शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

नागपूर जिल्ह्यातील खापरखेडात सांबारमध्ये आढळल्या पांढऱ्या अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 10:26 IST

खापरखेडा तालुक्यातील चिचोली ग्रामपंचायतच्या सदस्यांनी सभा आटोपल्यानंतर नाश्ता करण्यासाठी हॉटेलमधून दोसा मागवला. त्या दोशासोबत देण्यात आलेल्या सांबारात अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली.

ठळक मुद्दे हॉटेलमधील खाद्यपदार्थांवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फास्ट फूड आणि हॉटेलमधील खाद्यपदार्थांवर ताव मारणे ही आता फॅशन झाली आहे. हे खाद्यपदार्थ खाताना ते खाण्यायोग्य आहे की नाही, याची पडताळणी कुणीही करीत नाही. खापरखेडा तालुक्यातील चिचोली ग्रामपंचायतच्या सदस्यांनी सभा आटोपल्यानंतर नाश्ता करण्यासाठी हॉटेलमधून दोसा मागवला. त्या दोशासोबत देण्यात आलेल्या सांबारात अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली.चिचोली ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी मासिक सभेचे आयोजन केले होते. काही कारणास्तव ही सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर सरपंच पुरुषोत्तम चांदेकर यांनी उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांसाठी खापरखेडा येथील ‘एम्बसी’ हॉटेलमधून दोसा बोलावला. विशेष म्हणजे, हे परिसरातील नामांकित हॉटेल आहे. मात्र, या दोशासोबत पाठविण्यात आलेल्या सांबारामध्ये अळ्या असल्याचे सदस्यांच्या निदर्शनास आले. सदस्यांनी हा प्रकार वेळीच हॉटेल व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिला. ग्रामीण भागातील बहुतांश हॉटेलमध्ये साफसफाईचा अभाव असल्याचे दिसून येते. काही हॉटेल गुन्हेगारांचे अड्डे बनले आहेत. या हॉटेलची तपासणी करण्याची तसदी अन्न व औषधी प्रशासन तसेच पोलीस विभाग घेत नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्यास अपाय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने गलिच्छ हॉटेल मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्य