शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अपंग, मतिमंदांचा वाली कोण?

By admin | Updated: July 16, 2014 01:13 IST

देशातील सुमारे पाच कोटी विकलांगांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘अच्छे दिन’अजून कोसो दूर आहेत. यावेळच्या मोदी सरकारच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात या घटकासाठी काहीही तरतूद करण्यात आली नाही,

शंकरबाबा पापळकर यांचा संतप्त सवालनागपूर : देशातील सुमारे पाच कोटी विकलांगांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘अच्छे दिन’अजून कोसो दूर आहेत. यावेळच्या मोदी सरकारच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात या घटकासाठी काहीही तरतूद करण्यात आली नाही, अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांनी व्यक्त केली आहे. पापळकर यांनी आजवर अनेक अपंग व मतिमंदांचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यासाठी त्यांनी अनेकवेळा न्यायालयीन लढासुद्धा दिला आहे.‘लोकमत’शी बोलताना शंकरबाबा म्हणाले, देशात दरवर्षी एक लाख विकलांग बेवारस दिसतात. त्यांचा ठावठिकाणा नाही. एकट्या महाराष्ट्रात पाच लाख मतिमंद असून १० हजारावर बेवारस आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारकडे कोणतीही योजना नाही. देशातील या दुर्लक्षित घटकासाठी दरवर्षी अर्थसंकल्पीय तरतूद झाली पाहिजे. किमान १० हजार कोटी रु. त्यांच्यासाठी राखून ठेवले पाहिजे. मानसिक विकलांगांसाठी सिकंदराबाद येथे एक मोठे केंद्र आहे; त्या धर्तीवरच बेवारस मतिमंदांचेही पुनर्वसन झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.देशात व राज्यात मोठमोठ्या स्वयंसेवी सामाजिक संस्था आहेत, पण त्यांना या दुर्लक्षित घटकाकडे लक्ष देण्यास वेळ नाही, असा शब्दात संताप व्यक्त करून शंकरबाबा म्हणाले, सरकारकडून अनुदान लाटणाऱ्या या संस्थांची सरकारविरुध्द आवाज उठविण्याची मानसिकता नाही.बेवारस अपंग व मतिमंदांसाठी योजना आखण्यात सरकार खरेच प्रामाणिक असेल तर या कामी सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. (प्रतिनिधी)