शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
3
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
4
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
5
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
6
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
7
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
8
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
9
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
10
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
11
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
12
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
13
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
14
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
15
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
16
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
17
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
18
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
19
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
20
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'

कुणावर शेकणार लाठीमार ?

By admin | Updated: December 21, 2015 02:59 IST

थेट मुख्यमंत्र्यांनीच तीव्र नाराजी व्यक्त केल्यामुळे शंभरावर मोर्चेकऱ्यांवर करण्यात आलेला लाठीहल्ला कुणावर शेकणार, असा प्रश्न चर्चेला आला आहे.

मुख्यमंत्र्यांची तीव्र नाराजी : लोकप्रतिनिधींनी विचारला अधिकाऱ्यांना जाबनरेश डोंगरे नागपूरथेट मुख्यमंत्र्यांनीच तीव्र नाराजी व्यक्त केल्यामुळे शंभरावर मोर्चेकऱ्यांवर करण्यात आलेला लाठीहल्ला कुणावर शेकणार, असा प्रश्न चर्चेला आला आहे. लाठीहल्ल्याच्या अनुषंगाने चोहोबाजूने माहिती मागविली जात असल्यामुळे दोन दिवसांपासून गृहमंत्रालय आणि पोलीस दलातील शीर्षस्थ अधिकाऱ्यांच्या बैठका वाढल्या आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांनी याअनुषंगाने पोलीस आयुक्त आणि सहआयुक्तांना जाब विचारल्याची खास सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आयुक्तांनी लाठीहल्ल्याचा अहवाल बनविण्याचे संबंधितांना निर्देश दिले आहेत. परिणामी मोर्चेकऱ्यांवर अमानुषपणे लाठ्या चालविणाऱ्या दोषींंना धडकी भरली आहे. तीन दिवसात अमानुष लाठीहल्ल्याच्या दोन घटना घडल्याची विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच नोंद झाली आहे. त्यामुळे केवळ मोर्चेकरी, त्यांचे समर्थक, विरोधी पक्षच नव्हे तर सत्तापक्षातील नेत्यांनीही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या बदनामीची ‘पोलिसांनी सुपारी घेतली की काय’, अशी संतप्त विचारणा काही लोकप्रतिनिधी खासगीत करीत आहेत. पाठराखण कुणाची ?कुणावर शेकणार लाठीमार ?नागपूर : न्याय मागण्यासाठी उपाशीतापाशी घोषणाबाजी करणाऱ्या मातंग समाजाच्या मोर्चेकऱ्यांवर शुक्रवारी आणि तत्पूर्वी बुधवारी संगणक कर्मचाऱ्यांवर जोरदार लाठीहल्ला केला. जमाव हिंसक बनत असेल तर त्याला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीहल्ला करण्याची सूट आहे. मात्र, त्यासाठी काही नियम आहे. हिंसा करणाऱ्यांनाच लाठी मारावी, तीसुद्धा पायावर मारली जावी (त्याने पळ काढावा म्हणून) असा दंडक आहे. पोलिसांनी मात्र बुधवारी अनेक बेरोजगारांना अक्षरश: सोलून काढले. त्याची वरिष्ठ पातळीवर पाठराखण झाल्यामुळे शुक्रवारी पोलीस अधिकच निर्दय बनले. त्यांनी मोर्चेकऱ्यांना फोडूनच काढले. रक्तबंबाळ झालेल्या एकेका मोर्चेकऱ्याला चार पाच पोलीस गुराढोरासारखे बदडत असल्याचे चित्र प्रसारमाध्यमांनी दाखविले. त्यामुळे विरोधीच नव्हे तर सत्तापक्षातील लोकप्रतिनिधीही अस्वस्थ झाले आहेत. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे याबाबत जाब विचारल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव आणि सहआयुक्त राजवर्धन सिन्हा यांनी शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीत काय झाले, त्याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. दुसरीकडे या लाठीहल्ल्याबाबत सुरक्षा यंत्रणांच्या सर्वच शीर्षस्थांकडून माहिती मागविली जात असल्याने पोलीस आयुक्तांनीही लाठीहल्ल्याचा अहवाल तयार करण्यासाठी संबंधितांना निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)कुणी बदलविली व्यवस्थाविशेष म्हणजे, अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी नागपुरात दाखल झालेल्या राज्यातील विविध अधिकाऱ्यांची पोलीस आयुक्तांनी विशेष बैठक घेऊन त्यांना त्यांच्या जबाबदारीची माहिती दिली होती. संपूर्ण अधिवेशनादरम्यान कोणत्याही अधिकाऱ्याच्या जबाबदारीत बदल होणार नाही, असेही सांगितले होते. मात्र बाहेरून आलेल्या एका अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि दोन पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी (स्पॉट) बदलवून घेतली. त्यामुळे नव्या जबाबदारीची अर्धवट माहिती असलेले अधिकारी मोर्चा पॉर्इंटवर नेमले गेले आहे. त्यातूनच हा लाठीचार्ज घडल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदारी बदलविण्यास कुणी भाग पाडले, ते बोलायला कोणी तयार नाहीत.