शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या खावटीचे २० टक्के कमिशन कुणाच्या घशात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 21:13 IST

Tiribal fund issue आदिवासींना खावटीच्या रूपात २ हजार रुपये किमतीच्या वस्तू देण्यात आल्या. मात्र, बाजारात त्या वस्तूंची प्रत्यक्ष किंमत १६०० रुपयेच आहे.

ठळक मुद्दे १६०० च्या वस्तूंची खरेदी २ हजारात : दर्जाबाबतही प्रश्नचिन्हच

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : आदिवासींना खावटीच्या रूपात २ हजार रुपये किमतीच्या वस्तू देण्यात आल्या. मात्र, बाजारात त्या वस्तूंची प्रत्यक्ष किंमत १६०० रुपयेच आहे. शिवाय दिलेल्या वस्तू चांगल्या दर्जाच्या व ब्रॅण्डेड नाहीत. त्यामुळे या वस्तूंच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात तडजोड झाल्याचे स्पष्ट होत असून, तब्बल २० टक्के कमिशन नेमके कुणाच्या घशात गेले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पहिल्या लॉकडाऊनमध्ये आदिवासींच्या रोजगाराचा प्रश्न सरकारला भेडसावला. आदिवासी कुटुंबांची उपासमार होऊ नये म्हणून आदिवासी विभागाने खावटी देण्याचा निर्णय घेतला. खावटी अनुदान योजनेंंतर्गत आदिवासी कुटुंबांना ४००० रुपये अनुदान वर्षभरासाठी देण्यात येणार होते. ९ सप्टेंबर २०२० रोजी शासन निर्णय निर्गमित केला. त्यात २ हजार रुपये रोख व २ हजार रुपये वस्तूच्या रूपात मिळणार होत्या. त्यासाठी ४८६ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली होती. आदिवासींना वस्तूच्या रूपात मिळणारा लाभ जुलै महिन्यात मिळायला लागला आहे. नागपूर जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांपर्यंत धान्याचे किट पोहोचले आहे. यात १२ प्रकारच्या वस्तू आहेत.

२३१ कोटी रुपयांचे अनुदान वस्तूरूपात ११ लाख ५५ हजार लाभार्थ्यांना वाटप होणार आहे. २ हजार रुपयांच्या या वस्तूमध्ये १ किलो मटकी, २ किलो चवळी, ३ किलो हरभरा, १ किलो पांढरा वाटाणा, दोन किलो तूरडाळ, १ किलो उडीदडाळ, ३ किलो मीठ, ५०० ग्रॅम गरम मसाला, १ लीटर शेंगदाणा तेल, ५०० ग्रॅम मिरची पावडर, ५०० ग्रॅम चहा पावडर व ३ किलो साखरेचा समावेश आहे. हे साहित्य आदिवासींपर्यंत पोहोचविण्यासाठी २४ कोटींचा वाहतूक खर्च केला आहे.

 या वस्तूंच्या किरकोळ बाजारातील किमती

खावटीत मिळालेल्या वस्तू   किरकोळ बाजारातील किंमत

मटकी - १ किलो - १०२ रुपये

चवळी - २ किलो - १८८ रुपये

हरभरा - ३ किलो - १९८ रुपये

पांढरा वाटाणा - १ किलो - ७८ रुपये

तूरडाळ - २ किलो - १९२ रुपये

उडीदडाळ - १ किलो - १०६ रुपये

मीठ - ३ किलो - ३० रुपये

गरम मसाला - ५०० ग्रॅम - १७० रुपये

शेंगदाणा तेल - १ लीटर - १७० रुपये

मिरची पावडर - १ किलो - १८० रुपये

चहा पावडर - ५०० ग्रॅम - १४० रुपये

साखर - ३ किलो - ११४ रुपये

 

 आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय, अशी योजनांची अवस्था आहे

या किटमधील १२ वस्तूंचे किरकोळ बाजारातील दर लक्षात घेता १६०० रुपये खर्च येतो आहे. ११ लाख ५५ हजार आदिवासींकरिता घाऊक खरेदी केली तर हे २ हजारांचे किट १४०० रुपयांच्यावर नसेलच. वस्तूच्या रूपातील अनुदान रोखेतच दिले असते तर ठेकेदारांना, नेत्यांना काही मिळाले नसते. आदिवासी विकास विभागाची व्यथाच आहे, ‘आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंंय’.

 दिनेश शेराम, अध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद

 

आमचा अडाणीपणा सरकार दाखवत आहे

राज्य सरकारची अशी धारणा आहे की, आदिवासींना वस्तूदेखील खरेदी करता येत नाही. त्यामुळेच आम्हाला वस्तूंची खरेदी करून दिली. एकेकाळी या देशात आदिवासींचे राज्य होते. आजही किल्ले त्याची साक्ष आहेत. देशातील असा एकही भाग नाही जेथून आदिवासी स्वातंत्र्ययुद्धात लढला नाही. या देशभक्त आदिवासींना सरकारने निरक्षर समजून आमचा अडाणीपणा दाखविला असल्याची प्रतिक्रिया समाजातून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाGovernmentसरकारfundsनिधी