शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

नागपुरातील इतवारी व मस्कासाथमधील ठोक बाजार केला बंंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 00:34 IST

मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मनपाच्या २५ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी इतवारी आणि मस्कासाथ येथील ठोक किराणा दुकाने बंद केली. त्यामुळे मंगळवार सकाळपासूनच किरकोळ दुकानदारांना होणारा जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा बंद झाला आहे.

ठळक मुद्दे ग्राहकांना किराणा मिळणार कसा? : किरकोळ दुकानदारांना पुरवठा बंद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रविवारी जनता कर्फ्यू असतानाही शहरातील किराणा दुकाने सर्वत्र सुरू होती. सोमवारीही मनपा आणि पोलिसांनी बंद केली नाहीत. पण मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मनपाच्या २५ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी इतवारी आणि मस्कासाथ येथील ठोक किराणा दुकाने बंद केली. त्यामुळे मंगळवार सकाळपासूनच किरकोळ दुकानदारांना होणारा जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा बंद झाला आहे. माल नसल्याने आज, उद्या किराणा दुकाने बंद होण्याची भीती आहे. त्यामुळे ग्राहकांना जीवनाश्यक वस्तूंपासून वंचित राहावे लागेल.कोरोना या जीवघेण्या आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरात कलम १४४ लागू झाले आहे. पण त्याचे गांभीर्य लोकांना अजूनही कळले नाही. लोकांची दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यामुळेच मनपाचे कर्मचारी आणि पोलिसांनी किराणा दुकानेही बंद करण्यास सांगितली. तसे पाहता शासनाने घेतलेल्या कठोर निर्णयानंतर लोकांनी पाच ते सहा दिवसांपूर्वीपासूनच किराणा मालाची खरेदी सुरू केली आहे. अनेकांकडे दोन ते तीन महिने पुरेल एवढा साठा आहे. दुकानदारांनीही ग्राहकांनी मागितला तेवढ्या मालाची विक्री केली आहे. किराणा दुकाने बंद राहिल्यास दररोज खरेदी करणाऱ्यांची अडचण होणार आहे. त्यामुळे लोकांनी आवश्यक तेवढ्याच वस्तूंची खरेदी करण्याचे आवाहन किराणा असोसिएशनने केले आहे.शासनाने किराणा वस्तूंचा पुरवठा सुरू ठेवावाहोलसेलमधून रिटेलमध्ये माल येणारच नाही, तर आम्ही विकणार काय? दोन तास दुकान सुरू ठेवणे परवडणार नाही. कलम १४४ मुळे कर्मचारीच येत नाहीत. जीवनाश्यक वस्तूंचा साठा केल्याचा समज लोकांमध्ये होऊ नये. त्याकरिता शासनाने पुढाकार घेऊन किराणा वस्तूंचा पुरवठा सुरू ठेवावा. लोकांनी शहराची स्थिती समजवून घ्यावी. गर्दी करू नये. आवश्यक तेवढ्याच वस्तूंची खरेदी करावी.प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर चिल्लर किराणा असोसिएशन.माल असेपर्यंत विक्री करणारचहोलसेलमधून पुरवठा बंद झाल्यानंतरही माल असेपर्यंत विक्री करणार आहोत. याकरिता शासनाने मदत करावी. मालाच्या पुरवठ्याला तात्काळ परवानगी द्यावी.ज्ञानेश्वर रक्षक, महासचिव, नागपूर चिल्लर किराणा असोसिएशन....तर खाद्यतेलाची विक्री बंद होणारमालवाहतूक बंद असल्याने खाद्यतेलाचा कारखाना बंद केला आहे. शिवाय विक्रीची दुकाने बंद झाल्याने माल जाणार कसा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. किराणा दुकानात खाद्यतेल उपलब्ध असेपर्यंत विक्री होईल. जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने प्रशासनाने सुरू ठेवावीत.राजूभाई ठक्कर, अध्यक्ष, खाद्यतेल व्यापारी असोसिएशन.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार