शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

मराठी माणसाची लायकी काढणारे काळे कोण? मराठीजन संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 10:13 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी पदव्युत्तर विभागाच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘मराठी भाषा संरक्षण व संवर्धन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत गुरुवारी डॉ. काळे यांनी हे वादग्रस्त विधान केल्यामुळे खळबळ उडाली असून अनेकांनी या विधानाचा निषेध नोंदवला.

ठळक मुद्देसाहित्य सृष्टीतूनही संतप्त प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठी आणि मराठीजनांचे श्रेष्ठत्व दिल्लीने कायम मान्य केले. महाराष्ट्राने अवघ्या देशाला वैचारिक नेतृत्व दिले आहे. असा इतिहास असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाण्याची मराठी लोकांची लायकीच नाही, असे विधान डॉ.अक्षयकुमार काळे यांनी कोणत्या आधारे केले, असे विधान करणारे ते होतात कोण, असा संतप्त सवाल साहित्यसृष्टीतून विचारला जात आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी पदव्युत्तर विभागाच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘मराठी भाषा संरक्षण व संवर्धन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत गुरुवारी डॉ. काळे यांनी हे वादग्रस्त विधान केल्यामुळे खळबळ उडाली असून अनेकांनी या विधानाचा निषेध नोंदवला.

मी माझ्या लायकीबद्दल बोललोगुरुवारच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी ‘तुम्ही पंतप्रधानांना भेटून हे निवेदन देणार का’ असे मला विचारले. यावर मी ‘पंतप्रधान मला भेटीची वेळ देऊन हे निवेदन स्वीकारतील, अशी माझी लायकी आहे ’ असे उत्तर दिले. लायकी हा शब्द मला ‘पात्रता’ याअर्थी वापरायचा नव्हता तर ‘पोहोच’ याअर्थी वापरायचा होता आणि तो केवळ मी माझ्याच संदर्भात वापरला होता. हे विधान समस्त मराठीजनांसाठी नव्हते.- डॉ. अक्षयकुमार काळे, माजी संमेलनाध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य संमेलन

काळेंनी आतापर्यंत झोपा काढल्या का?. काळे यांचे विधान वाचून धक्का बसला. काळेंना अभिजात मराठीची इतकी घाई झाली आहे. परंतु तिकडे १२०० मराठी शाळा बंद झाल्या, बेळगावातील मराठीजनांवर अत्याचार आजही सुरू आहेत. यावर ते कधी काही बोलत नाही. ते स्वत: साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना या विषयावर कुठलीही ठाम भूमिका त्यांनी घेतली नाही. आता तेच मराठी जणांची लायकी काढत आहेत. त्यांनी स्वत: आतापर्यंत झोपाच काढल्या का?- डॉ. रवींद्र शोभणे, कादंबरीकार

हे विधान गंभीरतेने घेण्याचे कारण नाहीडॉ.अक्षयकुमार काळे जे काही बोलले त्या विधानाला इतक्या गंभीरतेने घेण्याचे काहीच कारण नाही. मराठीचे अभिजातत्व हे एकटे काळे नव्हे तर एकूणच मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी कुणीही असे विधान करू नये आणि माध्यमांनीही अशा विषयांना उगाच हवा देऊ नये- डॉ. किशोर सानप, संत साहित्यिक

हा १२ कोटी मराठी जनतेचा अपमानशंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण या मराठी नेत्यांचा सल्ला घेतल्याशिवाय तत्कालीन पंतप्रधान पुढे पाऊल टाकत नव्हते हा इतिहास आहे. वर्तमानातही नितीन गडकरींसारखा मराठी नेता देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका वठवतोय. अशा स्थितीत पंतप्रधानांना भेटण्याची मराठी माणसाची लायकी नाही, असे डॉ. काळे कसे म्हणू शकतात? त्यांचे हे विधान म्हणजे १२ कोटी मराठी जनतेचा अपमान आहे. मी मराठीचा प्राध्यापक व अभ्यासक म्हणून या विधानाचा निषेध करतो.- प्रा. दीपककुमार खोब्रागडे, मराठी विभाग प्रमुख, डॉ. आंबेडकर कॉलेज

टॅग्स :literatureसाहित्य