शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

कुणी राेखली कनिष्ठ लेखापाल संवर्गातील रिक्त पदांची भरती?

By निशांत वानखेडे | Updated: August 8, 2024 18:21 IST

परिपत्रक निघाले, कंपनीही ठरली, पण परीक्षाच नाही : ४२४ पदांच्या भरतीची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा

नागपूर : बेराेजगारीच्या भीषण प्रश्नामुळे नाेकऱ्यांसाठी जीवाचा आटापीटा सहन करणाऱ्या तरुणांना सरकारी भरतीबाबत शासन, प्रशासन स्तरावर सुरू असलेल्या टाळाटाळपणामुळे मनस्ताप सहन करावा लागताे आहे. याचे आणखी एक गंभीर प्रकरण कनिष्ठ लेखापाल संवर्गातील भरतीच्या रुपाने समाेर येत आहे. या संवर्गातील ४२४ पदाच्या भरतीचे परिपत्रक काढून वर्ष लाेटले, पण पुढची काेणतीच प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे या पदासाठी दिवसरात्र करणाऱ्या राज्यातील हजाराे तरुणांची निराशा झाली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवी वर्षामध्ये शासकीय कार्यालयातील रिक्त पदांची भरती करण्याच्या उद्देशाने लेखा व काेषागार संचालनालयातील कनिष्ठ लेखापाल संवर्गातील पदांच्या भरतीसाठी राज्याच्या वित्त विभागातर्फे ३१ जुलै २०२३ राेजी परिपत्रक काढण्यात आले हाेते. ४२४ पदांसाठी एमपीएससीद्वारे भरती करण्याचे निश्चित झाले. ऑनलाईन परीक्षेसाठी टीसीएस-आयओएन कंपनीची नियुक्त करण्यात आली. एवढेच नाही तर प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करून डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन परीक्षा घेणे, जानेवारी २०२४ पर्यंत प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांबाबत हरकती मागविणे, फेब्रुवारी २०२४ पर्यंत निकाल घाेषित करणे व कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्तीची कारवाई करण्यापर्यंतचा कार्यक्रम ठरविण्यात आला. तारीखनिहाय कार्यक्रम निर्धारित करूनही पुढे काहीच झाले नाही. परीक्षा झाली नाही आणि काहीच झाले नाही. भरती हाेईल म्हणून जीवाचे रान करून अभ्यास करणाऱ्या तरुणांची यामुळे घाेर निराशा झाली आहे.

कंपनीशी करार न झाल्याने रखडली भरतीदरम्यान परीक्षेबाबत तरुणांकडून वारंवार पाठपुरावा केल्यानंतर वित्त विभागातर्फे २७ मे २०२४ राेजी आणखी एक परिपत्रक काढून रखडलेल्या कनिष्ठ लेखापाल पदाच्या भरतीसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले हाेते. त्यावर लेखा व काेषागार संचालनालयाने तांत्रिक कारणाने भरती रखडल्याचे कारण देत टीसीएस कंपनीकडे पाठपुरावा सुरू असल्याचे नमूद केले. मात्र कंपनीसाेबत सामंजस्य कराराच्या अनुषंगाने कारवाई न झाल्याने भरतीची जाहीरात कधी प्रसिद्ध केली जाईल, याबाबत माहिती उपलब्ध करून देता येणार नसल्याचे नमूद केले.

विभाग म्हणते माहिती नाहीयाबाबत ‘लाेकमत’ने नागपूर येथील काेषागार विभागाच्या कार्यालयात संपर्क केला असता शासकीय प्रक्रिया कधी पूर्ण हाेईल सांगता येत नाही, आम्हाला या भरती प्रक्रियेबाबत काहीही माहिती व कल्पनाही नाही, असे उत्तर मिळाले.

विभागनिहाय जागानागपूर विभाग - ५८काेकण विभाग - १७८पुणे विभाग - ६६नाशिक विभाग - ३९छत्रपती संभाजीनगर - ३६अमरावती विभाग - ४७

टॅग्स :Unemploymentबेरोजगारीnagpurनागपूर