शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कुणी राेखली कनिष्ठ लेखापाल संवर्गातील रिक्त पदांची भरती?

By निशांत वानखेडे | Updated: August 8, 2024 18:21 IST

परिपत्रक निघाले, कंपनीही ठरली, पण परीक्षाच नाही : ४२४ पदांच्या भरतीची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा

नागपूर : बेराेजगारीच्या भीषण प्रश्नामुळे नाेकऱ्यांसाठी जीवाचा आटापीटा सहन करणाऱ्या तरुणांना सरकारी भरतीबाबत शासन, प्रशासन स्तरावर सुरू असलेल्या टाळाटाळपणामुळे मनस्ताप सहन करावा लागताे आहे. याचे आणखी एक गंभीर प्रकरण कनिष्ठ लेखापाल संवर्गातील भरतीच्या रुपाने समाेर येत आहे. या संवर्गातील ४२४ पदाच्या भरतीचे परिपत्रक काढून वर्ष लाेटले, पण पुढची काेणतीच प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे या पदासाठी दिवसरात्र करणाऱ्या राज्यातील हजाराे तरुणांची निराशा झाली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवी वर्षामध्ये शासकीय कार्यालयातील रिक्त पदांची भरती करण्याच्या उद्देशाने लेखा व काेषागार संचालनालयातील कनिष्ठ लेखापाल संवर्गातील पदांच्या भरतीसाठी राज्याच्या वित्त विभागातर्फे ३१ जुलै २०२३ राेजी परिपत्रक काढण्यात आले हाेते. ४२४ पदांसाठी एमपीएससीद्वारे भरती करण्याचे निश्चित झाले. ऑनलाईन परीक्षेसाठी टीसीएस-आयओएन कंपनीची नियुक्त करण्यात आली. एवढेच नाही तर प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करून डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन परीक्षा घेणे, जानेवारी २०२४ पर्यंत प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांबाबत हरकती मागविणे, फेब्रुवारी २०२४ पर्यंत निकाल घाेषित करणे व कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्तीची कारवाई करण्यापर्यंतचा कार्यक्रम ठरविण्यात आला. तारीखनिहाय कार्यक्रम निर्धारित करूनही पुढे काहीच झाले नाही. परीक्षा झाली नाही आणि काहीच झाले नाही. भरती हाेईल म्हणून जीवाचे रान करून अभ्यास करणाऱ्या तरुणांची यामुळे घाेर निराशा झाली आहे.

कंपनीशी करार न झाल्याने रखडली भरतीदरम्यान परीक्षेबाबत तरुणांकडून वारंवार पाठपुरावा केल्यानंतर वित्त विभागातर्फे २७ मे २०२४ राेजी आणखी एक परिपत्रक काढून रखडलेल्या कनिष्ठ लेखापाल पदाच्या भरतीसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले हाेते. त्यावर लेखा व काेषागार संचालनालयाने तांत्रिक कारणाने भरती रखडल्याचे कारण देत टीसीएस कंपनीकडे पाठपुरावा सुरू असल्याचे नमूद केले. मात्र कंपनीसाेबत सामंजस्य कराराच्या अनुषंगाने कारवाई न झाल्याने भरतीची जाहीरात कधी प्रसिद्ध केली जाईल, याबाबत माहिती उपलब्ध करून देता येणार नसल्याचे नमूद केले.

विभाग म्हणते माहिती नाहीयाबाबत ‘लाेकमत’ने नागपूर येथील काेषागार विभागाच्या कार्यालयात संपर्क केला असता शासकीय प्रक्रिया कधी पूर्ण हाेईल सांगता येत नाही, आम्हाला या भरती प्रक्रियेबाबत काहीही माहिती व कल्पनाही नाही, असे उत्तर मिळाले.

विभागनिहाय जागानागपूर विभाग - ५८काेकण विभाग - १७८पुणे विभाग - ६६नाशिक विभाग - ३९छत्रपती संभाजीनगर - ३६अमरावती विभाग - ४७

टॅग्स :Unemploymentबेरोजगारीnagpurनागपूर