शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मध्यान्ह भोजनावर कोण डल्ला मारतो? चौकशी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:08 IST

मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत शाळांना पुरविल्या जाणाऱ्या  अन्नधान्यावर डल्ला मारणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला दिला.

ठळक मुद्देनागपूर हायकोर्टाचे समिती स्थापन करण्याचे निर्देश

आॅनलाईन लोकमतनागपूर : मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत शाळांना पुरविल्या जाणाऱ्या  अन्नधान्यावर डल्ला मारणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला दिला. या आदेशामुळे येणाऱ्या  काळात अनेकांची पोलखोल होऊ शकते. परिणामी या योजनेशी जुळलेल्यांमध्ये खळबळ माजली आहे.सक्षम व्यक्तींची समिती स्थापन करण्यासाठी व प्रकरणाची चौकशी पूर्ण करण्यासाठी न्यायालयाने शासनाला तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. एफसीआय गोदामांतून निघालेले अन्नधान्य राज्यभरातील शाळांमध्ये जशाच्या तसे पोहोचण्यासाठी सुधारित धोरण तयार करणे, अधिकारी व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करणे, योजनेंतर्गत मिळणारे चांगले अन्नधान्य खुल्या बाजारात विकून त्याऐवजी भेसळयुक्त अन्नधान्य शाळांना पुरविणाऱ्या व योजनेतील अनुदानाची अफरातफर करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेणे, शाळापर्यंत अन्नधान्य पोहोचवून देण्याची निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी उपाय सुचविणे यासह विविध मुद्यांवर समितीला अहवाल तयार करायचा आहे. एका प्रकरणात मध्यान्ह भोजन योजनेत गैरव्यवहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल केली होती. प्रकरणाचे कामकाज पाहण्यासाठी अ‍ॅड. प्रशांत ठाकरे यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. न्यायालयाने वरील आदेश देऊन हे प्रकरण निकाली काढले आहे.

टॅग्स :foodअन्नSchoolशाळा