शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

नागपुरातील इतवारी व मस्कासाथमधील ठोक बाजार केला बंंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 00:34 IST

मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मनपाच्या २५ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी इतवारी आणि मस्कासाथ येथील ठोक किराणा दुकाने बंद केली. त्यामुळे मंगळवार सकाळपासूनच किरकोळ दुकानदारांना होणारा जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा बंद झाला आहे.

ठळक मुद्दे ग्राहकांना किराणा मिळणार कसा? : किरकोळ दुकानदारांना पुरवठा बंद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रविवारी जनता कर्फ्यू असतानाही शहरातील किराणा दुकाने सर्वत्र सुरू होती. सोमवारीही मनपा आणि पोलिसांनी बंद केली नाहीत. पण मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मनपाच्या २५ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी इतवारी आणि मस्कासाथ येथील ठोक किराणा दुकाने बंद केली. त्यामुळे मंगळवार सकाळपासूनच किरकोळ दुकानदारांना होणारा जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा बंद झाला आहे. माल नसल्याने आज, उद्या किराणा दुकाने बंद होण्याची भीती आहे. त्यामुळे ग्राहकांना जीवनाश्यक वस्तूंपासून वंचित राहावे लागेल.कोरोना या जीवघेण्या आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरात कलम १४४ लागू झाले आहे. पण त्याचे गांभीर्य लोकांना अजूनही कळले नाही. लोकांची दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यामुळेच मनपाचे कर्मचारी आणि पोलिसांनी किराणा दुकानेही बंद करण्यास सांगितली. तसे पाहता शासनाने घेतलेल्या कठोर निर्णयानंतर लोकांनी पाच ते सहा दिवसांपूर्वीपासूनच किराणा मालाची खरेदी सुरू केली आहे. अनेकांकडे दोन ते तीन महिने पुरेल एवढा साठा आहे. दुकानदारांनीही ग्राहकांनी मागितला तेवढ्या मालाची विक्री केली आहे. किराणा दुकाने बंद राहिल्यास दररोज खरेदी करणाऱ्यांची अडचण होणार आहे. त्यामुळे लोकांनी आवश्यक तेवढ्याच वस्तूंची खरेदी करण्याचे आवाहन किराणा असोसिएशनने केले आहे.शासनाने किराणा वस्तूंचा पुरवठा सुरू ठेवावाहोलसेलमधून रिटेलमध्ये माल येणारच नाही, तर आम्ही विकणार काय? दोन तास दुकान सुरू ठेवणे परवडणार नाही. कलम १४४ मुळे कर्मचारीच येत नाहीत. जीवनाश्यक वस्तूंचा साठा केल्याचा समज लोकांमध्ये होऊ नये. त्याकरिता शासनाने पुढाकार घेऊन किराणा वस्तूंचा पुरवठा सुरू ठेवावा. लोकांनी शहराची स्थिती समजवून घ्यावी. गर्दी करू नये. आवश्यक तेवढ्याच वस्तूंची खरेदी करावी.प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर चिल्लर किराणा असोसिएशन.माल असेपर्यंत विक्री करणारचहोलसेलमधून पुरवठा बंद झाल्यानंतरही माल असेपर्यंत विक्री करणार आहोत. याकरिता शासनाने मदत करावी. मालाच्या पुरवठ्याला तात्काळ परवानगी द्यावी.ज्ञानेश्वर रक्षक, महासचिव, नागपूर चिल्लर किराणा असोसिएशन....तर खाद्यतेलाची विक्री बंद होणारमालवाहतूक बंद असल्याने खाद्यतेलाचा कारखाना बंद केला आहे. शिवाय विक्रीची दुकाने बंद झाल्याने माल जाणार कसा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. किराणा दुकानात खाद्यतेल उपलब्ध असेपर्यंत विक्री होईल. जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने प्रशासनाने सुरू ठेवावीत.राजूभाई ठक्कर, अध्यक्ष, खाद्यतेल व्यापारी असोसिएशन.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार