शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

काँग्रेसमध्ये मंथनासाठी कुणी पुढाकार घेईना!

By admin | Updated: May 20, 2014 00:52 IST

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीसह राज्यातही सोमवारी विचारमंथन झाले. नागपुरात मात्र अशा मंथनासाठी कुणी पुढाकार

 अध्यक्षांचा राजीनामा : मंत्री, पदाधिकार्‍यांची दडी

नागपूर : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीसह राज्यातही सोमवारी विचारमंथन झाले. नागपुरात मात्र अशा मंथनासाठी कुणी पुढाकार घ्यायलाही तयार नाही. शहर अध्यक्ष विकास ठाकरे व जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. मात्र, अध्यक्ष सोडले तर नागपुरात मंत्री, माजी मंत्री, प्रदेश पदाधिकार्‍यांची मोठी फौज असताना, कुणीही बैठक घेण्यासाठी समोर आलेले नाहीत. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असतानाच काँग्रेसमधील उत्साह मावळला होता. लोकसभा निवडणुकीत ज्या नेत्यांवर कुठलीही जबाबदारी नव्हती, असे नेते पराभवासाठी आपण काहीच जबाबदार नाही, अशा आविर्भावात वावरत होते. खासगीत बोलताना प्रभारींच्या कार्यशैलीवर खापर फोडत होते. निकालाच्या तीन दिवसानंतरही तीच स्थिती आहे. काँग्रेसचे पदाधिकारी एकमेकांना सल्ला देण्यात व्यस्त आहेत. प्रत्येक जणाच्या चर्चेत ‘असे करायला हवे होते, तसे व्हायला हवे होते’, असेच सल्ले ऐकायला मिळत आहेत. मात्र, आपण स्वत: पक्षासाठी, पक्ष कार्यकर्त्यांसाठी काय केले, यावर आत्मपरीक्षण करायला कुणीच तयार नाही. कार्यकर्ते शहर पदाधिकारी विकास ठाकरे यांना बैठक घेण्यासाठी आग्रह करीत आहेत. मात्र, पदाचा राजीनामा दिला असल्यामुळे कोणत्या अधिकारात बैठक घ्यायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे. माजी खा. विलास मुत्तेमवार, रोहयो मंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, आ. दीनानाथ पडोळे, प्रदेश सचिव जयप्रकाश गुप्ता या नेत्यांपैकी कुणीही पुढाकार घेण्यास तयार नाहीत. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. तीन महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका आहे. सहाही मतदारसंघात भाजपची आघाडी पाहता काँग्रेसपुढे मोठे संकट आहे. अशात आता पराभव विसरून नव्याने मोट बांधली नाही तर विधानसभाही हातून जाईल, अशी स्थिती आहे. मात्र, नेत्यांनी दडी मारल्यामुळे कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे. (प्रतिनिधी)