शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
4
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
5
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
6
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
7
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा
8
ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार
9
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
10
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे लवकरच बांधणार लग्नगाठ? स्वतःच केला खुलासा, म्हणाला...
12
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
13
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
14
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
15
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
16
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
17
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
18
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
19
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
20
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...

मराठी माणसाची लायकी काढणारे काळे कोण? मराठीजन संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 10:13 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी पदव्युत्तर विभागाच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘मराठी भाषा संरक्षण व संवर्धन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत गुरुवारी डॉ. काळे यांनी हे वादग्रस्त विधान केल्यामुळे खळबळ उडाली असून अनेकांनी या विधानाचा निषेध नोंदवला.

ठळक मुद्देसाहित्य सृष्टीतूनही संतप्त प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठी आणि मराठीजनांचे श्रेष्ठत्व दिल्लीने कायम मान्य केले. महाराष्ट्राने अवघ्या देशाला वैचारिक नेतृत्व दिले आहे. असा इतिहास असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाण्याची मराठी लोकांची लायकीच नाही, असे विधान डॉ.अक्षयकुमार काळे यांनी कोणत्या आधारे केले, असे विधान करणारे ते होतात कोण, असा संतप्त सवाल साहित्यसृष्टीतून विचारला जात आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी पदव्युत्तर विभागाच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘मराठी भाषा संरक्षण व संवर्धन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत गुरुवारी डॉ. काळे यांनी हे वादग्रस्त विधान केल्यामुळे खळबळ उडाली असून अनेकांनी या विधानाचा निषेध नोंदवला.

मी माझ्या लायकीबद्दल बोललोगुरुवारच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी ‘तुम्ही पंतप्रधानांना भेटून हे निवेदन देणार का’ असे मला विचारले. यावर मी ‘पंतप्रधान मला भेटीची वेळ देऊन हे निवेदन स्वीकारतील, अशी माझी लायकी आहे ’ असे उत्तर दिले. लायकी हा शब्द मला ‘पात्रता’ याअर्थी वापरायचा नव्हता तर ‘पोहोच’ याअर्थी वापरायचा होता आणि तो केवळ मी माझ्याच संदर्भात वापरला होता. हे विधान समस्त मराठीजनांसाठी नव्हते.- डॉ. अक्षयकुमार काळे, माजी संमेलनाध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य संमेलन

काळेंनी आतापर्यंत झोपा काढल्या का?. काळे यांचे विधान वाचून धक्का बसला. काळेंना अभिजात मराठीची इतकी घाई झाली आहे. परंतु तिकडे १२०० मराठी शाळा बंद झाल्या, बेळगावातील मराठीजनांवर अत्याचार आजही सुरू आहेत. यावर ते कधी काही बोलत नाही. ते स्वत: साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना या विषयावर कुठलीही ठाम भूमिका त्यांनी घेतली नाही. आता तेच मराठी जणांची लायकी काढत आहेत. त्यांनी स्वत: आतापर्यंत झोपाच काढल्या का?- डॉ. रवींद्र शोभणे, कादंबरीकार

हे विधान गंभीरतेने घेण्याचे कारण नाहीडॉ.अक्षयकुमार काळे जे काही बोलले त्या विधानाला इतक्या गंभीरतेने घेण्याचे काहीच कारण नाही. मराठीचे अभिजातत्व हे एकटे काळे नव्हे तर एकूणच मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी कुणीही असे विधान करू नये आणि माध्यमांनीही अशा विषयांना उगाच हवा देऊ नये- डॉ. किशोर सानप, संत साहित्यिक

हा १२ कोटी मराठी जनतेचा अपमानशंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण या मराठी नेत्यांचा सल्ला घेतल्याशिवाय तत्कालीन पंतप्रधान पुढे पाऊल टाकत नव्हते हा इतिहास आहे. वर्तमानातही नितीन गडकरींसारखा मराठी नेता देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका वठवतोय. अशा स्थितीत पंतप्रधानांना भेटण्याची मराठी माणसाची लायकी नाही, असे डॉ. काळे कसे म्हणू शकतात? त्यांचे हे विधान म्हणजे १२ कोटी मराठी जनतेचा अपमान आहे. मी मराठीचा प्राध्यापक व अभ्यासक म्हणून या विधानाचा निषेध करतो.- प्रा. दीपककुमार खोब्रागडे, मराठी विभाग प्रमुख, डॉ. आंबेडकर कॉलेज

टॅग्स :literatureसाहित्य