शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

नागपुरातील इतवारी व मस्कासाथमधील ठोक बाजार केला बंंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 00:34 IST

मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मनपाच्या २५ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी इतवारी आणि मस्कासाथ येथील ठोक किराणा दुकाने बंद केली. त्यामुळे मंगळवार सकाळपासूनच किरकोळ दुकानदारांना होणारा जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा बंद झाला आहे.

ठळक मुद्दे ग्राहकांना किराणा मिळणार कसा? : किरकोळ दुकानदारांना पुरवठा बंद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रविवारी जनता कर्फ्यू असतानाही शहरातील किराणा दुकाने सर्वत्र सुरू होती. सोमवारीही मनपा आणि पोलिसांनी बंद केली नाहीत. पण मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मनपाच्या २५ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी इतवारी आणि मस्कासाथ येथील ठोक किराणा दुकाने बंद केली. त्यामुळे मंगळवार सकाळपासूनच किरकोळ दुकानदारांना होणारा जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा बंद झाला आहे. माल नसल्याने आज, उद्या किराणा दुकाने बंद होण्याची भीती आहे. त्यामुळे ग्राहकांना जीवनाश्यक वस्तूंपासून वंचित राहावे लागेल.कोरोना या जीवघेण्या आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरात कलम १४४ लागू झाले आहे. पण त्याचे गांभीर्य लोकांना अजूनही कळले नाही. लोकांची दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यामुळेच मनपाचे कर्मचारी आणि पोलिसांनी किराणा दुकानेही बंद करण्यास सांगितली. तसे पाहता शासनाने घेतलेल्या कठोर निर्णयानंतर लोकांनी पाच ते सहा दिवसांपूर्वीपासूनच किराणा मालाची खरेदी सुरू केली आहे. अनेकांकडे दोन ते तीन महिने पुरेल एवढा साठा आहे. दुकानदारांनीही ग्राहकांनी मागितला तेवढ्या मालाची विक्री केली आहे. किराणा दुकाने बंद राहिल्यास दररोज खरेदी करणाऱ्यांची अडचण होणार आहे. त्यामुळे लोकांनी आवश्यक तेवढ्याच वस्तूंची खरेदी करण्याचे आवाहन किराणा असोसिएशनने केले आहे.शासनाने किराणा वस्तूंचा पुरवठा सुरू ठेवावाहोलसेलमधून रिटेलमध्ये माल येणारच नाही, तर आम्ही विकणार काय? दोन तास दुकान सुरू ठेवणे परवडणार नाही. कलम १४४ मुळे कर्मचारीच येत नाहीत. जीवनाश्यक वस्तूंचा साठा केल्याचा समज लोकांमध्ये होऊ नये. त्याकरिता शासनाने पुढाकार घेऊन किराणा वस्तूंचा पुरवठा सुरू ठेवावा. लोकांनी शहराची स्थिती समजवून घ्यावी. गर्दी करू नये. आवश्यक तेवढ्याच वस्तूंची खरेदी करावी.प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर चिल्लर किराणा असोसिएशन.माल असेपर्यंत विक्री करणारचहोलसेलमधून पुरवठा बंद झाल्यानंतरही माल असेपर्यंत विक्री करणार आहोत. याकरिता शासनाने मदत करावी. मालाच्या पुरवठ्याला तात्काळ परवानगी द्यावी.ज्ञानेश्वर रक्षक, महासचिव, नागपूर चिल्लर किराणा असोसिएशन....तर खाद्यतेलाची विक्री बंद होणारमालवाहतूक बंद असल्याने खाद्यतेलाचा कारखाना बंद केला आहे. शिवाय विक्रीची दुकाने बंद झाल्याने माल जाणार कसा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. किराणा दुकानात खाद्यतेल उपलब्ध असेपर्यंत विक्री होईल. जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने प्रशासनाने सुरू ठेवावीत.राजूभाई ठक्कर, अध्यक्ष, खाद्यतेल व्यापारी असोसिएशन.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार