शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आयुक्तांचे बोलवते धनी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 00:17 IST

Sandeep Joshi asked, nagpur news कायद्यानुसार स्थायी समितीने बजेट मंजूर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. मनपा आयुक्तांनी मंजूर कामांना ब्रेक लावले आहे. भाजपच्या कार्यकाळात शहरात विकास कामे होऊ नये, असे काही लोकांना वाटते. त्यांचे बोलवते धनी वेगळे आहेत. येणाऱ्या काळात ते पुढे येतीलच, गरज पडल्यास या विरोधात भाजपसंघर्षाची भूमिका घेईल, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

ठळक मुद्देसंदीप जोशी यांचा सवाल : विकास कामासाठी गरज पडल्यास संघर्ष

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कायद्यानुसार स्थायी समितीने बजेट मंजूर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. मनपा आयुक्तांनी मंजूर कामांना ब्रेक लावले आहे. भाजपच्या कार्यकाळात शहरात विकास कामे होऊ नये, असे काही लोकांना वाटते. त्यांचे बोलवते धनी वेगळे आहेत. येणाऱ्या काळात ते पुढे येतीलच, गरज पडल्यास या विरोधात भाजपसंघर्षाची भूमिका घेईल, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

माझ्या कार्यकाळात तीन आयुक्तांच्या कामकाजाचा अनुभव घेतला. तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात महापौर निधीतील प्रकल्प अपूर्ण राहिले. नागरिकांशी संवाद साधण्यासाठी वॉक अ‍ॅन्ड टॉक विथ मेअर, ब्रेकफास्ट विथ मेअर उपक्रम राबविले. जनता दरबार घेतले. स्वच्छता मोहिमेसाठी मम्मी पापा यू टू मोहीम राबविली. यातून स्वच्छतेत नागपूरचा क्रमांक १८ आला. आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या कार्यकाळात कोरोना रुग्णांसाठी चांगली सुविधा निर्माण झाली. असे जोशी यांनी सांगितले.

ओसीडब्ल्यूची खुशाल चौकशी करावी

यूपीए सरकारने नागपूर शहरातील २४ बाय ७ योजनेची प्रशंसा करून पुरस्कार दिला होता. या प्रकल्पात कोणत्याही प्रकारची अनियमितता नाही. काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या कार्यकाळात शहरात १५ जलकुंभ उभारण्यात आले. तर भाजपच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात ५५ जलकुंभ उभारले, अमृत योजनेच्या माध्यमातून लवकरच पुन्हा ३० जलकुंभ उभारले जात आहेत. वर्षभराने होत असलेली महापालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेवून विकास कामांना ब्रेक लावण्यासाठी चौकशी केली जात आहे. ती खुशाल करावी. असे संदीप जोशी यांनी प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

मुुंढेंमुळे शौचालय झाले नाही

महापौर निधीतून शौचालय उभारण्याचा निर्णय घेतला. परंतु तत्कालीन आयुक्त तुकाराम मुुंढे यांनी फाईल रोखली. त्यांनी महापौर फंडातील एक रुपयाही खर्च केला नाही. यामुळे शौचालय उभारता आले नाही, अशी खंत जोशी यांनी व्यक्त केली. मुंढे यांच्याशी वैयक्तिक मतभेद नव्हते. परंतु एकाधिकारहीमुळे ते ऐकत नव्हते.

पदवीधर निवडणुकीवर मंथन

पदवीधर मतदार संघातील निवडणुकीनंतर पॉझिटिव्ह आलो. अजूनही आजारी आहे. या निवडणुकीवर पक्षात मंथन सुरू आहे. भाजपा सर्वधर्मियांचा पक्ष आहे. निवडणुकीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणर असल्याचे जोशी म्हणाले.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीRadhakrishnan. Bराधाकृष्णन बी.