शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

आदिवासींच्या खावटीचे २० टक्के कमिशन कुणाच्या घशात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 21:13 IST

Tiribal fund issue आदिवासींना खावटीच्या रूपात २ हजार रुपये किमतीच्या वस्तू देण्यात आल्या. मात्र, बाजारात त्या वस्तूंची प्रत्यक्ष किंमत १६०० रुपयेच आहे.

ठळक मुद्दे १६०० च्या वस्तूंची खरेदी २ हजारात : दर्जाबाबतही प्रश्नचिन्हच

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : आदिवासींना खावटीच्या रूपात २ हजार रुपये किमतीच्या वस्तू देण्यात आल्या. मात्र, बाजारात त्या वस्तूंची प्रत्यक्ष किंमत १६०० रुपयेच आहे. शिवाय दिलेल्या वस्तू चांगल्या दर्जाच्या व ब्रॅण्डेड नाहीत. त्यामुळे या वस्तूंच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात तडजोड झाल्याचे स्पष्ट होत असून, तब्बल २० टक्के कमिशन नेमके कुणाच्या घशात गेले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पहिल्या लॉकडाऊनमध्ये आदिवासींच्या रोजगाराचा प्रश्न सरकारला भेडसावला. आदिवासी कुटुंबांची उपासमार होऊ नये म्हणून आदिवासी विभागाने खावटी देण्याचा निर्णय घेतला. खावटी अनुदान योजनेंंतर्गत आदिवासी कुटुंबांना ४००० रुपये अनुदान वर्षभरासाठी देण्यात येणार होते. ९ सप्टेंबर २०२० रोजी शासन निर्णय निर्गमित केला. त्यात २ हजार रुपये रोख व २ हजार रुपये वस्तूच्या रूपात मिळणार होत्या. त्यासाठी ४८६ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली होती. आदिवासींना वस्तूच्या रूपात मिळणारा लाभ जुलै महिन्यात मिळायला लागला आहे. नागपूर जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांपर्यंत धान्याचे किट पोहोचले आहे. यात १२ प्रकारच्या वस्तू आहेत.

२३१ कोटी रुपयांचे अनुदान वस्तूरूपात ११ लाख ५५ हजार लाभार्थ्यांना वाटप होणार आहे. २ हजार रुपयांच्या या वस्तूमध्ये १ किलो मटकी, २ किलो चवळी, ३ किलो हरभरा, १ किलो पांढरा वाटाणा, दोन किलो तूरडाळ, १ किलो उडीदडाळ, ३ किलो मीठ, ५०० ग्रॅम गरम मसाला, १ लीटर शेंगदाणा तेल, ५०० ग्रॅम मिरची पावडर, ५०० ग्रॅम चहा पावडर व ३ किलो साखरेचा समावेश आहे. हे साहित्य आदिवासींपर्यंत पोहोचविण्यासाठी २४ कोटींचा वाहतूक खर्च केला आहे.

 या वस्तूंच्या किरकोळ बाजारातील किमती

खावटीत मिळालेल्या वस्तू   किरकोळ बाजारातील किंमत

मटकी - १ किलो - १०२ रुपये

चवळी - २ किलो - १८८ रुपये

हरभरा - ३ किलो - १९८ रुपये

पांढरा वाटाणा - १ किलो - ७८ रुपये

तूरडाळ - २ किलो - १९२ रुपये

उडीदडाळ - १ किलो - १०६ रुपये

मीठ - ३ किलो - ३० रुपये

गरम मसाला - ५०० ग्रॅम - १७० रुपये

शेंगदाणा तेल - १ लीटर - १७० रुपये

मिरची पावडर - १ किलो - १८० रुपये

चहा पावडर - ५०० ग्रॅम - १४० रुपये

साखर - ३ किलो - ११४ रुपये

 

 आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय, अशी योजनांची अवस्था आहे

या किटमधील १२ वस्तूंचे किरकोळ बाजारातील दर लक्षात घेता १६०० रुपये खर्च येतो आहे. ११ लाख ५५ हजार आदिवासींकरिता घाऊक खरेदी केली तर हे २ हजारांचे किट १४०० रुपयांच्यावर नसेलच. वस्तूच्या रूपातील अनुदान रोखेतच दिले असते तर ठेकेदारांना, नेत्यांना काही मिळाले नसते. आदिवासी विकास विभागाची व्यथाच आहे, ‘आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंंय’.

 दिनेश शेराम, अध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद

 

आमचा अडाणीपणा सरकार दाखवत आहे

राज्य सरकारची अशी धारणा आहे की, आदिवासींना वस्तूदेखील खरेदी करता येत नाही. त्यामुळेच आम्हाला वस्तूंची खरेदी करून दिली. एकेकाळी या देशात आदिवासींचे राज्य होते. आजही किल्ले त्याची साक्ष आहेत. देशातील असा एकही भाग नाही जेथून आदिवासी स्वातंत्र्ययुद्धात लढला नाही. या देशभक्त आदिवासींना सरकारने निरक्षर समजून आमचा अडाणीपणा दाखविला असल्याची प्रतिक्रिया समाजातून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाGovernmentसरकारfundsनिधी