शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नागपुरातील रेल्वेने बांधलेली इमारत ठरतेय पांढरा हत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 11:11 IST

नागपूर रेल्वे रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांना मुक्कामी राहण्यासाठी रेल्वे प्रशासनाने लाखो रुपये खर्चून रुग्णालयाच्या शेजारीच इमारत उभी केली. परंतु मागील तीन वर्षात एकाही रुग्णाच्या नातेवाईकांना या इमारतीचा लाभ झाला नाही.

ठळक मुद्देप्रशासनाचा नियोजनशून्य कारभार तीन वर्षात एकाही रुग्णाच्या नातेवाईकाला नाही लाभ

दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे रुग्णालयात हजारो कर्मचारी उपचार घेतात. यातील असंख्य कर्मचाऱ्यांना रुग्णालयात भरती व्हावे लागते. त्यांच्या सोबतच्या नातेवाईकांना मुक्कामी राहण्यासाठी रेल्वे प्रशासनाने लाखो रुपये खर्चून रुग्णालयाच्या शेजारीच इमारत उभी केली. परंतु मागील तीन वर्षात एकाही रुग्णाच्या नातेवाईकांना या इमारतीचा लाभ झाला नाही. रेल्वेच्या या नियोजनशून्य कारभारामुळे लाखो रुपये पाण्यात जाऊन रुग्णांच्या नातेवाईकांनाही व्हरांड्यात झोपण्याची पाळी येत आहे.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय कार्यालयाच्या शेजारी रेल्वे रुग्णालय आहे. या रुग्णालयात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कर्मचारी आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील १७ हजार रेल्वे कर्मचारी उपचार घेतात. अनेकदा गंभीर रुग्णांना रुग्णालयात भरती व्हावे लागते. अशावेळी त्यांच्या देखभालीसाठी असलेल्या नातेवाईकांना रुग्णालयात थांबता येत नसल्यामुळे त्यांची पंचाईत होते. त्यामुळे तत्कालीन ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह यांच्या कार्यकाळात या रेल्वे रुग्णालयाच्या शेजारी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी एक निवारा बांधण्याची योजना आखण्यात आली. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने जवळपास ५० लाख रुपये खर्च करून एक इमारत बांधली.या इमारतीत केवळ ४० रुपये शुल्क घेऊन रुग्णांच्या नातेवाईकांना थांबण्याची व्यवस्था करण्याचे ठरले. या इमारतीचे २०१५ मध्ये मध्य रेल्वेचे तत्कालीन महाव्यवस्थापक एस. के. सुद यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आले. परंतु उद्घाटनापासून एकाही रुग्णाच्या नातेवाईकाला या इमारतीचा लाभ झालेला नाही. यामुळे रेल्वेचे लाखो रुपयांचे नुकसान होऊन या इमारतीपासून मिळणारा महसूलही मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे ही इमारत बांधण्याचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून त्यांच्याकडून या इमारतीचा खर्च वसूल करण्याची मागणी रेल्वेचे कर्मचारी करीत आहेत.

नातेवाईकांना देत नाहीत माहितीरेल्वे रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना रात्री व्हरांड्यात झोपण्याची पाळी येते. अशावेळी ड्युटीवरील रेल्वे कर्मचारी रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांच्यासाठी वाजवी दरात मुक्कामाची व्यवस्था असल्याची माहिती देत नाहीत. रुग्णालयात अशी व्यवस्था असलेले फलकही रेल्वे प्रशासनाने लावलेले नाही. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक त्यांच्यासाठीच सुरू केलेल्या सुविधेपासून मागील तीन वर्षांपासून वंचित आहेत.

प्रशासनाला वाटते डोकेदुखीरुग्णांच्या नातेवाईकांसाठी बांधण्यात आलेली इमारत सुरू केली तर त्यासाठी वेगळे रजिस्टर करून त्यात नातेवाईकांची नोंद करणे, त्यांच्याकडून पैसे घेऊन त्याचा हिशेब ठेवणे ही रेल्वे प्रशासनाला डोकेदुखी वाटत असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. याशिवाय या इमारतीत रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना तैनात करावे लागणार असल्यामुळे मनुष्यबळ वाचविण्यासाठी प्रशासनाने आजपर्यंत ही इमारत खुलीच केली नाही.

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी‘मागील तीन वर्षात रेल्वेने रुग्णांच्या नातेवाईकांसाठी बांधलेल्या इमारतीचा कुणालाच लाभ झाला नाही. यामुळे रेल्वे प्रशासनाचे लाखोचे नुकसान होऊन ही इमारत बंद असल्यामुळे रेल्वेच्या महसुलाचेही नुकसान होत आहे. गरज नव्हती तर ही इमारत उभी का केली हा प्रश्न आहे. त्यामुळे ही इमारत उभी करण्याचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.’-वीरेंद्र सिंह, विभागीय अध्यक्ष,सेंट्रल रेल्वे मजदूर संघ

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर