शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
5
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
6
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
7
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
8
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
9
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
10
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
11
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
12
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
13
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
14
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
15
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
16
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
18
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
19
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
20
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद

हिंगण्यात मेघेंना कोेण देणार टक्कर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 13:00 IST

लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीचे कृपाल तुमाने यांना जिल्ह्यात सर्वाधिक २५,९१९ मतांची लीड देणाऱ्या हिंगणा मतदार संघात भाजपाने यावेळी हॅट्ट्रिक करण्याचा संकल्प केला. गत दोन निवडणुकात झालेला पराभव विचारात घेता २०१९ ची निवडणूक राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई, नवा चेहरा देणार का?कॉँग्रेसनेही केला दावा

जितेंद्र ढवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणा : लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीचे कृपाल तुमाने यांना जिल्ह्यात सर्वाधिक २५,९१९ मतांची लीड देणाऱ्या हिंगणा मतदार संघात भाजपाने यावेळी हॅट्ट्रिक करण्याचा संकल्प केला. गत दोन निवडणुकात झालेला पराभव विचारात घेता २०१९ ची निवडणूक राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे.हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांनी पाच वर्षात मतदारसंघाचा मेकओव्हर केला. मेघे निवडून आले तेव्हा ते मतदार संघाचा विकास करतील का, अशा शंकाकुशंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र पाचही वर्ष त्यांनी मतदारांशी संपर्क ठेवला. मतदार संघात विकास कामांचा धडाका सुरु ठेवला. या काळात ते कोणत्याही वादात अडकले नाही. विनयशील स्वभावाने त्यांनी सर्वांना आपलेसे केले.गत पाच वर्षात तालुक्यात झालेल्या नगर परिषद आणि ग्राम पंचायत निवडणुकीत भाजपला येथे यश आले. हिंगण्याबाबत कॉँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका ठोस नसल्याने मेघेंना टक्कर देणाºया उमेदवाराची निवड करताना आघाडीच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. आघाडीत येथे जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला संधी मिळेल.या मतदार संघाचे राजकीय व सामाजिक चित्र लक्षात घेता, भाजपासाठी हा मतदार संघ ‘सेफ’ मानण्यात येतो. गत दोन निवडणुकीत येथे राष्ट्रवादीचा सातत्याने पराभव होत असल्याने, यावेळी या जागेवर काँग्रेसनेही दावा केला आहे. इकडी दुसरी टर्म मिळविण्यासाठी मेघे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.कॉँग्रेसकडून येथे गतवेळच्या उमेदवार कुंदा राऊत आणि प्रदेश सचिव मुजीब पठाण इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून येथे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांचा दावा कायम आहे. मात्र नव्या चेहºयाला संधी देण्याचा विचार झाला तर राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय सेलचे नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संतोष करवाळे येथे इच्छुक आहेत. या दृष्टीने त्यांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. २०१९ च्या निवडणुकीत हिंगण्यात माजी आमदार विजय घोडमारे यांची काय भूमिका असेल याकडेही राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.२०१४ च्या निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्याने राष्ट्रवादीला गेलेला मतदार संघ परत मिळविता आला नाही. काँग्रेसच्या कुंदा राऊत यांनी २० हजार ५७३ मते मिळवित राष्ट्रवादीचे रमेशचंद्र बंग यांना धक्का दिला. राऊत यांच्यामुळे बंग यांच्या मतांचा ग्राफ कमी झाला. बसपानेही येथे चांगली कामगिरी केली.बसपाचे भदंत महापंत महाथेरो यांनी १९ हजार ४५० मते मिळविली होती.त्यामुळे यावेळी येथे बसपाची काय भूमिका असेल याकडे लक्ष लागले आहे. मात्र कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि बसपाला टक्कर देत भाजपचे समीर मेघे यांनी ८४ हजार १३९ मते घेत हिंगण्याचा राजकारणाला नवी दिशा दिली. मेघे २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत येथे भाजपची लीड वाढविली. २००९ मध्ये येथे भाजप-राष्ट्रवादीत थेट लढत झाली होती.राष्ट्रवादीचे रमेशचंद्र बंग यांचा ७०० मतांनी पराभव करीत भाजपचे विजय घोडमारे विजयी झाले होते. घोडमारे यांना ६५ हजार ३९ तर बंग यांना ६४ हजार ३३९ मते मिळाली होती. बसपाचे राजाराम पांडे यांनी ९,२६२ मते मिळविल्याने बंग यांच्या मतांचा ग्राफ कमी झाला. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही कॉँग्रेस आणि बसपाच्या भूमिकेवरच राष्ट्रवादीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे. मात्र बसपा आणि वंचित बहुजन आघाडीचा येथे उमेदवार कोण असेल हेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक