शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

कोरोना झाल्यास जबाबदारी कोण घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 20:07 IST

Corona Virus, school, Nagpur news कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे आरोग्य क्षेत्रातून बोलले जात आहे. अशात दिवाळीनंतर शासन ९ ते १२ वीच्या शाळा सुरू करण्यास शासनाचा विचार आहे. पण शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थी अथवा शिक्षकांना कोरोना झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केला आहे.

ठळक मुद्देराज्य शिक्षण संस्था महामंडळाचा मुख्यमंत्र्यांना सवाल : डिसेंबरपर्यंत वाट बघण्याचा सल्ला

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे आरोग्य क्षेत्रातून बोलले जात आहे. अशात दिवाळीनंतर शासन ९ ते १२ वीच्या शाळा सुरू करण्यास शासनाचा विचार आहे. पण शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थी अथवा शिक्षकांना कोरोना झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केला आहे.

काही राज्यात शाळा सुरू केल्या. त्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यानंतर शाळा बंद करण्यात आल्या. हा प्रकार राज्यात होणे नाकारता येत नाही. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर १५ दिवस काळजी घेऊन डिसेंबरपर्यंत वाट बघावी, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे. संंघटनेच्या मते शाळा सुरू करण्यासंर्द्भात व्यवस्थापनाच्या विविध अडचणी आहेत. कोरोनासंबंधीचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी लागणाऱ्या खर्चासंबंधाने कोणतीही आर्थिक तरतूद नाही. शाळेची पूर्वतयारी करण्यासाठी शाळांचे वेतनेतर अनुदान अजूनपर्यंत निर्गमित केले नाही. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे शाळांना आवश्यक पूर्वतयारी करण्यासाठी देय असलेले वेतनेतर अनुदान त्वरित द्यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. शाळांमध्ये सगळी व्यवस्था करण्यासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची परवानगी देण्यात यावी.

सरकारने द्यावा खुलासा

१) शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांची तपासणी करून त्यावर उपाययोजना करण्यासंबंधी सांगितले आहे. परंतु उपाययोजना कोण करणार, शासन की शिक्षक यासंबंधी स्पष्ट खुलासा करावा.

२) शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी अथवा शिक्षकांना कोरोनाची लक्षणे आढळली तर त्याची जबाबदारी कोण घेणार यावर खुलासा करावा.

पालकांची लेखी संमती आवश्यक

शाळेचे मुख्याध्यापक व शाळा प्रशासन जबाबदारी घेण्यास तयार नाही. पालकांनी लेखी संमती दिल्याशिवाय व पालकांनी स्वत: जबाबदारी घेतल्याशिवाय शाळा प्रशासन शाळा सुरू करण्यास तयार नाही.

रवींद्र फडणवीस, कार्यवाह, महा. राज्य शिक्षण संस्था महामंडळ