शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

कशाला भांडता, असं तो विचारायला गेला आणि....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 11:18 IST

आरोपींनी वाद सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला चाकूने वार करून गंभीर जखमी केले.

ठळक मुद्देभांडण सोडविणे महागात पडलेआरोपींनी केला चाकूहल्लायशोधरानगरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनोळखी आरोपींमध्ये सुरू असलेला वाद सोडविण्याचा प्रयत्न करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. आरोपींनी वाद सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला चाकूने वार करून गंभीर जखमी केले. शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अतुल पंढरीनाथ जांभूळकर (वय ४७) असे जखमी व्यक्तीचे नाव असून, ते धम्मदीप नगरातील रहिवासी आहेत.

जांभूळकर आणि त्यांच्याकडे भाड्याने राहणारे प्रशांत लक्ष्मण कोते हे दोघे शनिवारी रात्री ८ च्या सुमारास अंकिता किराणा स्टोअर समोरून जात होते. समोर असलेल्या दोनपैकी एका व्यक्तीचा मोबाईल खाली पडला आणि त्यावरून प्रशांत कोते यांची दुचाकी गेली. त्यामुळे मोबाईलचे नुकसान झाले. मोबाईलधारकासोबत वाद वाढू नये म्हणून कोते यांनी आरोपींना मोबाईल दुरुस्तीसाठी ५०० रुपये दिले. दरम्यान, ते दोन आरोपी आपसात भांडू लागले. ते पाहून अतुल जांभूळकर यांनी त्या दोघांना कशाला भांडता, असे म्हणून त्यांचा वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत एकमेकांशी भांडणारे हे दोन आरोपी जांभूळकर यांच्यावर चालून आले. त्यांनी जांभूळकर यांच्या डोक्यावर, खांद्यावर चाकूचे वार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

आजूबाजूची मंडळी धावल्यामुळे आरोपी तेथून पळाले. जखमी जांभूळकर यांना लगेच मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रशांत कोते यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी