शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मंत्रिपदाच्या रिमझिममध्ये कोण भिजणार? जयस्वाल, दटके, खोपडे, मेघे यांची नावे चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2023 08:00 IST

Nagpur News मान्सूनच्या आगमनासोबतच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची आनंदवार्ता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे नागपूर शहर व जिल्ह्यातील इच्छुकांच्या आशा बळावल्या आहेत.

कमलेश वानखेडे

नागपूर : मान्सूनच्या आगमनासोबतच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची आनंदवार्ता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे नागपूर शहर व जिल्ह्यातील इच्छुकांच्या आशा बळावल्या आहेत. शिंदे गटाकडून आ. आशिष जयस्वाल यांचे तर भाजपकडून आ. कृष्णा खोपडे, प्रवीण दटके व समीर मेघे यांची नावे चर्चेत आहेत. आता मंत्रिपदाच्या रिमझिम पावसात भिजण्याची संधी कुणाला मिळेल, हे लवकरच स्पष्ट होईल.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार १० जुलैपूर्वी होण्याची शक्यता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे बोलून दाखविली. त्यामुळे मंत्रिपदाच्या चर्चेला पुन्हा एकदा पालवी फुटली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आहेत. त्यामुळे नागपूर शहर जिल्ह्याला मिळून आणखी एखादे मंत्रिपद मिळू शकते. त्यापेक्षा जास्त संधी नाही. अशात नंबर लागण्यासाठी पक्षांतर्गच मोठी स्पर्धा आहे.

जिल्ह्यात कुणबी समाजाला प्रतिनिधित्व द्यायचे झाल्यास दक्षिणचे आमदार मोहन मते व हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांच्यापैकी एकाला संधी दिली जाऊ शकते. मेघे कुटुंबाचा शहर व ग्रामीण असा दोन्हीकडे प्रभाव आहे. त्यामुळे मेघे यांचे पारडे जड मानले जात आहे.

तेली समाजाचा विचार करायचा झाल्यास पूर्व नागपूरचे आ. कृष्णा खोपडे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. पण याच समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आ. चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ही बाब खोपडे यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते.

जातीपातीचा विचार न करता संघटनात्मक कामाचा आधार घेत विचार केला तर आ. प्रवीण दटके यांनाही संधी मिळू शकते. माजी महापौर राहिलेले दटके हे भाजपचे शहर अध्यक्ष आहेत. शिवाय सर्वच घटकात त्यांचा वावर असून शहरात तगडा कनेक्ट आहे. महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. या सर्वबाबी दटकेंचे पारडे जड करणाऱ्या आहेत.

रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल शिंदे गटात सामील झाले असले तरी त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही तेवढीच जवळीक आहे. शिंदे गटाकडून जयस्वाल यांचे नाव पक्के मानले जात आहे. मात्र, भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीच त्यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपच्या ग्रामीण विकास आघाडीचे अध्यक्ष राजेश ठाकरे यांनी जयस्वाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तर नुकतेच भाजपचे माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी भाजपच्या बैठकांना जयस्वाल यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेत खडेबोल सुनावले होते. मात्र, त्यावेळीही भाजपचे शीर्षस्थ नेते पडद्यामागून जयस्वाल यांच्या बाजूने राहिले. शिवाय ठाकरे गटाचा त्यांच्यावर असलेला रोषदेखील जयस्वाल यांच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो.

तुमाने समर्थकांना दिल्लीकडून आशा

- केंद्रीय मंत्रिमंडळाचाही विस्तार होण्याचे संकेत आहेत. शिंदे गटातील दोघांना संधी मिळण्याची व यातील एक विदर्भातील असेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. लोकसभेची निवडणूक तोंडावर असल्यामुळे सर्व गोळाबेरीज डोळ्यासमोर ठेवून विस्तार केला जाईल, हे स्पष्ट आहे. रामटेकचे खा. कृपाल तुमाने यांचे समर्थक दिल्लीकडे आशेने पाहत आहेत.

टॅग्स :Sameer Megheसमीर मेघेKrushna Khopdeकृष्णा खोपडेAshish Jaiswalआशीष जयस्वाल