर्भातील दृष्टिपथात पडेल असे कार्य पुढे आले पाहिजे, असेही बजावले. बलात्कार आणि लूटमारीचे गुन्हे वाढत आहेत. छोट्या-मोठ्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही संख्या वाढली का? याचा विचार व्हावा, असे सांगतानाच अवैध दारू आणि व्यसनाधीनतेशी संबंधित गुन्हे वेळीच ठेचून काढा. स्थानिक लोकप्रतिनिधी, माध्यमे यांच्याकडे आपला पारदर्शी कारभार मांडा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

दारूमाफिया, वाळूमाफिया, सराईत गुन्हेगारांच्या हालचालीची नोंद ठेवा. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आणि ठाणेदाराने ठरवले तर प्रत्येक ठाण्याच्या परिसरात गुन्हे घडू शकत नाही. त्यामुळे गुन्हे का घडत आहे याचे आत्मपरीक्षण करा, असा सल्लाही त्यांनी दिला. शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांत मादक पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण वाढत असून, ही बाब धोकादायक आहे. त्यामुळे नव्या पिढीला विश्वासात घेऊन काम करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जाणून घेतल्या समस्या

गृहमंत्र्यांनी प्रारंभी प्रत्येक गुन्ह्याची नोंद, दोषसिद्धता, प्रतिबंधात्मक कारवाई, मोक्का आदी गुन्ह्यांच्या संदर्भातील कारवाई, मादक पदार्थ तस्करी, अवैध धंदे, पोलिसांची घरे, वाहनांची उपलब्धता, पदांची कमतरता, पोलिसांमार्फत सुरू असलेल्या सामाजिक कार्याबाबतचा आढावा घेतला. त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.

वर्धेची दारूबंदी अन् चंद्रपूरचे अवैध धंदे

बैठकीत वर्धा जिल्ह्यातील दारूबंदी आणि चंद्रपूरमधील अवैध धंदेही चर्चेला आले. गडचिरोली परिक्षेत्रातील पोलिसांच्या सुविधेसंदर्भात सातत्याने मुंबईला पाठपुरावा करण्याबाबतचे निर्देश पोलीस अधीक्षकांना दिले. गडचिरोली जिल्ह्यातील युवक नक्षल चळवळीकडे वळता कामा नये. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास शासन तत्पर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

- विकास आणि रोजगाराची वानवा असल्यामुळे गडचिरोली-गोंदियात नक्षलवाद फोफावला. त्यावर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश आले असून, आता तेथील जनतेला जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न राज्य सरकार करीत आहे.

- नागपुरात बदली झाली की अधिकारी येथे रुजूच होत नाही. हे यापुढे खपवून घेतले जाणार नाही.

- परमबीर सिंग कुठे आहेत, असा प्रश्न उपस्थित झाला असता ‘तुम्हाला माहीत असेल तर मला कळवा’, असे मिश्कील उत्तर त्यांनी दिले.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटील