शहरं
Join us  
Trending Stories
1
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
2
Shiv Sena MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
3
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
4
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
5
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
6
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
7
Uddhav- Raj Thackeray PC: थोड्याच वेळात उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार; पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष
8
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
9
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
10
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
11
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
12
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
13
शेतकरी ते नोकरदार... बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत 'हे' ८ नियम १ जानेवारीपासून बदलणार
14
शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर
15
नमो भारत ट्रेनमधील 'तो' अश्लील चाळा पडणार महागात! तरुण-तरुणीवर FIR; किती शिक्षा होणार?
16
अगदी बाबाची कॉपी! वडिलांसारखीच हँडसम आहेत हृतिकची मुलं, हृदान-हृहानचे डान्स मूव्ह्ज पाहून चाहते प्रेमात
17
सुधीर मुनंगटीवार यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले, नाराजी दूर होणार?
18
अमेरिकेत 'एपस्टीन फाइल्स'चा महास्फोट! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'तसले' गंभीर आरोप; रिपोर्टने खळबळ
19
इंडिगोची 'दादागिरी' आता चालणार नाही; सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना दाखवला हिरवा कंदील
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ सुरुच, आज किती आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट रेट?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा ‘गेट-वे’ शोधणार कोण?

By admin | Updated: June 23, 2014 01:17 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राजकारणाचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. विद्यापीठाने महाविद्यालयांवर ५० टक्के शिक्षकभरतीची अट लादल्यामुळे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राजकारणाचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. विद्यापीठाने महाविद्यालयांवर ५० टक्के शिक्षकभरतीची अट लादल्यामुळे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी विनाअनुदानित तुकड्यांमध्ये प्रवेश थांबविण्यात आले आहेत. यामुळे प्रथम वर्षात प्रवेशासाठी वणवण भटकणाऱ्या विद्यार्थ्यांना सोमवारी होणाऱ्या विद्वत परिषदेच्या तातडीच्या बैठकीत दिलासा मिळणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार किमान शिक्षकसंख्या निश्चित करण्यासाठी विद्वत परिषदेद्वारे दोन समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. या समितीतील काही सदस्यांनी महाविद्यालयांना तात्पुरती किमान एक नियमित शिक्षकाची अट लावण्यात यावी व टप्प्याटप्याने सर्व जागांवर नियुक्त्या करण्यात याव्यात, असे मत नोंदविले होते. परंतु प्रत्यक्ष अहवालात मात्र ५० टक्क्यांची अट ठेवण्यात आली. विद्वत परिषदेने प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांना प्राधिकृत केल्यामुळे दोन्ही समित्यांच्या अहवालास त्यांनी मान्यता दिली व यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आल्या. प्राचार्य फोरम व महाविद्यालयांनी या अटींवर नाराजी व्यक्त केली. आर्थिक नुकसान नको म्हणून विनाअनुदानित जागांवरील प्रवेश देणे महाविद्यालयांनी थांबविले आहे. त्यामुळे बारावीत ८० टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणे अवघड झाले आहे. या मुद्यावर विद्वत परिषदेत चर्चा होण्याची शक्यता आहे.अनधिकृत प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी राजकारण शिगेलाविद्यापीठाने प्रवेशबंदी लावलेली असताना विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याऱ्या महाविद्यालयांसाठी सोमवारच्या विद्वत परिषदेच्या सभेत आणखी काय राजकारण करण्यात येते याकडे विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे. प्रवेशबंदी असताना ६३ महाविद्यालयांनी ६,६१६ विद्यार्थ्यांना नियमबाह्य पद्धतीने प्रवेश दिले. या विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यात यावी, असे निर्देश राज्य शासनातर्फे देण्यात आले आहे. यासंबंधात विद्वत परिषदेत चर्चा होणार आहे. परंतु मुळात हा विषय परीक्षा मंडळाच्या अखत्यारित असताना विद्वत परिषद त्यावर निर्णय कसा घेऊ शकते, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव आर.जी. जाधव यांनी १९ जून २०१४ रोजी विद्यापीठाला पत्र पाठवून प्रवेशबंदी महाविद्यालयातील अनधिकृत प्रवेशित विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचे आदेश दिले. जाधव यांनी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ चे कलम ८/४ अन्वये हे आदेश जारी केलेत. वास्तविक पाहता कलम ८/४ अन्वये आदेश काढताना चौकशी करून आदेश काढणे अभिप्रेत आहे. परंतु, कसलीही चौकशी न करता हे आदेश काढण्यात आल्याचा दावा विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर केला आहे. नियमबाह्य पद्धतीने प्रवेशित विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा यासाठी संस्थाचालकांची बाजू घेणारा गट प्रयत्नरत आहे व त्याचेच प्रतिबिंब विद्वत परिषदेच्या बैठकीत पहायला मिळण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)