शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या खावटीचे २० टक्के कमिशन कुणाच्या घशात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 21:13 IST

Tiribal fund issue आदिवासींना खावटीच्या रूपात २ हजार रुपये किमतीच्या वस्तू देण्यात आल्या. मात्र, बाजारात त्या वस्तूंची प्रत्यक्ष किंमत १६०० रुपयेच आहे.

ठळक मुद्दे १६०० च्या वस्तूंची खरेदी २ हजारात : दर्जाबाबतही प्रश्नचिन्हच

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : आदिवासींना खावटीच्या रूपात २ हजार रुपये किमतीच्या वस्तू देण्यात आल्या. मात्र, बाजारात त्या वस्तूंची प्रत्यक्ष किंमत १६०० रुपयेच आहे. शिवाय दिलेल्या वस्तू चांगल्या दर्जाच्या व ब्रॅण्डेड नाहीत. त्यामुळे या वस्तूंच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात तडजोड झाल्याचे स्पष्ट होत असून, तब्बल २० टक्के कमिशन नेमके कुणाच्या घशात गेले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पहिल्या लॉकडाऊनमध्ये आदिवासींच्या रोजगाराचा प्रश्न सरकारला भेडसावला. आदिवासी कुटुंबांची उपासमार होऊ नये म्हणून आदिवासी विभागाने खावटी देण्याचा निर्णय घेतला. खावटी अनुदान योजनेंंतर्गत आदिवासी कुटुंबांना ४००० रुपये अनुदान वर्षभरासाठी देण्यात येणार होते. ९ सप्टेंबर २०२० रोजी शासन निर्णय निर्गमित केला. त्यात २ हजार रुपये रोख व २ हजार रुपये वस्तूच्या रूपात मिळणार होत्या. त्यासाठी ४८६ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली होती. आदिवासींना वस्तूच्या रूपात मिळणारा लाभ जुलै महिन्यात मिळायला लागला आहे. नागपूर जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांपर्यंत धान्याचे किट पोहोचले आहे. यात १२ प्रकारच्या वस्तू आहेत.

२३१ कोटी रुपयांचे अनुदान वस्तूरूपात ११ लाख ५५ हजार लाभार्थ्यांना वाटप होणार आहे. २ हजार रुपयांच्या या वस्तूमध्ये १ किलो मटकी, २ किलो चवळी, ३ किलो हरभरा, १ किलो पांढरा वाटाणा, दोन किलो तूरडाळ, १ किलो उडीदडाळ, ३ किलो मीठ, ५०० ग्रॅम गरम मसाला, १ लीटर शेंगदाणा तेल, ५०० ग्रॅम मिरची पावडर, ५०० ग्रॅम चहा पावडर व ३ किलो साखरेचा समावेश आहे. हे साहित्य आदिवासींपर्यंत पोहोचविण्यासाठी २४ कोटींचा वाहतूक खर्च केला आहे.

 या वस्तूंच्या किरकोळ बाजारातील किमती

खावटीत मिळालेल्या वस्तू   किरकोळ बाजारातील किंमत

मटकी - १ किलो - १०२ रुपये

चवळी - २ किलो - १८८ रुपये

हरभरा - ३ किलो - १९८ रुपये

पांढरा वाटाणा - १ किलो - ७८ रुपये

तूरडाळ - २ किलो - १९२ रुपये

उडीदडाळ - १ किलो - १०६ रुपये

मीठ - ३ किलो - ३० रुपये

गरम मसाला - ५०० ग्रॅम - १७० रुपये

शेंगदाणा तेल - १ लीटर - १७० रुपये

मिरची पावडर - १ किलो - १८० रुपये

चहा पावडर - ५०० ग्रॅम - १४० रुपये

साखर - ३ किलो - ११४ रुपये

 

 आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय, अशी योजनांची अवस्था आहे

या किटमधील १२ वस्तूंचे किरकोळ बाजारातील दर लक्षात घेता १६०० रुपये खर्च येतो आहे. ११ लाख ५५ हजार आदिवासींकरिता घाऊक खरेदी केली तर हे २ हजारांचे किट १४०० रुपयांच्यावर नसेलच. वस्तूच्या रूपातील अनुदान रोखेतच दिले असते तर ठेकेदारांना, नेत्यांना काही मिळाले नसते. आदिवासी विकास विभागाची व्यथाच आहे, ‘आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंंय’.

 दिनेश शेराम, अध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद

 

आमचा अडाणीपणा सरकार दाखवत आहे

राज्य सरकारची अशी धारणा आहे की, आदिवासींना वस्तूदेखील खरेदी करता येत नाही. त्यामुळेच आम्हाला वस्तूंची खरेदी करून दिली. एकेकाळी या देशात आदिवासींचे राज्य होते. आजही किल्ले त्याची साक्ष आहेत. देशातील असा एकही भाग नाही जेथून आदिवासी स्वातंत्र्ययुद्धात लढला नाही. या देशभक्त आदिवासींना सरकारने निरक्षर समजून आमचा अडाणीपणा दाखविला असल्याची प्रतिक्रिया समाजातून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाGovernmentसरकारfundsनिधी